शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

किसानसभेच्या लाँग मार्चची मुंबईच्या दिशेने आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 12:13 IST

एकचा नारा, सातबारा कोरो, दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा, महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा आदी प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचे हजारो शेतकरी, आदीवासी लॉंग मार्च करीत नाशकातून मुंबईच्या दिशेने आगेकुच करीत निघाले आहे. 

ठळक मुद्देशेतकरी, आदिवासींचा नाशिक मुंबई लाँग मार्चमुंबईत 27 मार्चाला विधानसभेवर धडकणार सरकारने यापूर्वी दिलेले आश्वासन पाळले नसल्याचा किसान सभेचा आरोप

नाशिक - एकचा नारा, सातबारा कोरो, दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा, महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा आदी प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचे हजारो शेतकरी, आदीवासी लॉंग मार्च करीत नाशकातून मुंबईच्या दिशेने आगेकुच करीत निघाले आहे. शेतकऱ्याच्या व आदीवासींच्या प्रश्नावर बुधवारी (दि.२०) दिवसभरात राज्यातील विविध जिल्ह्यांमधून हजारोंच्या संख्येने शेतकरी, आदिवासी नाशिक मुक्कामी आले होते. त्यामुळे पुढील परीस्थितीचे गांभीर्य ओळखून शासकीय विश्रामगृहातील शिवनेरी दालनात जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे, आमदार जिवा पांडू गावित, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या शिष्टमंडळाने तब्बल अडीच तास चर्चा केली. पंरुतु, तोडगा निघू न शकल्याने रात्री पुन्हा दीड तास चर्चा झाली, परंतु, ही चर्चा निष्फळ झाल्याने गुरुवारी (दि.२०) सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारेस नाशिकवरून मुंबईच्या दिशेने ‘लॉँग मार्च’ चा सरुवात झाली. प्रथम मोर्चेकऱ्यांची वाहने  पुढे निघाल्यानंतर पाठीमागून एकामागून एक शेतकऱ्यांची पाऊले निघूल लागल्याने संपूर्ण मुंबईनाका परिसारत लाल वादळ  घोंगावत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, मोर्चाकऱ्यांमुळे मुंबईनाका परिसरात वाहतूकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याने बारावीच्या परीक्षेचा परिलाच पेपर देण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे काही प्रमाणात हाल झाले. पोलिसांनी चोख बंदोबस्त राखत ठराविक अंतराने वाहतुकीला रस्ता करून दिल्याने परीक्षार्थींना दिलासा मिळाला.

दरम्यान. किसान सभेच्या या मोर्चात नाशिकचे माजी खासदार समीर भूजबळ यांच्यासह माजी आमदार नितीन भोसले, जयंत जाधव, जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. त्यांनी इंदिरानगरपर्यंत लाँगमार्चमध्ये सहभाग घेतला. मुंबई नाका परिसरातून निघालेला मोर्चा पाथर्डी फाटा परिसरात पोहचला असता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोर्चेकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याने येथे काहीकाळ मोर्चा थांबल्यानंतर पुन्हा मुंबईच्या दिशेने आगेकूच करणार आहे. 

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकKisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चFarmerशेतकरीforestजंगल