शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
4
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
5
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
6
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
7
संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
8
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
9
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
10
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
11
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
12
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
13
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
14
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
15
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
16
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
17
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
18
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
19
AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
20
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मक्याने ओलंडला अठराशेचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 18:14 IST

एकीकडे सातत्याने ढासळणाºया कांद्याच्या दराने सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना दुसरीकडे शासनाने जाहीर केलेल्या मक्याच्या हमी भावाला डावलून येवला बाजार समितीत मक्याच्या दराने १८०० रूपयांचा टप्पा ओलांडून विक्रम केला असून त्यामुळले शेतकºयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. येवला बाजार समितित मक्याला प्रती क्विंटल किमान १७४२ रूपये कमाल १८०५ रूपये तर सरासरी १७८१ रु पये बाजारभाव मिळाला.

ठळक मुद्देविक्रम : येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा

येवला : एकीकडे सातत्याने ढासळणाºया कांद्याच्या दराने सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना दुसरीकडे शासनाने जाहीर केलेल्या मक्याच्या हमी भावाला डावलून येवला बाजार समितीत मक्याच्या दराने १८०० रूपयांचा टप्पा ओलांडून विक्रम केला असून त्यामुळले शेतकºयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. येवला बाजार समितित मक्याला प्रती क्विंटल किमान १७४२ रूपये कमाल १८०५ रूपये तर सरासरी १७८१ रु पये बाजारभाव मिळाला.शासनाने जाहीर केलेला हमीभाव ओलांडून मकाला थेट अठराच्या अधिक भाव मिळत आहे.या भावामुळे शेतकरी मात्र समाधान व्यक्त करत आहे. कांद्याच्या दराने पदरी निराशा पडली असली तरी मक्याच्या विक्र ीतून कांद्याची तूट भरून निघणार जरी नसली शेतकर्यांना आर्थिक आधार तरी मिळेल अशी चर्चा शेतकरी वर्ग करत आहेत.नाशिक जिल्ह्यासह येवला तालुक्यात दरवर्षी कांदा व कपाशीच्या उत्पादनात शेतकरी अग्रेसर असतात.येवला तालुक्यातील कांदा व कपाशी उत्पादनात मात्र घट झाली असल्याचे दिसून येत आहे. पालखेड आवर्तनातून काहीसा दिलासा मिळाला असला तरी कपाशीला मोठ्या प्रमाणात पाणी द्यावे लागते त्यात विहिरी, बोअरवेल याना पाण्याची कमतरता असल्याने कपाशी उत्पादनात दरवर्षी च्या तुलनेत यंदा घट झाली असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. दुष्काळी तालुक्याला आता आधार म्हणून मकाचा उत्तम पर्याय मिळालाआहे.केवळ १८ हजार ६७४ सर्वसाधारण क्षेत्र असताना त्याच्या दुप्पट म्हणजे ३५ हजार ५९० हेक्टरवर शेतकर्यांनी यंदा मका लावली.मात्र यावर्षी क्षेत्र वाढले पण दरवर्षी जेथे २५ ते ३५ क्विटंल मका पिकवली तेथेच यंदा एकरी सरासरी १० ते १५ क्विटंल उत्पादन निघाले.असे असले तरी दुष्काळामुळे लागवड वाढल्याने मकाचे उत्पादनाची सरासरी टिकून आहे.मका उत्पादक राज्यात घटलेले उत्पादन आण िसद्यस्थितीत पोल्ट्रीसह इतर व्यावसायिकांकडून वाढलेली मागणी यामुळे भावाने विक्र म नोंदवला आहे.काही शेतकर्यांनी हमीभावाने मका विकला असला तरी अनेकांनी मात्र शेती कामांच्या गर्दीत मका साठवून ठेवली होती.आता भाव वाढल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजारात मका विक्र ीला आणत आहेत.दरवर्षी शासनाने जाहीर केलेल्या भावापेक्षा खासगी बाजारात दोनशे ते तीनशे रु पये मकाला कमी दर मिळतो. यावर्षी मात्र शासनाने एक हजार 700 रु पयांचा हमीभाव जाहीर केला असला तरी खाजगी बाजारात मात्र 1 हजार 826 हा उच्चांकी भाव मिळाला आहे. मागील पन्नास वर्षांत मिळाला नसेल इतका उच्चांकी भाव यंदा दुष्काळामुळे शेतकºयांच्या वाट्याला आला असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती