शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

सुरक्षित पाण्यासाठी राज्यातील युनिसेफकडून धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 01:34 IST

कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पाण्याचा वापर केला जातो. त्यानुसार पाण्यातील गुणवत्तेतदेखील परिणाम होत असतो. पाण्याची गुणवत्ता आणि उपयुक्तता टिकवून ठेवण्यासाठी शासनाचा पाणीपुरवठा विभाग आणि युनिसेफच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांना धडे दिले जात आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : ३४ जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांची उपस्थिती

नाशिक : कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पाण्याचा वापर केला जातो. त्यानुसार पाण्यातील गुणवत्तेतदेखील परिणाम होत असतो. पाण्याची गुणवत्ता आणि उपयुक्तता टिकवून ठेवण्यासाठी शासनाचा पाणीपुरवठा विभाग आणि युनिसेफच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांना धडे दिले जात आहेत.महाराष्ट्र शासनाचा पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि युनिसेफ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण या विषयावर महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी शहरात दोनदिवसीय कार्यशाळेस प्रारंभ झाला आहे. दोनदिवसीय कार्यशाळेत पाण्याची उपयुक्तता वाढविण्यावरील तंत्रज्ञान आणि उपचारांवर भर दिला जाणार आहे.पाण्याची गुणवत्ता त्यामध्ये मिसळलेल्या विद्राव्य किंवा अविद्राव्य घटकांमुळे ठरत असते. अनेक कारणांनी होणारे पाण्याचे प्रदूषण ते पिण्यासाठी किंवा दैनंदिन वापरासाठी दिवसेंदिवस असुरक्षित होत असल्याने पाणी सुरक्षिततेविषयी व्यापक जागृती केली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात दोनदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेस प्रारंभ झाला आहे.सदरच्या प्रशिक्षण कार्यशाळेत युनिसेफचे युसूफ कबीर यांनी पाणी गुणवत्ता कार्यक्र मांतर्गत राज्यात सुरू असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. पाणी गुणवत्ता विषयात जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.पाणी व स्वच्छता विभागाचे पाणी गुणवत्ता सल्लागार डॉ. शैलेश कानडे यांनी पाणी गुणवत्ता व सर्वेक्षण कार्यक्र मांतर्गत शासनाच्या वतीने सुरू असलेल्या कामांची माहिती दिली व प्रत्येक गावाचा पाणी सुरक्षितता आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. कार्यशाळेत पाणी गुणवत्ताबाबतीत सर्वेक्षणावर भर देण्याबाबत तसेच पिण्याच्या पाण्याचे स्वच्छता सर्वेक्षण, जैविक पाणी नमुने तपासणी, प्रयोगशाळा मनुष्यबळ, तसेच ग्रामपंचायत स्तरावरील जलसुरक्षक या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेचे डॉ. शैलेश कानडे, युनिसेफचे युसूफ कबीर, आनंद घोडके, आय.आर.ए.एफ. हैदराबादचे नितीन बस्सी, मंदार साठे, तसेच सर्व जिल्हा परिषदांमधील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता), जिल्हा आरोग्य अधिकारी, पाणीगुणवत्ता सल्लागार, पाणी गुणवत्ता निरीक्षक, वरिष्ठ रसायनी आदी उपस्थित होते.देशभर होणार पाहणीपिण्याच्या पाण्याचे स्वच्छता सर्वेक्षण फक्त महाराष्ट्रात होत असून त्याचे चांगले परिणाम दिसत असल्याने सदर सर्वेक्षण देशपातळीवर होण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या आय.आर.ए.एफ. हैदराबाद कंपनीकडून १८ जिल्ह्यांची पाहणी करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी दोन टप्प्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

सुरक्षित पाण्यासाठी राज्यातील युनिसेफकडून धडेजिल्हा परिषद : ३४ जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांची उपस्थितीनाशिक : कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पाण्याचा वापर केला जातो. त्यानुसार पाण्यातील गुणवत्तेतदेखील परिणाम होत असतो. पाण्याची गुणवत्ता आणि उपयुक्तता टिकवून ठेवण्यासाठी शासनाचा पाणीपुरवठा विभाग आणि युनिसेफच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या अधिकाºयांना धडे दिले जात आहेत.महाराष्ट्र शासनाचा पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि युनिसेफ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण या विषयावर महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी शहरात दोनदिवसीय कार्यशाळेस प्रारंभ झाला आहे. दोनदिवसीय कार्यशाळेत पाण्याची उपयुक्तता वाढविण्यावरील तंत्रज्ञान आणि उपचारांवर भर दिला जाणार आहे.पाण्याची गुणवत्ता त्यामध्ये मिसळलेल्या विद्राव्य किंवा अविद्राव्य घटकांमुळे ठरत असते. अनेक कारणांनी होणारे पाण्याचे प्रदूषण ते पिण्यासाठी किंवा दैनंदिन वापरासाठी दिवसेंदिवस असुरक्षित होत असल्याने पाणी सुरक्षिततेविषयी व्यापक जागृती केली जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात दोनदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेस प्रारंभ झाला आहे.सदरच्या प्रशिक्षण कार्यशाळेत युनिसेफचे युसूफ कबीर यांनी पाणी गुणवत्ता कार्यक्र मांतर्गत राज्यात सुरू असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. पाणी गुणवत्ता विषयात जबाबदारीने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.पाणी व स्वच्छता विभागाचे पाणी गुणवत्ता सल्लागार डॉ. शैलेश कानडे यांनी पाणी गुणवत्ता व सर्वेक्षण कार्यक्र मांतर्गत शासनाच्या वतीने सुरू असलेल्या कामांची माहिती दिली व प्रत्येक गावाचा पाणी सुरक्षितता आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. कार्यशाळेत पाणी गुणवत्ताबाबतीत सर्वेक्षणावर भर देण्याबाबत तसेच पिण्याच्या पाण्याचे स्वच्छता सर्वेक्षण, जैविक पाणी नमुने तपासणी, प्रयोगशाळा मनुष्यबळ, तसेच ग्रामपंचायत स्तरावरील जलसुरक्षक या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेचे डॉ. शैलेश कानडे, युनिसेफचे युसूफ कबीर, आनंद घोडके, आय.आर.ए.एफ. हैदराबादचे नितीन बस्सी, मंदार साठे, तसेच सर्व जिल्हा परिषदांमधील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता), जिल्हा आरोग्य अधिकारी, पाणीगुणवत्ता सल्लागार, पाणी गुणवत्ता निरीक्षक, वरिष्ठ रसायनी आदी उपस्थित होते.देशभर होणार पाहणीपिण्याच्या पाण्याचे स्वच्छता सर्वेक्षण फक्त महाराष्ट्रात होत असून त्याचे चांगले परिणाम दिसत असल्याने सदर सर्वेक्षण देशपातळीवर होण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या आय.आर.ए.एफ. हैदराबाद कंपनीकडून १८ जिल्ह्यांची पाहणी करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी दोन टप्प्यात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी