शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचा संचार : पिंजरे, ड्रोन अन् सावज बदल असे सगळेच प्रयोग निष्फळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 18:20 IST

मानवाने हे वास्तव स्विकारण्याची गरज आहे. सहजिवन, सहचरण हाच वन्यप्राणी-मानव संघर्षावर कायमस्वरूपी उपाय ठरू शकतो.

ठळक मुद्देऊसशेतीत भरदिवसा बिबट दर्शन अद्याप एकही बिबट्या जेरबंद होऊ शकलेला नाहीबिबट्याचा शोध ड्रोनद्वारेही घेतला गेला

नाशिक : तालुक्यातील दारणाकाठालगतच्या दोनवाडे ते भगुर गावापर्यंतच्या पंचक्रोशीत सध्या दोन आठवड्यांपासून बिबट या वन्यप्राण्याचा धुमाकूळ सुरू आहे. बिबट-मानव संघर्ष या भागात उभा राहताना दिसून येत आहे. हा संघर्ष रोखण्यासाठी नाशिकवनविभागाकडून सातत्याने विविध स्तरावर प्रयोग अन् प्रयत्न केले जात आहेत; मात्र अद्याप वनविभागाचा कुठलाही प्रयोग यशस्वी होऊ शकतलेला नाही. दारणाकाठालगतच्या गावांमध्ये बिबट्याचा मुक्त संचार सुरूच असल्याचे शेतकरी सांगतात.

एप्रिलमध्ये हिंगणवेढेत बिबट्याच्या हल्ल्यात युवकाचा बळी गेला तर मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दोनवाडे गावात चारवर्षीय बालक बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू पावला. यानंतर काही दिवसांनी पुन्हा बिबट्याने दोनवाडेत एका वृध्दाला ठार मारले. शेवगेदारणात एका चिमुकलीला बिबट्याने थेट अंगणात येऊन पंजा मारला, सुदैवाने तीचे प्राण वाचले; मात्र बाबळेश्वरमध्ये तीन वर्षीय चिमुकलीला बिबट्याच्या हल्ल्यात नुकतेच प्राण गमवावे लागले. यामुळे या दारणाकाठालगतच्या पंचक्रोशीत बिबट वन्यप्राण्याची कमालीची दहशत निर्माण झाली आहे. पळसे गावातील टेंभी मळा असो किंवा एकलहरे सामनगाव रस्ता असो किंवा मग भगूर-दोनवाडे गावाचा रस्ता असो, या भागात कधी ऊसशेतीत भरदिवसा बिबट दर्शन देतो तर कधी रात्रीच्या सुमारासही शेतकऱ्यांना बिबट्याची भटकंती नजरेस पडते.बिबट्याला जेरबंद करण्याकरिता व बिबट-मानव संघर्ष कमी करण्यासाठी दोघांच्या जीवांच्यादृष्टीने विविध उपाययोजना वनविभाग करत आहेत.
नाशिक विभागासाठी रेस्क्यू टीम सज्ज करण्यात आली आहेत. बिबट्याच्या हालचालींवरही लक्ष ठेवून आहेत. रात्रीच्यावेळी कॅमेरा ट्रॅप लावून हालचाली टिपण्याचा प्रयत्न केला जात आहेत. बिबट्याला अत्यंत सुरक्षित व सहजरित्या जेरबंद करण्यासाठी पिंज-याचा उपाय योग्य ठरतो. बिबट्याचे आवडते खाद्य श्वान आहे, यामुळे श्वानदेखील पिंजºयात सावज म्हणून ठेवण्याचा प्रयोग केला गेला. या पंचक्रोशीत आठ ते दहा पिंजरे व सात ते आठ कॅमेरे ट्रॅप लावण्यात आले आहेत. बोरिवली येथील संजय गांधी  उद्यानाची वन्यप्राणी रेस्क्यू बचावपथकाचेही मार्गदर्शन यासाठी घेण्यात आले. तीन दिवस या चमूने स्थानिक चमुसोबत दोनवाडे-बाभळेश्वरचा परिसर पिंजून काढला आहे. तसेच पिंजऱ्यांची रचना व ठिकाण याबाबतही माहिती दिली. यानंतर हे पथकदेखील आता माघारी परतले आहे. ऊसशेतीचे विस्तीर्ण व दाट क्षेत्र हे वनविभागापुढील मोठे आव्हान बिबट रेस्क्यूमोहीमेत ठरत असल्याचे वनधिकारी सांगतात. या भागात बिबट्याचा शोध ड्रोनद्वारेही घेतला गेला. सातत्याने एकूणच या भागातील बिबटे जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे पथके लक्ष ठेवून आहेत; मात्र अद्याप एकाही पिंज-यात बिबट्या जेरबंद होऊ शकलेला नाही.
जिल्ह्यात बिबट-मानव संघर्ष कमी होण्यामागे सर्वश्रूत कारण म्हणजे जंगलांचा दिवसेंदिवस होणारा -हास आहे. जंगलांचा -हास हा मानवाकडूनच त्याच्या काही गरजा भागविताना कळत-नकळत होत गेला; परंतू त्याच्या गंभीर परिणामांचा मानवाने यापुर्वी कधीही विचार केला नाही. मानवाने हे वास्तव स्विकारण्याची गरज आहे. सहजिवन, सहचरण हाच वन्यप्राणी-मानव संघर्षावर कायमस्वरूपी उपाय ठरू शकतोजंगलांमध्ये होणारे अतिक्रमणदेखील याला कारणीभूत आहेत. वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक क्षेत्रात मानवाने केलेले हस्तक्षेप घातक ठरू लागला आहे. कृत्रिमरित्या वणवाही जंगलांच्याभोवती पेटविला जातो आहे. मानवाच्या हव्यासापोटी केलेल्या चूकांची ही एक शिक्षाच आहे, असे म्हणणेच चुकीचे होणार आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी वनक्षेत्राचे संवर्धन करणे मानवाच्या हातात आहेत. अवैध शिकार, अवैध वृक्षतोड मानवाने थांबविली पाहिजे आणि निसर्ग जपला पाहिजे, असे मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर व उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिकriverनदीwildlifeवन्यजीवforest departmentवनविभाग