शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

बापरे! शिक्षणाच्या ओढीने विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; होताहेत प्रचंड हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 16:25 IST

त्र्यंबकेश्वर/ देवगाव : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे यासाठी एक महिन्यापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू ...

त्र्यंबकेश्वर/ देवगाव : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे यासाठी एक महिन्यापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली तरीही कर्मचारी विलीनीकरणावर ठाम आहेत. एसटीची सेवा ठप्प असल्याने याचा मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांसह आता विद्यार्थ्यांनादेखील बसत आहे. दिवाळीपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या आहे. परिणामी शाळा-महाविद्यालय गाठणाऱ्या विद्यार्थ्यांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे एसटीचा संप कधी मिटणार, असा सवाल विद्यार्थ्यांसह प्रवाशांमधून उपस्थित होत आहे.

शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गावानजीकच्या मोठ्या गावांमध्ये धाव घेत असतात. शाळा गाठण्यासाठी विद्यार्थी एसटीने दररोज प्रवास करतात. परंतु, एसटी बंद असल्याने शाळा गाठावी कशी असा प्रश्न सध्या विद्यार्थ्यांसमोर पडला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी कडाक्याच्या थंडीत सकाळी सकाळी जे मिळेल त्या वाहनाची वाट बघत लागते. त्यातही जागा मिळेल याची शाश्वती नाही. मात्र, शिक्षणाच्या काळजीपोटी विद्यार्थी मिळेल त्या जागेवरून प्रवास करत आपली शाळा गाठतात.

अव्वाच्या सव्वा भाडे

कोरोनामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे दोन वर्ष पूर्णपणे वाया गेले. नेटवर्कअभावी व महागड्या रिचार्जअभावी ऑनलाइन अध्ययन पद्धती प्रभावी न ठरल्यामुळे शाळा सुरू होते न होते विद्यार्थ्यांनी शाळेची वाट पकडून शिक्षणाची कास धरली. मात्र, बसअभावी विद्यार्थ्यांची परवड होत असून, खासगी वाहनांच्या पर्यायामुळे अव्वाच्या सव्वा भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. त्यातही जागा नसेल तर कधी टपावर तर कधी लटकून असा दररोजच प्रवास करावा लागत आहे.

सन १९९८-९९ या वर्षात देवगाव शासकीय आश्रमशाळा फक्त मुलींसाठीच रूपांतर झाल्यानंतर देवगाव परिसरातील विद्यार्थ्यांची परवड होऊ लागली. देवगावसह चंद्राची मेट, हुंबाची मेट, बोरीचीवाडी, श्रीघाट, टाकेदेवगाव, येल्याची मेट, बर्ड्याचीवाडी, वावीहर्ष, झारवड बु. आदी गावांतील विद्यार्थ्यांनी दहा ते पंधरा किमी असलेल्या वैतरणा येथील शाळेची वाट धरली. मात्र, मागील दोन ते अडीच वर्षात विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर परवड झाली असून, आता तर बसअभावी धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

अनेक समस्यांचा डोंगर

ऑक्टोबर महिन्यापासून इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग नियमितपणे सुरू झाले. पण कोविडनंतर शिक्षणाची दारे खऱ्या अर्थाने एसटी संपामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यनाला ब्रेक लागला आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी एसटी मुख्य जीवनवाहिनी मानली जाते, मात्र एसटीचा संप असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना अनेक समस्या व अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शाळेत जाण्यासाठी व येण्यासाठी एसटी बसचा प्रवास विद्यार्थ्यांना सोयीचा पडतो, मात्र आता एसटी बंद असल्याने खासगी वाहनाचे वाढीव भाडे विद्यार्थ्यांना परवडत नाही, परिणामी रखरखत्या उन्हात, थंडी गारठ्यात विद्यार्थ्यांना वाहनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा श्रम, वेळ व पैसे वाया जात आहे, तर शिक्षणालादेखील ब्रेक लागत आहे.

 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीNashikनाशिक