शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
6
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
7
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
8
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
9
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
10
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
11
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
12
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
13
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
14
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
15
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
16
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
17
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
18
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
19
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
20
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!

नासाका बचाव कृती समिती : नासाका बचाव मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:12 AM

नाशिक सहकारी साखर कारखाना शासन व जिल्हा बँकेने सुरू करून शेतकरी व कामगारांची होणारी हेळसांड थांबवावी, याकरिता कार्यक्षेत्रातील गावागावांत जनजागृती करून राज्य शासनाकडे आग्रही भूमिका मांडण्याचा ठराव नासाका बचाव कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला.

नाशिकरोड : नाशिक सहकारी साखर कारखाना शासन व जिल्हा बँकेने सुरू करून शेतकरी व कामगारांची होणारी हेळसांड थांबवावी, याकरिता कार्यक्षेत्रातील गावागावांत जनजागृती करून राज्य शासनाकडे आग्रही भूमिका मांडण्याचा ठराव नासाका बचाव कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला.नाशिक, सिन्नर, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या चार तालुक्यांचा कार्यक्षेत्र असलेला नासाका गेल्या पाच वर्षांपासून बंद आहे. कारखाना पुन्हा सुरू होण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या नासाका बचाव कृती समितीने कारखाना कार्यस्थळावर भेट देत पाहणी केली. यावेळी झालेल्या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत कारखाना भाडेतत्त्वाने अथवा खासगीकरणाने सुरू झाला पाहिजे, यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेत शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करावे. चारही तालुक्यांतील कार्यक्षेत्रात प्रत्येक वर्षी दोन लाख मेट्रिक टनापेक्षा जादा ऊस उपलब्ध असल्याने त्याच्या गाळपासाठी शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. ऊसतोड मजुरांसाठी जादा आर्थिक खर्च करावा लागत आहे. नाशिकसह नगर जिल्ह्यातील नऊ कारखाने नासाकाचा ऊस गाळपासाठी नेत आहे. मात्र ऊसतोडीनंतर तो प्रत्यक्ष गाळपापर्यंत लागणाºया वेळेमुळे टनेजमध्ये मोठा फटका बसत असल्याने आर्थिक नुकसान होत आहे.कारखाना बंद असल्याने परिसरातील लघुउद्योगांच्या रोजगारावर गदा आली आहे. त्यासाठी जिल्हा बँकेने सकारात्मक धोरणाचा अवलंब करीत हा कारखाना सुरू करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत विविध युवकांनी व्यक्त केले.बैठकीला विलास गायधनी, श्रीकांत गायधनी, रंगनाथ बाºहे, अविनाश गायधनी, नवनाथ गायधनी, तुषार गायधनी, ज्ञानेश्वर बोराडे, सुरेश दळवी, पांडू कुकटवाड, शम्मी शेख, भास्कर मुंजे, संजय गायधनी, योगेश गायधनी, कैलास आडके, हरीश पगार, माळू सानप, रवी गायधनी, पोपट घुगे, सुरेश कुमट, शंकर गायखे, सखाराम सानप आदी उपस्थित होते.वसुलीसाठी दावे दाखल करण्याचा ठरावबैठकीत कारखाना सुरू करण्यासाठी बँक, लोकप्रतिनिधी व शासनाची सकारात्मक मानसिकता असावी, कारखान्यावर ८४.२९ कोटींचे कर्ज असून, त्यासाठी केंद्र व राज्य शासनाने मदत द्यावी, गैरकारभार करून कारखाना अडचणीत आणणाºया संचालकांची चौकशी करून त्यांच्यावर वसुलीसाठी दावे दाखल करावे, कामगारांचे थकीत पगार व इतर देय रकमा देण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न व्हावेत, असे ठराव करण्यात आले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेNashikनाशिक