शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

मक्याने ओलंडला अठराशेचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 18:14 IST

एकीकडे सातत्याने ढासळणाºया कांद्याच्या दराने सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना दुसरीकडे शासनाने जाहीर केलेल्या मक्याच्या हमी भावाला डावलून येवला बाजार समितीत मक्याच्या दराने १८०० रूपयांचा टप्पा ओलांडून विक्रम केला असून त्यामुळले शेतकºयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. येवला बाजार समितित मक्याला प्रती क्विंटल किमान १७४२ रूपये कमाल १८०५ रूपये तर सरासरी १७८१ रु पये बाजारभाव मिळाला.

ठळक मुद्देविक्रम : येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा

येवला : एकीकडे सातत्याने ढासळणाºया कांद्याच्या दराने सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना दुसरीकडे शासनाने जाहीर केलेल्या मक्याच्या हमी भावाला डावलून येवला बाजार समितीत मक्याच्या दराने १८०० रूपयांचा टप्पा ओलांडून विक्रम केला असून त्यामुळले शेतकºयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. येवला बाजार समितित मक्याला प्रती क्विंटल किमान १७४२ रूपये कमाल १८०५ रूपये तर सरासरी १७८१ रु पये बाजारभाव मिळाला.शासनाने जाहीर केलेला हमीभाव ओलांडून मकाला थेट अठराच्या अधिक भाव मिळत आहे.या भावामुळे शेतकरी मात्र समाधान व्यक्त करत आहे. कांद्याच्या दराने पदरी निराशा पडली असली तरी मक्याच्या विक्र ीतून कांद्याची तूट भरून निघणार जरी नसली शेतकर्यांना आर्थिक आधार तरी मिळेल अशी चर्चा शेतकरी वर्ग करत आहेत.नाशिक जिल्ह्यासह येवला तालुक्यात दरवर्षी कांदा व कपाशीच्या उत्पादनात शेतकरी अग्रेसर असतात.येवला तालुक्यातील कांदा व कपाशी उत्पादनात मात्र घट झाली असल्याचे दिसून येत आहे. पालखेड आवर्तनातून काहीसा दिलासा मिळाला असला तरी कपाशीला मोठ्या प्रमाणात पाणी द्यावे लागते त्यात विहिरी, बोअरवेल याना पाण्याची कमतरता असल्याने कपाशी उत्पादनात दरवर्षी च्या तुलनेत यंदा घट झाली असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. दुष्काळी तालुक्याला आता आधार म्हणून मकाचा उत्तम पर्याय मिळालाआहे.केवळ १८ हजार ६७४ सर्वसाधारण क्षेत्र असताना त्याच्या दुप्पट म्हणजे ३५ हजार ५९० हेक्टरवर शेतकर्यांनी यंदा मका लावली.मात्र यावर्षी क्षेत्र वाढले पण दरवर्षी जेथे २५ ते ३५ क्विटंल मका पिकवली तेथेच यंदा एकरी सरासरी १० ते १५ क्विटंल उत्पादन निघाले.असे असले तरी दुष्काळामुळे लागवड वाढल्याने मकाचे उत्पादनाची सरासरी टिकून आहे.मका उत्पादक राज्यात घटलेले उत्पादन आण िसद्यस्थितीत पोल्ट्रीसह इतर व्यावसायिकांकडून वाढलेली मागणी यामुळे भावाने विक्र म नोंदवला आहे.काही शेतकर्यांनी हमीभावाने मका विकला असला तरी अनेकांनी मात्र शेती कामांच्या गर्दीत मका साठवून ठेवली होती.आता भाव वाढल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजारात मका विक्र ीला आणत आहेत.दरवर्षी शासनाने जाहीर केलेल्या भावापेक्षा खासगी बाजारात दोनशे ते तीनशे रु पये मकाला कमी दर मिळतो. यावर्षी मात्र शासनाने एक हजार 700 रु पयांचा हमीभाव जाहीर केला असला तरी खाजगी बाजारात मात्र 1 हजार 826 हा उच्चांकी भाव मिळाला आहे. मागील पन्नास वर्षांत मिळाला नसेल इतका उच्चांकी भाव यंदा दुष्काळामुळे शेतकºयांच्या वाट्याला आला असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती