शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

बापरे! शिक्षणाच्या ओढीने विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; होताहेत प्रचंड हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 16:25 IST

त्र्यंबकेश्वर/ देवगाव : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे यासाठी एक महिन्यापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू ...

त्र्यंबकेश्वर/ देवगाव : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे यासाठी एक महिन्यापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली तरीही कर्मचारी विलीनीकरणावर ठाम आहेत. एसटीची सेवा ठप्प असल्याने याचा मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांसह आता विद्यार्थ्यांनादेखील बसत आहे. दिवाळीपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या आहे. परिणामी शाळा-महाविद्यालय गाठणाऱ्या विद्यार्थ्यांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे एसटीचा संप कधी मिटणार, असा सवाल विद्यार्थ्यांसह प्रवाशांमधून उपस्थित होत आहे.

शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गावानजीकच्या मोठ्या गावांमध्ये धाव घेत असतात. शाळा गाठण्यासाठी विद्यार्थी एसटीने दररोज प्रवास करतात. परंतु, एसटी बंद असल्याने शाळा गाठावी कशी असा प्रश्न सध्या विद्यार्थ्यांसमोर पडला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी कडाक्याच्या थंडीत सकाळी सकाळी जे मिळेल त्या वाहनाची वाट बघत लागते. त्यातही जागा मिळेल याची शाश्वती नाही. मात्र, शिक्षणाच्या काळजीपोटी विद्यार्थी मिळेल त्या जागेवरून प्रवास करत आपली शाळा गाठतात.

अव्वाच्या सव्वा भाडे

कोरोनामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे दोन वर्ष पूर्णपणे वाया गेले. नेटवर्कअभावी व महागड्या रिचार्जअभावी ऑनलाइन अध्ययन पद्धती प्रभावी न ठरल्यामुळे शाळा सुरू होते न होते विद्यार्थ्यांनी शाळेची वाट पकडून शिक्षणाची कास धरली. मात्र, बसअभावी विद्यार्थ्यांची परवड होत असून, खासगी वाहनांच्या पर्यायामुळे अव्वाच्या सव्वा भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. त्यातही जागा नसेल तर कधी टपावर तर कधी लटकून असा दररोजच प्रवास करावा लागत आहे.

सन १९९८-९९ या वर्षात देवगाव शासकीय आश्रमशाळा फक्त मुलींसाठीच रूपांतर झाल्यानंतर देवगाव परिसरातील विद्यार्थ्यांची परवड होऊ लागली. देवगावसह चंद्राची मेट, हुंबाची मेट, बोरीचीवाडी, श्रीघाट, टाकेदेवगाव, येल्याची मेट, बर्ड्याचीवाडी, वावीहर्ष, झारवड बु. आदी गावांतील विद्यार्थ्यांनी दहा ते पंधरा किमी असलेल्या वैतरणा येथील शाळेची वाट धरली. मात्र, मागील दोन ते अडीच वर्षात विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर परवड झाली असून, आता तर बसअभावी धोकादायक प्रवास करावा लागत आहे.

अनेक समस्यांचा डोंगर

ऑक्टोबर महिन्यापासून इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग नियमितपणे सुरू झाले. पण कोविडनंतर शिक्षणाची दारे खऱ्या अर्थाने एसटी संपामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यनाला ब्रेक लागला आहे. सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी एसटी मुख्य जीवनवाहिनी मानली जाते, मात्र एसटीचा संप असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना अनेक समस्या व अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शाळेत जाण्यासाठी व येण्यासाठी एसटी बसचा प्रवास विद्यार्थ्यांना सोयीचा पडतो, मात्र आता एसटी बंद असल्याने खासगी वाहनाचे वाढीव भाडे विद्यार्थ्यांना परवडत नाही, परिणामी रखरखत्या उन्हात, थंडी गारठ्यात विद्यार्थ्यांना वाहनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा श्रम, वेळ व पैसे वाया जात आहे, तर शिक्षणालादेखील ब्रेक लागत आहे.

 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीNashikनाशिक