शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

कमी दाबाने मिळतेय आवर्तनाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 6:41 PM

मनमाड शहरासाठी सोडण्यात आलले पालखेड धरणाचे पाणी पोहचण्यास आधीच विलंब झालेला असताना पुर्ण क्षमतेने पाणी पाटोदा साठवण तलावात पडत नसल्याने गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देपाणी टंचाई :मनमाडकरांचा दुष्काळात तेरावा महिना !

मनमाड: मनमाड शहरासाठी सोडण्यात आलले पालखेड धरणाचे पाणी पोहचण्यास आधीच विलंब झालेला असताना पुर्ण क्षमतेने पाणी पाटोदा साठवण तलावात पडत नसल्याने गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे. सव्वा लाख लोकसंखेच्या मनमाड शहराची तहान भागवणारा पाटोदा साठवणूक तलाव पुर्ण क्षमतेने भरून देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.मनमाड शहरासाठी पालखेड धरणाच्या पाण्याचे आवर्तन १ मार्च रोजी सोडले जाणार होते.मात्र काही तांत्रीक अडचणींमुळे हा कालावधी लांबत जाउन पिण्याच्या पाण्याचे रोटेशन दहा ते बारा दिवस उशीराने सोडण्यात आले .पालखेड धरणातून कॅनाल द्वारे निघालेले पाणी गुरूवारी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाटोदा येथील साठवण तलावात आवर्तण सोडल्यानंतर तब्बल पाच दिवसांच्या विलंबाने पोहचले.मात्र हे पाणी पुर्ण क्षमतेने व पुर्ण दाबाने पोहचत नसल्याने गंभीर परिस्थीती निर्माण झाली आहे.पाटबंधारे प्रशासनाने चार पंपाचे पाणी सुरू ठेवावे आणि पाटोदा साठवणुक तलाव भरून द्यावा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे गटनेते गणेश धात्रक यांनी दिला आहे.शहराची गंभीर पाणी टंचाई लक्षात घेता ४० द.ल.घ.फु. पाणी मिळणे अपेक्षीत आहे.हे पाणी पुढील रोटेशन मिळेपर्यंत म्हणजे मे महिन्याच्या अखेरपर्यंत पुरवावे लागणार आहे.पालीकेच्या शिष्टमंळडळाने पाटोदा साठवण तलावावर भेट देउन पहाणी केली. या वेळी शिवसेनेचे जेष्ठ नेते अलताफ खान, शहरप्रमुख मयूर बोरसे,विजय मिश्रा, गालीब शेख, पापा थॉमस, बब्बू कुरेशी,स्वराज देशमुख आदी उपस्थित होते.पाणीटंचाई पाचविला पुजलेल्या मनमाडकरांना गेल्या काही महिन्यांपुर्वी दहा ते बारा दिवसाआड होणाºया पाणी पुरवठ्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. या पाणीपुरवठ्याच्या दिवसांमधे वाढ होत जाउन तो कालावधी आज २० दिवसांच्या वर जाउन पोहचला आहे. त्यातच आवर्तण सुटण्यास झालेला विलंब व आता कमी दाबाने मिळणारे आवर्तणाचे पाणी या मुळे दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी