शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांनी केला सत्तेचा सर्वाधिक दुरुपयोग ! :शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 02:14 IST

कारखाने बंद पडतायत, नोकºया जातायत, मंदी रोखण्यात सरकार अपयशी ठरतंय. कुणी आवाज उठवला, विरोध केला की खटले भरून ईडीच्या नोटिसा देण्याचे काम सध्याचे सत्ताधारी करीत आहेत. सामान्यांचा आवाज दाबून टाकण्यासाठी सत्तेचा जितका दुरुपयोग या सरकारने केला, तितका कुणीच केला नव्हता. असा सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचा, असा घणाघात राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केला.

ठळक मुद्देमखमलाबाद, सिडको येथे जाहीरसभा

नाशिक : कारखाने बंद पडतायत, नोकºया जातायत, मंदी रोखण्यात सरकार अपयशी ठरतंय. कुणी आवाज उठवला, विरोध केला की खटले भरून ईडीच्या नोटिसा देण्याचे काम सध्याचे सत्ताधारी करीत आहेत. सामान्यांचा आवाज दाबून टाकण्यासाठी सत्तेचा जितका दुरुपयोग या सरकारने केला, तितका कुणीच केला नव्हता. असा सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांना सत्तेवरून खाली खेचा, असा घणाघात राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केला.सिडकोतील पवननगरला नाशिक पश्चिमचे राष्टÑवादी कॉँग्रेस-कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार अपूर्व हिरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री प्रशांत हिरे, उमेदवार डॉ. अपूर्व हिरे, देवीदास पिंगळे, नाना महाले, जयवंत जाधव, रवींद्र पगार, रंजन ठाकरे, गजानन शेलार, लक्ष्मण जायभावे, अर्जुन टिळे, डॉ. शोभा बच्छाव, करण गायकर आदी मान्यवर उपस्थित होते. बोलताना पवार यांनी यावेळी १९८५ सालासारखी परिस्थिती दिसत असून, यावेळीदेखील संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील जागा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. राज्य आणि केंद्र सरकारने सामान्य जनतेची कोणतीच कामे केली नाहीत. त्यामुळेच जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच मग कलम ३७० सारख्या मुद्द्यांचा वापर केला जात असल्याचे पवार यांनी नमूद केले.गत ५ वर्षांत १६ हजार शेतकºयांनी आत्महत्या केली. ज्या शेतकºयांची २-४ लाखांची कर्ज थकतात, त्यांना नोटिसा पाठवून बेअबु्र करता आणि कोट्यवधींची उद्योजकांची कर्जे, राष्टÑीयीकृत बॅँकांची देणी माफ करून टाकता हा सामान्यांवर मोठा अन्याय आहे. तो बंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्याआधी भुजबळ यांनीदेखील राज्याच्या कारभारावर घणाघाती हल्ला चढवला. तसेच या सरकारने केवळ खोटी आश्वासने देण्याचे काम केले असल्याचा आरोप केला. तर अपूर्व हिरे यांनी एचएएल, स्थानिक बेरोजगारीच्या मुद्द्यांमुळे परिवर्तन निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.दत्तक बापापेक्षा गरीब बाप बरा...मखलाबाद येथे झालेल्या सभेत देखील शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. शहर दत्तक घेऊन कोणतेही मुख्यमंत्र्यांनी कोणतेही काम केले नाही. नाशिकमधील उद्योगधंदे बंद पडले असून, उद्योजक, कामगार, शेतकºयांचे प्रश्न निर्माण झाले असताना यासंबंधी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला की ते देशभक्तीच्या घोषणा देऊन मुद्द्यांवरून लक्ष वळविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशा परक्या दत्तक बापापेक्षा आपला गरीब बापच बरा, अशी टीका पवार यांनी केली. मी कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आहे. आमचा रेवड्यांची कुस्ती खेळणारा पोरगंही त्यांना सरस ठरेल, असं असताना मुख्यमंत्री म्हणतात त्यांना समोर कोणी पहिलवानच दिसत नाही अशी टीकाही त्यांनी केली. आपण काहीच केले नाही अशी टीका सध्या केली जाते मग पन्नास-पंचावन्न वर्षात काही तरी काम केले असल्यानेच सरकारने आपल्याला पद्म पुरस्कार दिला असेल ना असेही ते म्हणाले.हिरे घराण्याकडे सेवेचा वारसाभाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे, पुष्पाताई हिरे, प्रशांतदादा हिरे असा समाजसेवेचा मोठा वारसा हिरे घराण्याकडे आहे. स्वत: अपूर्व यांनीदेखील विधीमंडळात नाशिक जिल्ह्याचे अनेक प्रश्न मांडण्याचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केले. त्यामुळे यावेळी सेवेचा वारसा असलेला उमेदवार निवडण्याची संधी तुम्हाला असल्याचे सांगून पवार यांनी अपूर्व यांना विजयी करण्याचे आवाहन केले.गोदाकाठी गाजरविक्रीछगन भुजबळ यांनी यावेळी नेहमीच्या शैलीत सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा गोदाकाठी भाजीबाजार मैदानावर होत असल्याचा संदर्भ घेऊन भुजबळ यांनी नाशिकचा बाजार नेहमी बुधवारी भरतो, मात्र आज चक्क गुरुवार असताना देखील गोदाघाटावर बाजार भरला आहे. या बाजारात गाजर विक्री सुरू आहे, असे सांगून फडणवीस यांच्या सभेची खिल्ली उडवली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस