शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

मालेगावच्या ग्रामीण भागात जनजीवन ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:13 IST

जळगाव निंबायती : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातदेखील कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू लागले आहे. सदर ...

जळगाव निंबायती : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातदेखील कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू लागले आहे. सदर संसर्ग रोखण्यासाठी शासनाने 'मिशन ब्रेक द चेन' मोहीमेतंर्गत संचारबंदी लागू केल्यामुळे शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

कोरोनाची दुसरी लाट गावात पसरू नये यासाठी, मालेगाव तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी यापूर्वीच २५ मार्चपासूनच स्वयंस्फूर्तीने गावात कडकडीतपणे बंद पुकारले होते. त्याला ग्रामस्थांचे पूर्णपणे सहकार्य मिळाले होते. सद्यस्थितीत ग्रामपंचायती मार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असून, ‘मिशन ब्रेक द चेन’ च्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी कडकडीतपणे बंद पाळण्यात येत आहे. आरोग्य खात्याच्या सहकार्याने गावात आरोग्य सर्वेक्षण, कोरोना चाचणी, गावातच लसीकरण केंद्र, फवारणी, सॅनिटायझरचा वापर, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई, शासन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच गृहविलगीकरणावर प्रामुख्याने भर देण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील प्रशासनाची संपूर्ण जबाबदारी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, पोलीसपाटील, तलाठी, कोतवाल व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. शहरी भागाप्रमाणे गावपातळीवर पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करणे शक्य नसल्याने स्थानिक प्रशासनावरच सर्वस्वी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील नागरिकांनीदेखील कोरोनाची मोठी धास्ती घेऊन घरीच राहणे पसंत केले आहे. मात्र रोजंदारीने काम करणाऱ्या सामान्य व गरीब लोकांची यामुळे मोठी कोंडी झाली आहे. शेती व त्यासंबंधी उद्योगांना सूट असली तरी या दिवसात शेतीची जवळपास बहुतांश कामे आटोपलेली असतात. गावातील कापड दुकान, जनरल स्टोअर्स, स्टेशनरी, हार्डवेअर, सोनारचे दुकान, सुतारकाम, लोहारकाम, कुंभारकाम, शिवणकाम, चांभारकाम, मोबाइल दुरुस्ती, इलेक्ट्रॉनिक्स, रिक्षाचालक आदी व्यवसाय पूर्णपणे बंद झाल्याने त्यांच्यावर आधारित लोकांची पुरती कोंडी झाली आहे. टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेली मदत लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

कोट...

शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी मिळत नसल्याने गावातच सरकार सेवा केंद्र सुरू केले होते. या माध्यमातून आधारकार्डवरील माहिती अद्ययावत करणे, विविध शासकीय दाखले ऑनलाइन काढणे, ऑनलाइन अर्ज भरणे आदी कामे केली जात होती. नागरिकांना गावातच सुविधा उपलब्ध होती. मात्र मिनी लाॅकडाऊनमुळे सेवा केंद्र बंद असल्याने परिवाराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- युवराज आहेर, जळगाव निंबायती

कोट...

इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत मी नोकरीला आहे. वर्षभर शाळा बंद असल्यामुळे पगार मिळाला नाही. म्हणून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मुलांच्या खासगी शिकवणीचे वर्ग घेऊन गावातच रोजगार उपलब्ध केला होता. मात्र शासनाने लावलेल्या टाळेबंदीमुळे मुलांकडे क्लासची फी अडकली असून, पुन्हा एकदा आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची वेळ आहे.

- सिद्धार्थ अहिरे, चोंडी