शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

बापरे! शिक्षणाच्या ओढीने विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; होताहेत प्रचंड हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 16:25 IST

त्र्यंबकेश्वर/ देवगाव : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे यासाठी एक महिन्यापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू ...

त्र्यंबकेश्वर/ देवगाव : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे यासाठी एक महिन्यापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली तरीही कर्मचारी विलीनीकरणावर ठाम आहेत. एसटीची सेवा ठप्प असल्याने याचा मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांसह आता विद्यार्थ्यांनादेखील बसत आहे. दिवाळीपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या आहे. परिणामी शाळा-महाविद्यालय गाठणाऱ्या विद्यार्थ्यांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे एसटीचा संप कधी मिटणार, असा सवाल विद्यार्थ्यांसह प्रवाशांमधून उपस्थित होत आहे.

शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गावानजीकच्या मोठ्या गावांमध्ये धाव घेत असतात. शाळा गाठण्यासाठी विद्यार्थी एसटीने दररोज प्रवास करतात. परंतु, एसटी बंद असल्याने शाळा गाठावी कशी असा प्रश्न सध्या विद्यार्थ्यांसमोर पडला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी कडाक्याच्या थंडीत सकाळी सकाळी जे मिळेल त्या वाहनाची वाट बघत लागते. त्यातही जागा मिळेल याची शाश्वती नाही. मात्र, शिक्षणाच्या काळजीपोटी विद्यार्थी मिळेल त्या जागेवरून प्रवास करत आपली शाळा गाठतात.

अव्वाच्या सव्वा भाडे

कोरोनामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे दोन वर्ष पूर्णपणे वाया गेले. नेटवर्कअभावी व महागड्या रिचार्जअभावी ऑनलाइन अध्ययन पद्धती प्रभावी न ठरल्यामुळे शाळा सुरू होते न होते विद्यार्थ्यांनी शाळेची वाट पकडून शिक्षणाची कास धरली. मात्र, बसअभावी विद्यार्थ्यांची परवड होत असून, खासगी वाहनांच्या पर्यायामुळे अव्वाच्या सव्वा भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. त्यातही जागा नसेल तर कधी टपावर तर कधी लटकून असा दररोजच प्रवास करावा लागत आहे.

सन १९९८-९९ या वर्षात देवगाव शासकीय आश्रमशाळा फक्त मुलींसाठीच रूपांतर झाल्यानंतर देवगाव परिसरातील विद्यार्थ्यांची परवड होऊ लागली. देवगावसह चंद्राची मेट, हुंबाची मेट, बोरीचीवाडी, श्रीघाट, टाकेदेवगाव, येल्याची मेट, बर्ड्याचीवाडी, वावीहर्ष, झारवड बु. आदी गावांतील विद्यार्थ्यांनी दहा ते पंधरा किमी असलेल्या वैतरणा येथील शाळेची वाट धरली. मात्र, मागील दोन ते अडीच वर्षात विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर परवड झाली असून, आता तर बसअभावी धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

अनेक समस्यांचा डोंगर

ऑक्टोबर महिन्यापासून इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग नियमितपणे सुरू झाले. पण कोविडनंतर शिक्षणाची दारे खऱ्या अर्थाने एसटी संपामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यनाला ब्रेक लागला आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी एसटी मुख्य जीवनवाहिनी मानली जाते, मात्र एसटीचा संप असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना अनेक समस्या व अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शाळेत जाण्यासाठी व येण्यासाठी एसटी बसचा प्रवास विद्यार्थ्यांना सोयीचा पडतो, मात्र आता एसटी बंद असल्याने खासगी वाहनाचे वाढीव भाडे विद्यार्थ्यांना परवडत नाही, परिणामी रखरखत्या उन्हात, थंडी गारठ्यात विद्यार्थ्यांना वाहनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा श्रम, वेळ व पैसे वाया जात आहे, तर शिक्षणालादेखील ब्रेक लागत आहे.

 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीNashikनाशिक