शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

नाशिक तोफखाना केंद्र : ४६२ नवसैनिकांच्या तुकडीने घेतली देशसेवेची शपथ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 14:05 IST

देशाच्या सर्वांत मोठ्या अशा नाशिकरोड तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या नवसैनिकांच्या तुकडीचा शपथविधी सोहळा शनिवारी (दि.१७) पार पडला. शपथविधी सोहळ्याचे समीक्षक अधिकारी म्हणून तेलंगाणा आंध्रप्रदेश सब एरियाचे कमान्डींग अधिकारी मेजर जनरल एन. श्रीनिवास राव उपस्थित होते.

ठळक मुद्दे तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या नवसैनिकांच्या तुकडीचा शपथविधी सोहळा ४२ आठवड्यांचे शास्त्रशुध्द सैनिकी प्रशिक्षण पुर्ण

नाशिक : पहाटे साडेतीन वाजता साखर झोपेतून जागे होत ‘कमांड’चे पालन करुन स्वयंशिस्तीचे दर्शन घडविले. नाशिकच्या भारतीय तोफखाना केंद्राच्या प्रत्येक नवसैनिकाने पहाटेपासून मैदानावर सातत्याने ४२ आठवडे घाम गाळत मैदानी खेळ ते कुशल शस्त्र हाताळणीपर्र्यंतचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण कठोर परिश्रम घेऊन पुर्ण केले. या प्रशिक्षणानंतर सैन्यात भरती झालेल्या सर्वसामान्य युवकाचा चेहरा, शरीरयष्टी तर बदललीच; मात्र प्रशिक्षणाने त्याला परिपूर्ण सैनिक म्हणून घडविले एकूण ४६२ गणरच्या तुकडीने लष्करी थाटात भारतीय संविधानाचे पालन करत देशसेवेसाठी सदैव सज्ज राहण्याची शपथ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेतली.

देशाच्या सर्वांत मोठ्या अशा नाशिकरोड तोफखाना प्रशिक्षण केंद्राच्या नवसैनिकांच्या तुकडीचा शपथविधी सोहळा शनिवारी (दि.१७) पार पडला. शपथविधी सोहळ्याचे समीक्षक अधिकारी म्हणून तेलंगाणा आंध्रप्रदेश सब एरियाचे कमान्डींग अधिकारी मेजर जनरल एन. श्रीनिवास राव उपस्थित होते. याप्रसंगी सलामी मंचावर ब्रिगेडियर जे. एस. बिंद्रा यांच्यासमवेत त्यांनी उपस्थित जवानांची मानवंदना लष्करी थाटात स्विकारत त्यांना उज्ज्वल भवितव्य व देशसेवेच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. शनिवारी नाशिकरोड तोफखाना केंद्राच्या कवायत मैदानावर झालेल्या या सोहळ्याप्रसंगी ते म्हणाले, तिरंगा आणि तोफांच्या समोर घेतलेली शपथ आपल्या पूर्ण कारकिर्दित सदैव स्मरणात ठेवावी.

तोफखाना केंद्राच्या सैन्यदलात भरती झालेल्या ४६२ प्रशिक्षणार्थी जवानांनी आधुनिक तंत्रज्ञान व शस्त्रांचे सहाय्याने १९ आठवड्यांचे खडतर सैन्य प्रशिक्षणासह शारिरिक क्षमता, शस्त्र हाताळणी अशा एकूण ४२ आठवड्यांचे शास्त्रशुध्द सैनिकी प्रशिक्षण पुर्ण केले. जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज असून, भारतातील सुमारे सैन्यदलाच्या २९८ ‘युनिट’मध्ये हे नवसैनिक भविष्यात आपले योगदान देणार आहेत. लष्करी बॅण्डच्या ‘शेर-ए-जवान’ या वैशिष्ट्यपूर्ण धूनच्या तालीवर नवसैनिकांच्या तुकडीचे लष्करी थाटात मेजर जनरल श्रीनिवास राव हे सलामी मंचावर येताच जवानांच्या तुकडीने त्यांना ‘सॅल्यूट’ केले. त्यानंतर जवानांनी सशस्त्र लष्करी संचलन सादर क रत वरिष्ठ अधिका-यांना मानवंदना दिली. दरम्यान, ‘मैं सच्चे मन सें भारतीय संविधान के प्रती वफादार रहुंगा और इमानदारी से देश की सेवा करुंगा...’ ‘देश की सेवा में हवा, पाणी और पृथ्वी के किसी भी रास्ते से जाना पडे तो मैं खुशी से जाऊंगा...चाहे मुझे इसमे अपना जीवन का बलिदान क्यु ना देना पडे...’ अशी शपथ विविध धर्मग्रंथ व तोफांच्या साक्षीने यावेळी घेतली.

टॅग्स :Indian Armyभारतीय लष्करNashikनाशिक