शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

पंचवटी एक्सप्रेसचा ‘मेकओव्हर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 4:50 PM

‘आदर्श-पंचवटी एक्सप्रेस थोडी ही देर में प्लॅटफॉर्म क्रमांक तीन पर आर रही है! अशी उद्घोषणा झाली आणि ४२ वर्षानंतर पंचवटी एक्सप्रेस नावाच्या आगोदर ‘आदर्श’ शब्द जोडला गेला. नव्या कोऱ्या २१ डब्यांसह अंतर्गत रचना बदलेली पंचवटी एक्सप्रेस बुधवार दि. ९ पासून नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत रूजू झाली आहे.

ठळक मुद्देनव्या कोऱ्या २१ डब्यांसह नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत रूजू स्वागताची केवळ औपचारिकता पार पाडण्यात आली.

नाशिक : ‘आदर्श-पंचवटी एक्सप्रेस थोडी ही देर में प्लॅटफॉर्म क्रमांक तीन पर आर रही है! अशी उद्घोषणा झाली आणि ४२ वर्षानंतर पंचवटी एक्सप्रेस नावाच्या आगोदर ‘आदर्श’ शब्द जोडला गेला. नव्या कोऱ्या २१ डब्यांसह अंतर्गत रचना बदलेली पंचवटी एक्सप्रेस बुधवार दि. ९ पासून नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत रूजू झाली आहे. स्वच्छता, सामाजिक सलोखा, लक्झरीअस आसनव्यवस्था आणि पाचवेळा लिम्का बुक मध्ये नोंद झालेल्या पासधारक बोगीचा लौकीक कायम राखत सकाळी ७.२० वाजता पंचवटी एक्सप्रेस आदर्श एक्सप्रेस नाशिकरोडहून मुंबईकडे रवाना झाली.नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या  चाकरमान्यांसाठी पंचवटी एक्सप्रेस ही महत्वाची गाडी मानली जाते. १ नोव्हेंबर १९७५ पासून पंचवटी एक्सप्रेस दिमाखात धावत आहे. तब्बल ४२ वर्षानंतर पंचवटी एक्सपे्रसचे रंगरूप बदलण्यात आले आहे. रेल्वेला भरघोस महसूल देणाºया पंचवटी एक्सप्रेसला रेल परिषदेच्या प्रयत्नामुळे ‘आदर्श कोच’ निर्माण करण्यात आला होता.या कोचला सलग पाच वेळा लिम्का बुक आॅफ रॅकॉर्डमध्ये स्थान मिळाल्यानंतर याच बोगीच्या धर्तीवर संपुर्ण पंचवटी एक्सप्रेस आदर्श बनविण्यासाठी रेल परिषदेच्यावतीने प्रयत्न सुरू करण्यात आले आणि पंचवटी एक्सप्रेसला सर्वच्या सर्व २१ नवे डबे जोडण्यात आले.संपुर्ण नवीन डबे आणि आरामदायी कुशनयुक्त आसनव्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व डब्यांना बायोटोयलेट जोडण्यात आले आहे. दोन डब्यांना जोडणाºयांना कपलिंगला इंटरलिंक दरवाजे करण्यात आले आहे तर स्लाईडींग विंडो करण्यात आल्या आहेत. नवीन बोगी या अधिक वेगाने धावू शकणाºया असल्याने रेल परिषदेच्यावतीने पंचवटी एक्सप्रेसचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.रेल परिषदेचे अध्यक्ष बिपिन गांधी, गुरमित रावल, अशोक हुंडेकरी, पूजा लाहोटी यांनी ‘आदर्श पंचवटी एक्सप्रेस’साठी रेल्वेला सुचविलेल्या विविध कामांचा पाठपुरावा केला.नाशिकरोड स्थानकावर सकाळी आदर्श पंचवटी एक्सप्रेसचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार बबनराव घोलप, सुनील आडके, गुरमित रावल, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजू फोकणे आदिंसह पासधारक प्रवासी, रेल परिषदेचे पदाधिकारी, रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.--इन्फो--स्वागताची औपचारिकतापंचवटी एक्सप्रेसला आदर्श करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या  बिपीन गांधी यांचे रेल्वेस्थानकावरच दुर्देवी निधन झाल्याने पंचवटी एक्सप्रेसचे स्वागत अत्यंत साध्यापद्धतीने करण्यात आले. पंचवटीच्या स्वागतासाठी आगोदर जय्यत तयारी करण्यात आली होती. ढोलताशा, पेढे वाटप करण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता. मात्र गांधी यांच्या अकाली निधनामुळे स्वागताची केवळ औपचारिकता पार पाडण्यात आली. 

टॅग्स :NashikनाशिकRailway Passengerरेल्वे प्रवासी