शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

मक्याने ओलंडला अठराशेचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 18:14 IST

एकीकडे सातत्याने ढासळणाºया कांद्याच्या दराने सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना दुसरीकडे शासनाने जाहीर केलेल्या मक्याच्या हमी भावाला डावलून येवला बाजार समितीत मक्याच्या दराने १८०० रूपयांचा टप्पा ओलांडून विक्रम केला असून त्यामुळले शेतकºयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. येवला बाजार समितित मक्याला प्रती क्विंटल किमान १७४२ रूपये कमाल १८०५ रूपये तर सरासरी १७८१ रु पये बाजारभाव मिळाला.

ठळक मुद्देविक्रम : येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा

येवला : एकीकडे सातत्याने ढासळणाºया कांद्याच्या दराने सर्वसामान्य शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना दुसरीकडे शासनाने जाहीर केलेल्या मक्याच्या हमी भावाला डावलून येवला बाजार समितीत मक्याच्या दराने १८०० रूपयांचा टप्पा ओलांडून विक्रम केला असून त्यामुळले शेतकºयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. येवला बाजार समितित मक्याला प्रती क्विंटल किमान १७४२ रूपये कमाल १८०५ रूपये तर सरासरी १७८१ रु पये बाजारभाव मिळाला.शासनाने जाहीर केलेला हमीभाव ओलांडून मकाला थेट अठराच्या अधिक भाव मिळत आहे.या भावामुळे शेतकरी मात्र समाधान व्यक्त करत आहे. कांद्याच्या दराने पदरी निराशा पडली असली तरी मक्याच्या विक्र ीतून कांद्याची तूट भरून निघणार जरी नसली शेतकर्यांना आर्थिक आधार तरी मिळेल अशी चर्चा शेतकरी वर्ग करत आहेत.नाशिक जिल्ह्यासह येवला तालुक्यात दरवर्षी कांदा व कपाशीच्या उत्पादनात शेतकरी अग्रेसर असतात.येवला तालुक्यातील कांदा व कपाशी उत्पादनात मात्र घट झाली असल्याचे दिसून येत आहे. पालखेड आवर्तनातून काहीसा दिलासा मिळाला असला तरी कपाशीला मोठ्या प्रमाणात पाणी द्यावे लागते त्यात विहिरी, बोअरवेल याना पाण्याची कमतरता असल्याने कपाशी उत्पादनात दरवर्षी च्या तुलनेत यंदा घट झाली असल्याचे शेतकर्यांनी सांगितले. दुष्काळी तालुक्याला आता आधार म्हणून मकाचा उत्तम पर्याय मिळालाआहे.केवळ १८ हजार ६७४ सर्वसाधारण क्षेत्र असताना त्याच्या दुप्पट म्हणजे ३५ हजार ५९० हेक्टरवर शेतकर्यांनी यंदा मका लावली.मात्र यावर्षी क्षेत्र वाढले पण दरवर्षी जेथे २५ ते ३५ क्विटंल मका पिकवली तेथेच यंदा एकरी सरासरी १० ते १५ क्विटंल उत्पादन निघाले.असे असले तरी दुष्काळामुळे लागवड वाढल्याने मकाचे उत्पादनाची सरासरी टिकून आहे.मका उत्पादक राज्यात घटलेले उत्पादन आण िसद्यस्थितीत पोल्ट्रीसह इतर व्यावसायिकांकडून वाढलेली मागणी यामुळे भावाने विक्र म नोंदवला आहे.काही शेतकर्यांनी हमीभावाने मका विकला असला तरी अनेकांनी मात्र शेती कामांच्या गर्दीत मका साठवून ठेवली होती.आता भाव वाढल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजारात मका विक्र ीला आणत आहेत.दरवर्षी शासनाने जाहीर केलेल्या भावापेक्षा खासगी बाजारात दोनशे ते तीनशे रु पये मकाला कमी दर मिळतो. यावर्षी मात्र शासनाने एक हजार 700 रु पयांचा हमीभाव जाहीर केला असला तरी खाजगी बाजारात मात्र 1 हजार 826 हा उच्चांकी भाव मिळाला आहे. मागील पन्नास वर्षांत मिळाला नसेल इतका उच्चांकी भाव यंदा दुष्काळामुळे शेतकºयांच्या वाट्याला आला असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती