शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

श्ोतकऱ्यांनो, घाबरून जाऊ नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 1:04 AM

कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदी केली असली तरी, त्याचा बाजारभावावर विशेष परिणाम जाणवणार नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरून न जाता टप्याटप्याने कांदा विक्रीसाठी बाजारात आणावा, असे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी आणि काही व्यापाºयांनी व्यक्त केले आहे.

नाशिक : कांदा दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदी केली असली तरी, त्याचा बाजारभावावर विशेष परिणाम जाणवणार नाही. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरून न जाता टप्याटप्याने कांदा विक्रीसाठी बाजारात आणावा, असे मत कृषी क्षेत्रातील जाणकारांनी आणि काही व्यापाºयांनी व्यक्त केले आहे.मागील काही दिवसांपासून देशभरात कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने तब्बल चार वर्षांनंतर कांदा उत्पादकांना कांद्यापासून बºयापैकी आर्थिक उत्पन्न मिळू लागले आहे. घाऊक बाजारात दर वाढल्याने किरकोळ बाजारातही कांद्याने उच्चांकी दर गाठला आहे. परिणामी केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असली तरी, केंद्र शासनाचा हा निर्णय म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणण्याचा प्रकार असल्याचे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. दर वाढल्याने केंद्र शासनाने प्रथम कांदा निर्यात किमान मूल्य वाढविले, मात्र तरीही दर कमी झाले नाहीत. यावर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे कांद्याचे नुकसान झाले आहे. परिणामी कांद्याची मागणी आणि पुरवठा यात तफावत निर्माण झाल्याने नैसर्गिकरीत्या कांद्याच्या दरात वाढ झाली आहे, असे मत सह्याद्री फार्मस् प्रोड्युस कंपनीचे संचालक विलास शिंदे यांनी व्यक्त केले. सध्या स्थानिक बाजारातच मागणी अधिक आहे.दक्षिणेकडील राज्यांमधील कांदा अद्याप बाजारात आलेला नाही. त्याचबरोबर किमान निर्यातमूल्यही वाढलेले असल्याने कांद्याची निर्यात तशीही एक-दोन टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन फारसे काही साध्य होईल असे दिसत नाही. या निर्णयामुळे केवळ दबाव टाकण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यातून कांदा उत्पादकांबरोबरच आपल्या निर्यातीचेही नुकसान होणार आहे. नवीन कांदा बाजारात येण्यासाठी अद्याप महिनाभराचा अवधी आहे.निर्यात बंदी केल्याने लगेचच कांद्याचे दर खाली येतील असे होणार नाही. त्यामुळे शेतकºयांनी घाबरून न जाता आपल्याकडील कांदा टप्याटप्याने बाजारात विक्रीसाठी आणावा, असा सल्ला विलास शिंदे यांनी दिला आहे.शेतकºयांकडेही लक्ष द्यावेसध्या बाजारात नवीन कांदा आलेला नाही. जो कांदा देशात उपलब्ध आहे तो आपल्या देशातील नागरिकांना पुरवता यावा या हेतूने केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. शहरी भागातील ग्राहकांकडे लक्ष देताना शेतकºयांचे नुकसान होणार नाही, याकडेही शासनाने लक्ष द्यायला हवे. सध्या देशातून होणारी कांद्याची निर्यात नगण्य आहे. मात्र या निर्णयाचा नागरिकांवर मानसिक परिणाम होऊ शकेल, असे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका कांदा व्यापाºयाने सांगितले.

टॅग्स :onionकांदाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र