शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडकरांना पालखेडच्या पाण्याच्या आवर्तनाची ‘प्रतीक्षा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:34 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाण्याची तहान भागविण्यासाठी मनमाडकरांना आता पालखेडच्या पाण्याची रोटेशनची प्रतीक्षा असून, प्रशासनाने याबाबत तत्काळ कार्यवाही करावी,

मनमाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणातीलपाणीसाठा संपुष्टात आल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाण्याची तहान भागविण्यासाठी मनमाडकरांना आता पालखेडच्या पाण्याची रोटेशनची प्रतीक्षा असून, प्रशासनाने याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.तीव्र पाणीटंचाईमध्ये पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळील मुख्य जलकुंभाच्या पाइपमधून होणाºया गळतीमुळे पाण्याचा मोठा अपव्यय होत असताना पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. पाणीटंचाई पाचवीला पूजलेल्या मनमाड शहरात पाण्याअभावी भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा शहर व परिसरात दमदार पाऊस न झाल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली असून, नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यावर्षी वरुणराजा परिसरावर रुसलेलाच राहिला. शहराला पाणीपुरवठा करणाºया वागदर्डी धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने यावर्षी धरणात पाणी आलेच नाही. संपूर्ण वर्षभर मनमाडकरांची तहान पालखेडच्या रोटेशनने भागविली. दुष्काळी परिस्थितीमुळे परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांच्या खासगी विंधनविहिरींनी केव्हाच राम म्हटले आहे.पाण्याच्या उपलब्धतेअभावी पाणीपुरवठ्याच्या दिवसांमध्ये वाढ होत जाऊन तो कालावधी आज २३ दिवसांच्या वर जाऊन पोहोचलाआहे. सध्या वागदर्डी धरणातील पाणीसाठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याने पुढील उपाययोजनान केल्यास पाण्यासाठी हतबल होण्याची वेळ मनमाडकरांवर ओढावणार आहे. या परिस्थितीकडे लोकप्रतिनिधींसह पालिका प्रशासनसुद्धा गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.पालखेडच्या रोटेशन मिळण्यास विलंब झाल्यास शहरावर मोठे जलसंकट ओढावणार आहे. पालखेडचे रोटेशन लवकरात  लवकर सोडण्यात यावे यासाठी पालिका प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.जलकुंभाच्या पाइपमधून पाण्याची गळतीमनमाड शहरात पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ आली आहे. महिला वर्ग हंडाभर पाण्यासाठी दारोदार फिरत असल्याचे चित्र पहावयास मिळते. इतकी भीषण परिस्थिती असताना वागदर्डी धरणालगत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात उभारण्यात आलेल्या जलकुंभाच्या पाइपमधून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होत आहे. या जलकुंभातून शहरातील जलकुंभांना पाणीपुरवठा करण्यात येत असतो. तसेच जलशुद्धीकरण केंद्राला खेटून असलेल्या व्हॉल्व्हमधून पण मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने पाणी वाया जाते. भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये पाण्याच्या होणाºया अपव्ययाबाबत पालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणीDamधरण