शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

नाशिक जिल्हा : वर्षभरात रस्त्यावर ९०० लोकांनी गमाविला प्राण; १हजार ८०० जायबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 9:12 PM

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीच्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन विभागाला दरवर्षी दहा टक्क्यांनी अपघातांची संख्या कमी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. २०१६मध्ये जिल्ह्यात ९८७ लोक रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडले तर मागील वर्षी ही संख्या ८३ ने कमी होऊन ९०४वर पोहचली असली तरी अवघ्या आठ टक्क्यांनी मृत्यूचे प्रमाण घटले असून ...

ठळक मुद्दे२०१६मध्ये जिल्ह्यात ९८७ लोक रस्ते अपघातात मृत्यूमुखीअवघ्या आठ टक्क्यांनी मृत्यूचे प्रमाण घटले मागील वर्षी अपघातांची संख्या २१९० इतकी होती

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीच्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन विभागाला दरवर्षी दहा टक्क्यांनी अपघातांची संख्या कमी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. २०१६मध्ये जिल्ह्यात ९८७ लोक रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडले तर मागील वर्षी ही संख्या ८३ ने कमी होऊन ९०४वर पोहचली असली तरी अवघ्या आठ टक्क्यांनी मृत्यूचे प्रमाण घटले असून ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.पोलीस विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग या शासकिय यंत्रणांसोबत प्रादेशिक परिवहन विभागाने समन्वय साधून जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील अपघातप्रवण क्षेत्र शोधून काढत त्या ठिकाणी योग्य त्या प्रकारे उपाययोजना करुन अपघाताचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या रस्ता सुरक्षा समितीमार्फत देण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून जरी विविधप्रकारे उपाययोजना व अभियानांमार्फत लोकजागृतीवर भर दिला जात असला तरी अद्याप पाहिजे तसे यश या शासकिय यंत्रणेला प्राप्त झालेले नाही. केवळ आठ टक्क्यांनी अपघाती मृत्यूचे प्रमाण मागील वर्षी कमी झाले तर अपघातांचा आकडा बघितला असता त्यामध्येही खूप तफावत आढळून येत नाही. २०१६ साली ३ हजार ३८ अपघात नाशिक जिल्ह्यात विविध भागांमध्ये झाले तर मागील वर्षी अपघातांची संख्या २१९० इतकी होती. एकूण ८४८ अपघात मागील वर्षी कमी झाल्याने प्रादेशिक परिवहन विभागाच्या प्रयत्नांना काही अंशी यश येताना जरी दिसत असले तरी चालू वर्षात ही संख्या अजून कमी करण्याचे आव्हान आहे.

संगणकीकृत परवाना चाचणीशहरी व ग्रामिण भागात संगणकीकृत उमेदवारांना वाहन परवाना चाचणीला सामोरे जावे लागत आहे. या चाचणीमुळे ज्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत माहिती व अभ्यास आहे, अशाच उमेदवार चाचणीमध्ये पात्र ठरत आहे. या संगणकीकृत प्रणालीद्वारे ग्रामिण भागात अद्याप टॅबलेटद्वारे १८ हजार ३४७ अर्जदारांची चाचणी घेण्यात आली. यामध्ये चौदा हजार १४७ अर्जदार उत्तीर्ण होऊ शकले.३५ हजार वाहनांना योग्यता प्रमाणपत्रप्रादेशिक परिवहन विभागाने नादुरस्त वाहनांमुळे रस्त्यावर होणारे अपघात कमी करण्यासाठी स्वयंचलित वाहन तपासणी यंत्र दोन वर्षांपासून सुरू केले आहे. यामाध्यमातून सुमारे ६६ हजार ५६२ वाहने तपासण्यात आली. त्यापैकी ३५ हजार वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातhighwayमहामार्ग