शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

करउद्रेक थांबविण्यासाठी ‘महाजन’ मध्यस्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:48 AM

नाशिक : महापालिकेच्या करवसुलीच्या विरोधात गावठाणे आणि विविध व्यावसायिक संघटनांच्या बैठकांचे सत्र सुरूच असून, स्थानिक पातळीवरील भाजपाचे नेतृत्व हतबल झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता ही करवाढ अंगलट येऊ नये आणि नागरिकांच्या भावना ऐकून तोडगा काढावा यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांना मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचा तोडगा : जनतेचा आवाज ऐकणार; शिक्षण संस्था, शेतकरी, औद्योगिक संघटनांशी करणार चर्चा

नाशिक : महापालिकेच्या करवसुलीच्या विरोधात गावठाणे आणि विविध व्यावसायिक संघटनांच्या बैठकांचे सत्र सुरूच असून, स्थानिक पातळीवरील भाजपाचे नेतृत्व हतबल झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता ही करवाढ अंगलट येऊ नये आणि नागरिकांच्या भावना ऐकून तोडगा काढावा यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांना मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली आहे.भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळसाहेब सानप आणि आमदार सीमा हिरे यांनी मंगळवारी (दि. १७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईत भेट घेतली आणि शहरातील करसमस्येविषयी माहिती दिली. महापालिका प्रशासनाने १ एप्रिलपासून सर्व निवासी मिळकती तसेच शेती व औद्योगिक क्षेत्र तसेच शिक्षण संस्थांच्या मिळकतींवर करवाढ लागू केली आहे. त्यामुळे कृती समिती, मी नाशिककर अशा विविध नावांखाली संस्थांनी संघटन करून विरोध करण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळेच नाशिक शहरातील वातावरण सत्तारूढ भाजपाच्या विरोधात जात असून, त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मेळाव्यात आता नाशिकमध्ये आमदार सानप आणि सीमा हिरे सहभागीही झाले आहेत. याशिवाय निमा, आयमा, वकील अशा व्यावसायिकांच्या संघटनांनीदेखील करवाढीच्या विरोधात आंदोलनांना पाठिंबा दिला आहे.आयुक्त तुकाराम मुंढे यांना करवाढीबाबत भाजपाचे शिष्टमंडळे भेटून उपयोग झालेला नाही. त्यामुळे आता भाजपा आमदारांनी मुख्यमंत्र्यांचा धावा सुरू केला आहे. मंगळवारी (दि. १७) याबाबत आमदारद्वयींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि शहरात करामुळे निर्माण झालेल्या उद्रेकाविषयी माहिती दिली. त्यावर चालू आठवड्यात पालकमंत्री गिरीश महाजन हे नाशिक दौºयावर येणार असून, ते सर्व शेतकरी, शिक्षण संस्थाचालक, औद्योगिक संघटना आणि अन्य नागरी संघटनांशी चर्चा करणार आहेत. त्यांच्या भावना आणि अडचणी समजावून घेऊन ते प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे सीमा हिरे यांनी कळविले आहे. महापालिकेने केलेली करवाढ नियमित घरपट्टीत १८ टक्के वाढ करण्यात आली आहे. याशिवाय बिगरनिवासी आणि औद्योगिक क्षेत्रातही भरीव वाढ केली असून, ती ८३ टक्क्यांपर्यंत गेली आहे. याशिवाय नवीन मिळकती तसेच खुल्या भूखंडासाठी भाडेमूल्य निश्चित करण्यात आले असून, त्यामुळे नव्या मिळकतींना करवाढीचा मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. खुल्या भूखंडावरील करवाढीमुळे शेती क्षेत्रावर कर लागू होणार तो किमान ६५हजार प्रति एकर असेल, असे सांगितले जात आहे.