शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नाशिकचे जिल्हाधिकारी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 01:34 IST

महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाकडून पाणी वाटपाबाबत संबंधित जिल्ह्यांना विश्वासात घेतले जात नसल्याबद्दल नाशिकचे जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी खेद व्यक्त केला आहे. प्राधिकरणाच्या बैठकांना बोलविले जात नसल्यामुळे लोकसंख्या व धरणाच्या पाण्याची खरी आकडेवारी समोर येत नाही, परिणामी जुन्याच माहितीच्या आधारे पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतला जात असल्याचीही हतबलता त्यांनी बोलून दाखविली.

नाशिक : महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाकडून पाणी वाटपाबाबत संबंधित जिल्ह्यांना विश्वासात घेतले जात नसल्याबद्दल नाशिकचे जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी खेद व्यक्त केला आहे. प्राधिकरणाच्या बैठकांना बोलविले जात नसल्यामुळे लोकसंख्या व धरणाच्या पाण्याची खरी आकडेवारी समोर येत नाही, परिणामी जुन्याच माहितीच्या आधारे पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतला जात असल्याचीही हतबलता त्यांनी बोलून दाखविली.  सर्वाेच्च न्यायालयाने जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास स्थगिती दिल्याने त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिली. त्यावेळी बोलताना महाराष्ट जलसंपत्ती प्राधिकरणाच्या बैठकांना आपल्याला निमंत्रित करण्यात आले नसल्यामुळेच धरणांच्या पाण्याबाबत वाद निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये धरणातील पाण्याची खरी आकडेवारी समारे येत नाही. साधारणत: वर्षे, दोन वर्षांत लोकसंख्येत वाढ होते, त्याच प्रमाणात पाण्याच्या वापरातही वाढ होते. परंतु ही माहिती प्राधिकरणाकडे मांडण्याची संधीच मिळत नाही. त्यामुळे प्रादेशिक वाद निर्माण होतो व पारदर्शकता राहत नसल्याचे ते म्हणाले. यंदा नाशिक जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे धरणातील पाणी अन्यत्र देणे अशक्य असले तरी, जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यासाठी लागणाºया पाण्याचे धरणात आरक्षण करण्यात आल्यामुळे नाशिककरांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील धरणांच्या पाणी आरक्षणावर पालकमंत्री महाजन यांनी गेल्या आठवड्यात स्वाक्षरी करून अंतिम शिक्कामोर्तब केल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयWaterपाणी