शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पाविषयी विविध क्षेत्रांतून संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:44 IST

अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेला जलद पूर्वपदावर आणण्यासाठी परिपूर्ण तरतूद केली आहे. प्रत्यक्ष करात कोणतेही बदल न केलेले बजेट पुढील काही वर्ष ...

अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेला जलद पूर्वपदावर आणण्यासाठी परिपूर्ण तरतूद केली आहे. प्रत्यक्ष करात कोणतेही बदल न केलेले बजेट पुढील काही वर्ष नक्कीच लक्षात ठेवले जाईल. आर्थिक शिस्त पाळण्यापेक्षा सरकार आर्थिक विकासदर वाढीस चालना देण्यासाठी अधिक काम करणार असल्याचे संकेत आहेत. ही एक स्वागतार्ह बाब आहे. एकूणच भारतीय अर्थव्यवस्थेचे आरोग्य या विचारसरणीमुळे पुन्हा वेगवान होईल.

-पायल व्यास, अध्यक्ष, आयसीएसआय, नाशिक शाखा,

--

जनतेच्या प्रश्नांना बगल

अर्थसंकल्पात कामगार वर्गासाठी काही दिलासा देणारी तरतूद नाही. किमान वेतन वाढविणे, वर्षानुवर्षे कंत्राटी आणि रोजंदारी पद्धतीने काम करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांना कायम करणे, नवी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, पेन्शनमध्ये वाढ, केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये काम करणाऱ्या कोट्यवधी अंगणवाडी कर्मचारी, अशा कर्मचारी, शालेय पोषण कामगार यांना कायम करणे,याबाबत एकही निर्णय अर्थमंत्र्यांनी केलेला नाही. त्यामुळे अल्प मोबदल्यात काम करणाऱ्या योजना कर्मचाऱ्यांचे पदरी निराशा पडली आहे. उलट कामगारांच्या प्रॉव्हिडंट फंडावर केंद्र सरकारची नजर असल्याचे दिसून येते. शिक्षण दिवसेंदिवस महाग होत असताना सर्वसामान्यांना मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याबाबत अर्थमंत्र्यांनी काहीही घोषणा केलेली नाही. याचा अर्थ खासगी शिक्षण संस्थाचालकांमार्फत पाल्य व पालकांची पिळवणूक यापुढेही सुरू राहील.

- डॉ. डी.एल. कराड. राष्ट्रीय उपाध्यक्ष सीटू

--

उद्योग व्यवसायाला ऊर्जा

उद्योगांना चालना देणारा अर्थसंकल्प आहे. सर्व सामन्यापासून उद्योग व व्यापारी वर्गासाठी भविष्यात एक नवीन ऊर्जा घेऊन येणारा अर्थसंकल्प आहे. नाशिक शहराच्या विकासाला अधिक वेगवान करणाऱ्या नाशिक मेट्रोसाठी केंद्र सरकारकडून २०९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यासाठी निओ मेट्रो प्रकल्पास नॅशनल प्रोजेक्ट म्हणून जाहीर केल्याने अनेक नवीन उद्योग आपली गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.

-आशिष नहार, राष्ट्रीय सरचिटणीस, आईस्क्रीम उत्पादक संघटना

---

नोकरदारांच्या तोडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प

अर्थसंकल्पात नोकरदार किंवा व्यावसायिक लोकांसाठी फक्त तोंडाला पाने पुसले आहे. इन्कमटॅक्सची रिअसेसमेंट ओपन करण्याचा कालावधी सहा वर्षांहून तीन वर्षापर्यंत कमी केलेला आहे, असेसमेंट करताना व्यापाऱ्यांना बोलविण्याऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सने माहिती घ्यावी लागणार असल्याने व्यापाऱ्यांचा त्रास कमी होईल. जीएसटीची रिटर्न प्रणाली आणखी सोपी करणार म्हणजे काय हे स्पष्ट नसून थोड्याफार प्रमाणात बदल करून अर्थसंकल्प सादर केलेला आहे

-अनिल चव्हाण, अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र, टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन

--

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पातून

कोरोना महामारी आणि बॉर्डरवरील प्रचंड कडाक्याच्या थंडीतील अश्रुधूर आणि थंड पाण्याच्या बेफाम फवाऱ्यास तोंड देत लाखो शेतकऱ्यांच्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लढ्याची अर्थसंकल्पाला पार्श्वभूमी होती. त्याशिवाय बेरोजगारीच्या प्रश्नानेही विक्राळ स्वरूप धारण केले आहे. परंतु अर्थ संकल्पात शेतकरी, बेरोजगारी, या प्रश्नांकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले आहे. देश म्हणून अर्थसंकल्प हाताळण्याऐवजी आगामी काळातील तमिळनाडूसह तीन ते चार राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांना खुश करण्याचे धोरण सरकारने अर्थसंकल्पातून राबविल्याचे दिसते.

-ॲड. श्रीधर देशपांडे, ज्येष्ठ माकप नेते