शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

किसानसभेच्या लाँग मार्चची मुंबईच्या दिशेने आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 12:13 IST

एकचा नारा, सातबारा कोरो, दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा, महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा आदी प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचे हजारो शेतकरी, आदीवासी लॉंग मार्च करीत नाशकातून मुंबईच्या दिशेने आगेकुच करीत निघाले आहे. 

ठळक मुद्देशेतकरी, आदिवासींचा नाशिक मुंबई लाँग मार्चमुंबईत 27 मार्चाला विधानसभेवर धडकणार सरकारने यापूर्वी दिलेले आश्वासन पाळले नसल्याचा किसान सभेचा आरोप

नाशिक - एकचा नारा, सातबारा कोरो, दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा, महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा आदी प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचे हजारो शेतकरी, आदीवासी लॉंग मार्च करीत नाशकातून मुंबईच्या दिशेने आगेकुच करीत निघाले आहे. शेतकऱ्याच्या व आदीवासींच्या प्रश्नावर बुधवारी (दि.२०) दिवसभरात राज्यातील विविध जिल्ह्यांमधून हजारोंच्या संख्येने शेतकरी, आदिवासी नाशिक मुक्कामी आले होते. त्यामुळे पुढील परीस्थितीचे गांभीर्य ओळखून शासकीय विश्रामगृहातील शिवनेरी दालनात जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे, आमदार जिवा पांडू गावित, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या शिष्टमंडळाने तब्बल अडीच तास चर्चा केली. पंरुतु, तोडगा निघू न शकल्याने रात्री पुन्हा दीड तास चर्चा झाली, परंतु, ही चर्चा निष्फळ झाल्याने गुरुवारी (दि.२०) सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारेस नाशिकवरून मुंबईच्या दिशेने ‘लॉँग मार्च’ चा सरुवात झाली. प्रथम मोर्चेकऱ्यांची वाहने  पुढे निघाल्यानंतर पाठीमागून एकामागून एक शेतकऱ्यांची पाऊले निघूल लागल्याने संपूर्ण मुंबईनाका परिसारत लाल वादळ  घोंगावत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, मोर्चाकऱ्यांमुळे मुंबईनाका परिसरात वाहतूकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याने बारावीच्या परीक्षेचा परिलाच पेपर देण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे काही प्रमाणात हाल झाले. पोलिसांनी चोख बंदोबस्त राखत ठराविक अंतराने वाहतुकीला रस्ता करून दिल्याने परीक्षार्थींना दिलासा मिळाला.

दरम्यान. किसान सभेच्या या मोर्चात नाशिकचे माजी खासदार समीर भूजबळ यांच्यासह माजी आमदार नितीन भोसले, जयंत जाधव, जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. त्यांनी इंदिरानगरपर्यंत लाँगमार्चमध्ये सहभाग घेतला. मुंबई नाका परिसरातून निघालेला मोर्चा पाथर्डी फाटा परिसरात पोहचला असता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मोर्चेकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याने येथे काहीकाळ मोर्चा थांबल्यानंतर पुन्हा मुंबईच्या दिशेने आगेकूच करणार आहे. 

टॅग्स :agitationआंदोलनNashikनाशिकKisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चFarmerशेतकरीforestजंगल