शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

नरेंद्र मोदींनी देशाला हुकुमशाहीकडे नेले : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 21:39 IST

आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ नाशिकमधील वेशीवरील गाव म्हणून ओळखले जाणारे गिरणारेत पवार यांची जाहीर सभा बुधवारी (दि.२४) पार पडली. यावेळी पवार यांनी मोदी यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सडकून टीका केली.

ठळक मुद्देमोदी यांनी पाच वर्षात काय केले, ते सांगावे. 'राफेल’खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ‘जीएसटी’सारखी करप्रणाली लागू करून शेती, उद्योगधंद्यांची वाट लावली. तसेच नोटाबंदीने देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले. मोदी यांच्या मनमानी निर्णय देशाला हूकूमशाहीच्या दिशेने घेऊन जाण्यास पुरक ठरल्याची जोरदार टीका राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली.आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ नाशिकमधील वेशीवरील गाव म्हणून ओळखले जाणारे गिरणारेत पवार यांची जाहीर सभा बुधवारी (दि.२४) पार पडली. यावेळी पवार यांनी मोदी यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सडकून टीका केली. यावेळी ते म्हणाले, सरकारच्या पाच वर्षांच्या कालावधीत मोदी महाराष्टÑात केवळ ७वेळा आले; मात्र येथील समस्यांबद्दल एक चकार शब्द काढला नाही. ते फक्त राहुल गांधींनी काय केले? गांधी परिवाराने काय केले? हेच प्रश्न जनतेला विचारत होते. आता त्यात वेळ न घालवता मोदी यांनी पाच वर्षात काय केले, ते सांगावे. या सरकारच्या काळात शेती आणि उद्योगधंद्ये उद्धवस्त झाले असून राज्यासह देशात शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत आहेत. सत्ताधारी भाजपा सरकारने ‘राफेल’सारख्या लढाऊ विमानांच्या खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोपही पवार यांनी यावेळी बोलताना केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीNashikनाशिकfarmer suicideशेतकरी आत्महत्या