शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
4
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
6
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
7
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
8
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
9
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
10
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
11
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
12
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
13
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
14
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
15
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
16
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
17
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
18
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
19
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
20
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर

जिल्ह्यातील कुपोषणाचे संकट गडद ४३ टक्के कुपोषण : राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत होणार सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:35 IST

नाशिक : जिल्ह्यातील कुपोषणाचे संकट गडद झाले आहे. केंद्र सरकारने प्रातिनिधिक स्वरूपात केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कुपोषण आढळून आले.

ठळक मुद्देजिल्ह्यात १०० टक्के बालकांचे सर्वेक्षण करण्यात येणारमार्च २०१८ पासून देशभरात राष्ट्रीय पोषण अभियानाची सुरुवात

नाशिक : जिल्ह्यातील कुपोषणाचे संकट गडद झाले आहे. केंद्र सरकारने प्रातिनिधिक स्वरूपात केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कुपोषण आढळून आले असून, यात नाशिकचाही समावेश आहे. जिल्ह्यातील ४३ टक्के बालकांमध्ये कुपोषण आढळून आल्याने राष्ट्रीय पोषण मिशन (एनएनएम) अंतर्गत राज्यातील चार कुपोषित जिल्ह्यांमध्ये नाशिकचीही निवड करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत एप्रिल महिन्यात नाशिक जिल्ह्यात १०० टक्के बालकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, जिल्ह्यातील १०० टक्के बालकांचे वय व उंचीसह वजन घेण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी अध्यक्षांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. केंद्र सरकारने कुपोषित बालके, किशोरवयीन मुली व महिलांसाठी ८ मार्च २०१८ पासून देशभरात राष्ट्रीय पोषण अभियानाची सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गत आगामी ३ वर्षांत प्रतिवर्ष २ टक्के याप्रमाणे कुपोषणाचे ६ टक्के प्रमाण कमी करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले असून, किशोरवयीन मुली व महिलांमधील रक्ताक्षयाचे (अ‍ॅनेमिया) प्रमाण ९ टक्के (प्रतिवर्षी ३ टक्के याप्रमाणे) कमी करणे व जन्मत: कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण (एलबीडब्ल्यू) प्रतिवर्ष २ प्रमाणे ६ टक्के कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी २०१९ ते २०२० पर्यंत टप्प्याटप्प्याने पोषण अभियान राबविण्यात येणार आहे. यात जी बालके तीव्र कुपोषित (एसएएम व एमएएम) असतील अशा पालकांना बाल उपचार केंद्र राष्ट्रीय पुनर्वसन केंद्रे व ग्राम बाल विकास केंद्रांच्या माध्यमातून उपचार व पोषक आहार व आवश्यक सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या क र्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात नाशिक जिल्ह्णातील पोषण अभियानाचा शनिवारी (दि. ७) शुभारंभ करण्यात आला. यावेळी कुपोषण व राष्ट्रीय पोषण अभियानाच्या अंमलबजावणीविषयी सविस्तर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध तालुक्यांचे गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी पोषण अभियान राबविण्यासाठी विविध सूचनांसह तालुक्यातील परिस्थितीही सभागृहासमोर मांडली. यावेळी सभापती सुनीता चारोस्कर, मनीषा पवार, यतिंद्र पगार, महिला व बाल विकास अधिकारी दत्तात्रय मुंडे आदी उपस्थित होते.राष्ट्रीय पोषण अभियानात ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत विकास आराखड्यातून (जीपीडीपी) महिला व बाल विकाससाठी किमान १० आणि आरोग्य व पोषण यासाठी २५ टक्के असा एकूण २५ टक्के निधी राखीव ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व यंत्रणांच्या समन्वयाने उपयोग करून जिल्हा कुपोषण मुक्त करण्यात येणार असल्याचा दावा जिल्हा परिषद पदाधिकारी आणि प्रशानाने केला आहे. परंतु केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेसाठी केंद्र अथवा राज्य सरकारकडून कोणतीही तरतूद केलेली नसल्याने या निधीची अंमलबजाणी कितपत शक्य होणार याविषयी साशंकता निर्माण झाली आहे.पालकांना पोषण वेतनराष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत कुपोषित बालकांवरील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता बालकांसोबत राहणाºया पालकांनाही रोजगार स्वरूपात वेतन देण्यात येणार आहे. त्यामुळे पालक बालकांजवळ बसून असल्याने त्यांना बालकांच्या आहार व संगोपनाविषयी शास्त्रोक्त माहिती मिळून बाळाचे संगोपन चांगले होण्याची अपेक्षाही यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी व्यक्त केली.