शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी टाळला वीर सावरकरांच्या 'भारतरत्न'चा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2024 14:04 IST

काँग्रेसने सुरुवातीपासूनच संविधानाचा अपमान केला आहे. लोकसभेत त्यांनी केलेल्या अपप्रचाराला काही भोळे नागरिक बळी पडले. त्यांना जेव्हा त्यातील सत्य समजेल तेव्हा ते काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. याबद्दल ते काँग्रेसला कधीही माफ करणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्यासमोर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल बोलण्याचे आव्हान पंतप्रधान मोदी यांनी नाशिकमध्ये झालेल्या सभेत दिले असताना नाशिक दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांना सावरकरांना भारतरत्न केव्हा? असे विचारले असता त्यांनी याबाबत बोलणे टाळले. याबाबत आता बोलणे योग्य नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. १०) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री भारती पवार, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, प्रवक्ते लक्ष्मण सावजी, गोविंद बोरसे, गणेश कांबळे, अजित चव्हाण आदी उपस्थित होते. ते म्हणाले, संविधानाबाबत फेक नरेटिव्ह पसरवून लोकसभेत काँग्रेसने भारतीय नागरिकांची फसवणूक केली आहे. एकीकडे संविधानाबाबत खोटा कळवळा दाखवायचा आणि दुसरीकडे काश्मीरमध्ये संविधान लागू करण्यास विरोध करणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा, ही काँग्रेसची दुहेरी नीती लोकांना समजायला लागली आहे. काँग्रेसने सुरुवातीपासूनच संविधानाचा अपमान केला आहे. लोकसभेत त्यांनी केलेल्या अपप्रचाराला काही भोळे नागरिक बळी पडले. त्यांना जेव्हा त्यातील सत्य समजेल तेव्हा ते काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. याबद्दल ते काँग्रेसला कधीही माफ करणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

नाशिकमधून प्रकल्प पळवले जात आहेत, हादेखील फेक नरेटिव्ह आहे. देशातील प्रत्येक भागाचा विकास व्हायला हवा. एचएएलमध्ये विमानाचे सुटे भाग बनवण्याला मान्यता मिळाली तेव्हा त्याला विरोध करणारे आज नाशिकच्या विकासाचा जाब विचारत आहेत. पालघरला प्रकल्प आला तर नाशिकचा विकास होणार, पर्यायाने राज्याचा आणि देशाचाही विकास होणार, त्यामुळे त्यात राजकारण करणे चांगले नाही. उद्धवसेनेची विचारधारा बाळासाहेबांच्या विचारापेक्षा वेगळी आहे. सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या राहुल गांधी, मणिशंकर अय्यर यांना उद्धवसेना साथ देते हे न पटण्यासारखे आहे, असेही रिजिजू म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरBJPभाजपा