शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

बापरे! शिक्षणाच्या ओढीने विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; होताहेत प्रचंड हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 16:25 IST

त्र्यंबकेश्वर/ देवगाव : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे यासाठी एक महिन्यापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू ...

त्र्यंबकेश्वर/ देवगाव : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे यासाठी एक महिन्यापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली तरीही कर्मचारी विलीनीकरणावर ठाम आहेत. एसटीची सेवा ठप्प असल्याने याचा मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांसह आता विद्यार्थ्यांनादेखील बसत आहे. दिवाळीपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या आहे. परिणामी शाळा-महाविद्यालय गाठणाऱ्या विद्यार्थ्यांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे एसटीचा संप कधी मिटणार, असा सवाल विद्यार्थ्यांसह प्रवाशांमधून उपस्थित होत आहे.

शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गावानजीकच्या मोठ्या गावांमध्ये धाव घेत असतात. शाळा गाठण्यासाठी विद्यार्थी एसटीने दररोज प्रवास करतात. परंतु, एसटी बंद असल्याने शाळा गाठावी कशी असा प्रश्न सध्या विद्यार्थ्यांसमोर पडला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी कडाक्याच्या थंडीत सकाळी सकाळी जे मिळेल त्या वाहनाची वाट बघत लागते. त्यातही जागा मिळेल याची शाश्वती नाही. मात्र, शिक्षणाच्या काळजीपोटी विद्यार्थी मिळेल त्या जागेवरून प्रवास करत आपली शाळा गाठतात.

अव्वाच्या सव्वा भाडे

कोरोनामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे दोन वर्ष पूर्णपणे वाया गेले. नेटवर्कअभावी व महागड्या रिचार्जअभावी ऑनलाइन अध्ययन पद्धती प्रभावी न ठरल्यामुळे शाळा सुरू होते न होते विद्यार्थ्यांनी शाळेची वाट पकडून शिक्षणाची कास धरली. मात्र, बसअभावी विद्यार्थ्यांची परवड होत असून, खासगी वाहनांच्या पर्यायामुळे अव्वाच्या सव्वा भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. त्यातही जागा नसेल तर कधी टपावर तर कधी लटकून असा दररोजच प्रवास करावा लागत आहे.

सन १९९८-९९ या वर्षात देवगाव शासकीय आश्रमशाळा फक्त मुलींसाठीच रूपांतर झाल्यानंतर देवगाव परिसरातील विद्यार्थ्यांची परवड होऊ लागली. देवगावसह चंद्राची मेट, हुंबाची मेट, बोरीचीवाडी, श्रीघाट, टाकेदेवगाव, येल्याची मेट, बर्ड्याचीवाडी, वावीहर्ष, झारवड बु. आदी गावांतील विद्यार्थ्यांनी दहा ते पंधरा किमी असलेल्या वैतरणा येथील शाळेची वाट धरली. मात्र, मागील दोन ते अडीच वर्षात विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर परवड झाली असून, आता तर बसअभावी धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

अनेक समस्यांचा डोंगर

ऑक्टोबर महिन्यापासून इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग नियमितपणे सुरू झाले. पण कोविडनंतर शिक्षणाची दारे खऱ्या अर्थाने एसटी संपामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यनाला ब्रेक लागला आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी एसटी मुख्य जीवनवाहिनी मानली जाते, मात्र एसटीचा संप असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना अनेक समस्या व अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शाळेत जाण्यासाठी व येण्यासाठी एसटी बसचा प्रवास विद्यार्थ्यांना सोयीचा पडतो, मात्र आता एसटी बंद असल्याने खासगी वाहनाचे वाढीव भाडे विद्यार्थ्यांना परवडत नाही, परिणामी रखरखत्या उन्हात, थंडी गारठ्यात विद्यार्थ्यांना वाहनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा श्रम, वेळ व पैसे वाया जात आहे, तर शिक्षणालादेखील ब्रेक लागत आहे.

 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीNashikनाशिक