शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

खासदार म्हणतात, थांबा आणि पहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 3:49 PM

कांदा निर्यात बंदी : शेतकऱ्यांना सबुरीचा सल्ला

ठळक मुद्देएक दिवस वाढलेले भाव पुन्हा जैसे थे झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी आणखी पेचात

सायखेडा : कांदा निर्यातबंदी उठविण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी ट्विट केले परंतु, त्यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध न झाल्याने शेतकरी वर्ग संभ्रमित असताना दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी कांदा निर्यात बंदी उठविण्यासंबंधी प्रशासकीय पूर्तता सुरु असून निर्णय झालेला आहे. त्यामुळे संभ्रमित न होता थांबा आणि पहा, असा सबुरीचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील कांद्याची निर्यात खुली केल्याची वार्ता सोशल मीडियावर व्हायरल झाली. या संदर्भात केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी केलेल्या ट्विटचा हवाला दिला गेला. मात्र, तीन दिवस उलटूनही त्यासंदर्भात अधिसूचना न निघाल्याने शेतकरी, व्यापारीवर्ग संभ्रमात पडला आहे. पासवान यांनी ट्विट केले त्याच्या दुस-याच दिवशी कांद्याचे बाजार भाव चारशे रूपयांनी वाढले परंतु या संदर्भात कोणताही शासन निर्णय बाजार समितीला अद्याप प्राप्त झाला नाही अथवा तसा निर्णय शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध झाला नाही, त्यामुळे एक दिवस वाढलेले भाव पुन्हा जैसे थे झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी आणखी पेचात सापडले. या सा-या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभेच्या खासदार भारती पवार यांनी केंद्रिय मंत्री यांच्याशी कांदा निर्यातबंदी उठविण्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाली असून निर्यात संदर्भात प्रशासकीय कागद पत्रांची पूर्तता सुरु आहे. बंदी उठविण्याचा निर्णय झाला आहे आणि कांदा निर्यात खुली केली आहे. निर्यात बंदी उठविण्याची घोषणा झाली म्हणजे लगेच सारे काही सुरळीत होत नाही. त्याच्या प्रशासकीय प्रक्रियेसाठी काही अवधी दद्यावा लागतो. त्यामुळे शेतक-यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पवार यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा