शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

नाशिकचे जिल्हाधिकारी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 01:34 IST

महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाकडून पाणी वाटपाबाबत संबंधित जिल्ह्यांना विश्वासात घेतले जात नसल्याबद्दल नाशिकचे जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी खेद व्यक्त केला आहे. प्राधिकरणाच्या बैठकांना बोलविले जात नसल्यामुळे लोकसंख्या व धरणाच्या पाण्याची खरी आकडेवारी समोर येत नाही, परिणामी जुन्याच माहितीच्या आधारे पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतला जात असल्याचीही हतबलता त्यांनी बोलून दाखविली.

नाशिक : महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाकडून पाणी वाटपाबाबत संबंधित जिल्ह्यांना विश्वासात घेतले जात नसल्याबद्दल नाशिकचे जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी खेद व्यक्त केला आहे. प्राधिकरणाच्या बैठकांना बोलविले जात नसल्यामुळे लोकसंख्या व धरणाच्या पाण्याची खरी आकडेवारी समोर येत नाही, परिणामी जुन्याच माहितीच्या आधारे पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतला जात असल्याचीही हतबलता त्यांनी बोलून दाखविली.  सर्वाेच्च न्यायालयाने जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास स्थगिती दिल्याने त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिली. त्यावेळी बोलताना महाराष्ट जलसंपत्ती प्राधिकरणाच्या बैठकांना आपल्याला निमंत्रित करण्यात आले नसल्यामुळेच धरणांच्या पाण्याबाबत वाद निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये धरणातील पाण्याची खरी आकडेवारी समारे येत नाही. साधारणत: वर्षे, दोन वर्षांत लोकसंख्येत वाढ होते, त्याच प्रमाणात पाण्याच्या वापरातही वाढ होते. परंतु ही माहिती प्राधिकरणाकडे मांडण्याची संधीच मिळत नाही. त्यामुळे प्रादेशिक वाद निर्माण होतो व पारदर्शकता राहत नसल्याचे ते म्हणाले. यंदा नाशिक जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे धरणातील पाणी अन्यत्र देणे अशक्य असले तरी, जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यासाठी लागणाºया पाण्याचे धरणात आरक्षण करण्यात आल्यामुळे नाशिककरांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील धरणांच्या पाणी आरक्षणावर पालकमंत्री महाजन यांनी गेल्या आठवड्यात स्वाक्षरी करून अंतिम शिक्कामोर्तब केल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयWaterपाणी