शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

नाशिकचे जिल्हाधिकारी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 01:34 IST

महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाकडून पाणी वाटपाबाबत संबंधित जिल्ह्यांना विश्वासात घेतले जात नसल्याबद्दल नाशिकचे जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी खेद व्यक्त केला आहे. प्राधिकरणाच्या बैठकांना बोलविले जात नसल्यामुळे लोकसंख्या व धरणाच्या पाण्याची खरी आकडेवारी समोर येत नाही, परिणामी जुन्याच माहितीच्या आधारे पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतला जात असल्याचीही हतबलता त्यांनी बोलून दाखविली.

नाशिक : महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाकडून पाणी वाटपाबाबत संबंधित जिल्ह्यांना विश्वासात घेतले जात नसल्याबद्दल नाशिकचे जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी खेद व्यक्त केला आहे. प्राधिकरणाच्या बैठकांना बोलविले जात नसल्यामुळे लोकसंख्या व धरणाच्या पाण्याची खरी आकडेवारी समोर येत नाही, परिणामी जुन्याच माहितीच्या आधारे पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतला जात असल्याचीही हतबलता त्यांनी बोलून दाखविली.  सर्वाेच्च न्यायालयाने जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास स्थगिती दिल्याने त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारांना दिली. त्यावेळी बोलताना महाराष्ट जलसंपत्ती प्राधिकरणाच्या बैठकांना आपल्याला निमंत्रित करण्यात आले नसल्यामुळेच धरणांच्या पाण्याबाबत वाद निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये धरणातील पाण्याची खरी आकडेवारी समारे येत नाही. साधारणत: वर्षे, दोन वर्षांत लोकसंख्येत वाढ होते, त्याच प्रमाणात पाण्याच्या वापरातही वाढ होते. परंतु ही माहिती प्राधिकरणाकडे मांडण्याची संधीच मिळत नाही. त्यामुळे प्रादेशिक वाद निर्माण होतो व पारदर्शकता राहत नसल्याचे ते म्हणाले. यंदा नाशिक जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे धरणातील पाणी अन्यत्र देणे अशक्य असले तरी, जिल्ह्यातील नागरिकांना पिण्यासाठी लागणाºया पाण्याचे धरणात आरक्षण करण्यात आल्यामुळे नाशिककरांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील धरणांच्या पाणी आरक्षणावर पालकमंत्री महाजन यांनी गेल्या आठवड्यात स्वाक्षरी करून अंतिम शिक्कामोर्तब केल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयWaterपाणी