शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Bala Nandgaonkar : "हिंदुत्वाचे खरे वारसदार हे राजसाहेब आणि मनसेच असल्याचा संदेश जनतेला उमगलाय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 17:09 IST

नाशिक - हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही भावना जनमानसात पोहोचली असून हिंदुत्वाचा खरा वारसदार हे राजसाहेब आणि मनसेच असल्याचा संदेश ...

नाशिक - हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही भावना जनमानसात पोहोचली असून हिंदुत्वाचा खरा वारसदार हे राजसाहेब आणि मनसेच असल्याचा संदेश जनतेला उमगला आहे. तुम्ही जनतेशी संवाद वाढवा, त्यांच्या कामांसाठी संघर्ष करून पक्षाची ताकद वाढवत नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत यश मिळवण्याचे आवाहन मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर (MNS Bala Nandgaonkar) यांनी केले. या संवाद मेळाव्यातून मनसेकडून एकप्रकारे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणशिंगच फुंकले आहे.

मनसेच्यावतीने प.सा. नाट्यगृहात पदाधिकारी आणि मनसैनिकांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन, अशोक मुर्तडक, रतनकुमार इचम, दिलीप दातीर, अंकुश पवार, सलीम शेख, सचिन भोसले, पराग शिंत्रे, सुजाता डेरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नांदगावकर यांनी आपण प्रत्येकाने एकसंधपणे कार्यरत रहायला हवे. प्रत्येक पक्षासाठी संघर्ष हा आत्मा असून कार्यकर्ता हीच पक्षाची ताकद आहे. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, असे सांगितले. यावेळी महाजन यांनी यश मिळाल्यानंतर आपल्याच हातून ते निसटून जाते, म्हणजे आपण कार्यकर्ता म्हणून कुठे तरी कमी पडत असल्याचे सांगून मनसैनिकांना कानपिचक्या दिल्या. यावेळी अशोक मुर्तडक, रतनकुमार इचम, अंकुश पवार, दिलीप दातीर, सलीम शेख यांनीदेखील मनोगत व्यक्त केले.

राज यांचे पत्र घरोघरी पोहोचवा

राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्राच्या प्रती तुमच्यातील किती पदाधिकाऱ्यांनी घरोघरी पोहोचवल्या? अशी झाडाझडती नांदगावकर आणि महाजन यांनी सर्व पदाधिकारी, मनसैनिकांची घेतली. आपण केवळ मोबाइलवरच जनसंपर्क वाढवण्याच्या भ्रमात असू तर ते होणार नाही. राज ठाकरे यांचे ते पत्र घरोघरी नेऊन अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.

राज ठाकरे यांनी पक्ष फोडला नाही

शिवसेना फुटल्याने आम्हाला कुणालाही आनंद झाला नसल्याचे प्रकाश महाजन यांनी सांगितले. राज ठाकरे यांचे मोठेपण कशात आहे, तर या घटनेतून समजून घ्या, असे नमूद करून महाजन म्हणाले की, जर एकनाथ शिंदे ४० आमदार फोडू शकतात, तर राज ठाकरेंना ते शक्य होते. मात्र, त्यांनी शिवसेनाच नव्हे कोणताच पक्ष कधी फाेडला नाही. त्यांनी बाळासाहेबांप्रमाणे माणसे हेरून कार्यकर्ते, नेते घडवायला प्राधान्य दिल्याचे प्रकाश महाजन यांनी सांगितले.

एकनाथ शिंदेंना मी जिल्हाध्यक्ष नेमले

आनंद दिघे साहेबांच्या निधनानंतर माझ्याकडे काही काळ शिवसेनेचा ठाणे जिल्ह्याचा पदभार होता. त्यावेळी मी दिघे साहेबांबरोबर सर्वाधिक राहणाऱ्या रघुनाथ मोरे यांना जिल्हाध्यक्ष नेमले होते. मात्र, महिनाभरातच मोरेंचा अपघात झाला. त्यावेळी माझ्यासमोर असलेल्या तीन-चार नावांमधून मी एकनाथ शिंदे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली होती. माझी निवड चुकलेली नाही, हे शिंदेंनी त्यांच्या कर्तृत्वातून दाखवून दिल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेBala Nandgaonkarबाळा नांदगावकरMNSमनसेNashikनाशिकEknath Shindeएकनाथ शिंदे