शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

मुथूट गोळीबार : हेल्मेटसह आढळल्या शहराच्या वेशीवर दरोडेखोरांच्या ‘पल्सर-२२०’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 2:13 PM

रहिवाशांची वाहने लक्ष्य करून समाजकंटक धुडगूस घालण्यापासून तर थेट पोलिसांवर हल्ले करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली आहे. त्यामुळे खाकीवरील नाशिककरांचा ‘विश्वास’ कमी होऊ लागला असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये भयाचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देशहराची कायदासुव्यवस्था कमालीची ढासळली हल्लेखोरांनी शहराची वेस यशस्वीपणे ओलांडली नाकाबंदीत सुमारे २० किलोमीटरचे अंतर दुचाकीवरून कसे कापले?

नाशिक : उंटवाडी येथील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात जबरी लुटीच्या इराद्याने शुक्रवारी सकाळी ११ वाजता चार ते पाच सशस्त्र दरोडेखोरांनी घुसून बेछुट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या गुन्ह्यात वापरलेल्या पल्सर-२२०प्रकारच्या तीन दुचाकी शहराच्या वेशीवर रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी शनिवारी (दि.१५) पोलिसांना आढळून आल्या आहेत. या दुचाकींच्या क्रमांकावरून या गुन्ह्याच्या तपासाला आता पोलीस गती देऊ शकणार आहे; मात्र तीनही पल्सरसोबत हेल्मेटदेखील पोलिसांना मिळून आल्याने हल्लेखोर शहराच्या नाकाबंदीमधून हेल्मेटसक्तीचा फायदा घेत वेशीबाहेर पोहचल्याचे बोलले जात आहे.शहराची कायदासुव्यवस्था मागील काही दिवसांपासून कमालीची ढासळली आहे. रहिवाशांची वाहने लक्ष्य करून समाजकंटक धुडगूस घालण्यापासून तर थेट पोलिसांवर हल्ले करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली आहे. त्यामुळे खाकीवरील नाशिककरांचा ‘विश्वास’ कमी होऊ लागला असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये भयाचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी गुंडांच्या गोळीबाराच्या घटनेने अवघे शहर हादरून गेले आणि पोलिसांची कायदासुव्यवस्था चव्हाट्यावर आली. या गुन्ह्यात फायनान्सचा निष्पाप तरुण कर्मचाऱ्याचा बळी गेला. हल्लेखोरांनी एक दोन नव्हे तर तब्बल पाच गोळ्या त्याच्या शरीरात झाडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दिवसाच्या सुरुवातीला गजबजलेल्या परिसरात घडलेल्या या धाडसी दरोड्याच्या प्रयत्नाच्या घटनेने पोलीस प्रशासनापुढे मोठे आव्हान निर्माण झाले. शहराच्या कायदासुव्यवस्थेचे तीनतेरा झाल्याचे यावरून उघड झाले. विशेष म्हणजे गुरुवारच्या रात्री पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन, मिशन आॅल आउट सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत राबविले होते. तरीदेखील शुक्रवारी सशस्त्र दरोडा टाकण्याचा भरवस्तीत प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांची नाकेबंदी, झडतीसत्र, सीमाबंदीसाठी तपासणी नाके रात्रीची गस्त पथके ही केवळ कागदावरच आहे की काय? असा प्रश्न नाशिककरांकडून उपस्थित होत आहे.पोलिसांच्या ‘नाका’खालून ओलांडली वेसहल्लेखोरांनी क्षणार्धात पोलिसांच्या ‘नाका’खालून ते सहजरीत्या निसटले. हल्ल्याची माहिती मिळताच सर्व शहरात तसेच जिल्ह्यात सतर्कतेचे आदेश दिले गेले आणि नाकाबंदी वाढविली गेली. तपासपथके रवाना झाली; मात्र हाती काहीही लागले नाही. हल्लेखोरांनी शहराची वेस यशस्वीपणे ओलांडली आणि रामशेजजवळ गुन्ह्यात वापरलेल्या दुचाक्या सोडून पोबारा केला. यावरून पोलिसांच्या नाकाबंदीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण नाकाबंदी असतानाही उंटवाडी ते रामशेजपर्यंत सुमारे २० किलोमीटरचे अंतर हल्लेखोरांनी दुचाकीवरून कसे कापले? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

टॅग्स :Firingगोळीबारnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयRobberyदरोडाbikeबाईक