शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी टाळला वीर सावरकरांच्या 'भारतरत्न'चा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2024 14:04 IST

काँग्रेसने सुरुवातीपासूनच संविधानाचा अपमान केला आहे. लोकसभेत त्यांनी केलेल्या अपप्रचाराला काही भोळे नागरिक बळी पडले. त्यांना जेव्हा त्यातील सत्य समजेल तेव्हा ते काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. याबद्दल ते काँग्रेसला कधीही माफ करणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्यासमोर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल बोलण्याचे आव्हान पंतप्रधान मोदी यांनी नाशिकमध्ये झालेल्या सभेत दिले असताना नाशिक दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांना सावरकरांना भारतरत्न केव्हा? असे विचारले असता त्यांनी याबाबत बोलणे टाळले. याबाबत आता बोलणे योग्य नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. १०) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री भारती पवार, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, प्रवक्ते लक्ष्मण सावजी, गोविंद बोरसे, गणेश कांबळे, अजित चव्हाण आदी उपस्थित होते. ते म्हणाले, संविधानाबाबत फेक नरेटिव्ह पसरवून लोकसभेत काँग्रेसने भारतीय नागरिकांची फसवणूक केली आहे. एकीकडे संविधानाबाबत खोटा कळवळा दाखवायचा आणि दुसरीकडे काश्मीरमध्ये संविधान लागू करण्यास विरोध करणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा, ही काँग्रेसची दुहेरी नीती लोकांना समजायला लागली आहे. काँग्रेसने सुरुवातीपासूनच संविधानाचा अपमान केला आहे. लोकसभेत त्यांनी केलेल्या अपप्रचाराला काही भोळे नागरिक बळी पडले. त्यांना जेव्हा त्यातील सत्य समजेल तेव्हा ते काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. याबद्दल ते काँग्रेसला कधीही माफ करणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

नाशिकमधून प्रकल्प पळवले जात आहेत, हादेखील फेक नरेटिव्ह आहे. देशातील प्रत्येक भागाचा विकास व्हायला हवा. एचएएलमध्ये विमानाचे सुटे भाग बनवण्याला मान्यता मिळाली तेव्हा त्याला विरोध करणारे आज नाशिकच्या विकासाचा जाब विचारत आहेत. पालघरला प्रकल्प आला तर नाशिकचा विकास होणार, पर्यायाने राज्याचा आणि देशाचाही विकास होणार, त्यामुळे त्यात राजकारण करणे चांगले नाही. उद्धवसेनेची विचारधारा बाळासाहेबांच्या विचारापेक्षा वेगळी आहे. सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या राहुल गांधी, मणिशंकर अय्यर यांना उद्धवसेना साथ देते हे न पटण्यासारखे आहे, असेही रिजिजू म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरBJPभाजपा