शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
6
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
7
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
8
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
9
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
10
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
11
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
12
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
13
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
14
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
15
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
16
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
17
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
18
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
19
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
20
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."

मालेगावच्या ग्रामीण भागात जनजीवन ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:13 IST

जळगाव निंबायती : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातदेखील कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू लागले आहे. सदर ...

जळगाव निंबायती : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातदेखील कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू लागले आहे. सदर संसर्ग रोखण्यासाठी शासनाने 'मिशन ब्रेक द चेन' मोहीमेतंर्गत संचारबंदी लागू केल्यामुळे शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

कोरोनाची दुसरी लाट गावात पसरू नये यासाठी, मालेगाव तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी यापूर्वीच २५ मार्चपासूनच स्वयंस्फूर्तीने गावात कडकडीतपणे बंद पुकारले होते. त्याला ग्रामस्थांचे पूर्णपणे सहकार्य मिळाले होते. सद्यस्थितीत ग्रामपंचायती मार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असून, ‘मिशन ब्रेक द चेन’ च्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी कडकडीतपणे बंद पाळण्यात येत आहे. आरोग्य खात्याच्या सहकार्याने गावात आरोग्य सर्वेक्षण, कोरोना चाचणी, गावातच लसीकरण केंद्र, फवारणी, सॅनिटायझरचा वापर, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई, शासन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच गृहविलगीकरणावर प्रामुख्याने भर देण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील प्रशासनाची संपूर्ण जबाबदारी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, पोलीसपाटील, तलाठी, कोतवाल व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. शहरी भागाप्रमाणे गावपातळीवर पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करणे शक्य नसल्याने स्थानिक प्रशासनावरच सर्वस्वी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील नागरिकांनीदेखील कोरोनाची मोठी धास्ती घेऊन घरीच राहणे पसंत केले आहे. मात्र रोजंदारीने काम करणाऱ्या सामान्य व गरीब लोकांची यामुळे मोठी कोंडी झाली आहे. शेती व त्यासंबंधी उद्योगांना सूट असली तरी या दिवसात शेतीची जवळपास बहुतांश कामे आटोपलेली असतात. गावातील कापड दुकान, जनरल स्टोअर्स, स्टेशनरी, हार्डवेअर, सोनारचे दुकान, सुतारकाम, लोहारकाम, कुंभारकाम, शिवणकाम, चांभारकाम, मोबाइल दुरुस्ती, इलेक्ट्रॉनिक्स, रिक्षाचालक आदी व्यवसाय पूर्णपणे बंद झाल्याने त्यांच्यावर आधारित लोकांची पुरती कोंडी झाली आहे. टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेली मदत लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

कोट...

शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी मिळत नसल्याने गावातच सरकार सेवा केंद्र सुरू केले होते. या माध्यमातून आधारकार्डवरील माहिती अद्ययावत करणे, विविध शासकीय दाखले ऑनलाइन काढणे, ऑनलाइन अर्ज भरणे आदी कामे केली जात होती. नागरिकांना गावातच सुविधा उपलब्ध होती. मात्र मिनी लाॅकडाऊनमुळे सेवा केंद्र बंद असल्याने परिवाराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- युवराज आहेर, जळगाव निंबायती

कोट...

इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत मी नोकरीला आहे. वर्षभर शाळा बंद असल्यामुळे पगार मिळाला नाही. म्हणून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मुलांच्या खासगी शिकवणीचे वर्ग घेऊन गावातच रोजगार उपलब्ध केला होता. मात्र शासनाने लावलेल्या टाळेबंदीमुळे मुलांकडे क्लासची फी अडकली असून, पुन्हा एकदा आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची वेळ आहे.

- सिद्धार्थ अहिरे, चोंडी