शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

पाटावरील मुख्य जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 11:41 PM

गावातील सुला वाइनरोडवरील पाटावर महानगरपालिकेच्या भुयारी अंतर्गत (उजवा कालवा) जलवाहिनीला गेल्या दोन वर्षांपासून गळती लागली असून, पाण्याचे लोटच्या लोट वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

गंगापूर : गावातील सुला वाइनरोडवरील पाटावर महानगरपालिकेच्या भुयारी अंतर्गत (उजवा कालवा) जलवाहिनीला गेल्या दोन वर्षांपासून गळती लागली असून, पाण्याचे लोटच्या लोट वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. येथील महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व्ह लिक करून मोठ्या प्रमाणात पाण्याची चोरी होत आहे. मात्र महापालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे.परिसरातील नागरिकांनी वारंवार तक्रार करूनदेखील कुठल्याही प्रकारची दखल महापालिकेकडून घेण्यात आली नसल्याने दोन वर्षांत येथे महापालिकेचे लाखो लिटर पाणी वाया जाऊन काही प्रमाणात त्याची चोरीही गेल्याचे समजते.जिल्ह्यात सर्वत्र पाणीटंचाईने हाहाकार माजलेला असताना गंगापूर गावातील या धरणातून आलेल्या थेट पाइपलाइनला मध्ये ब्रेक केल्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. ज्याप्रमाणे महापालिका अनधिकृत नळजोडणी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करते, तशी दंडात्मक कारवाई आता महापालिकेच्या या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर करणार का? असा सवाल नागरिक करीत आहेत. पाणीटंचाईचे रौद्ररूप तालुका व जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेष करून दिसून येते.शहरी भागासाठी आमदारांना पाण्यासाठी आंदोलनाने करून भांडावे लागत असताना पाण्याची व्यवस्था राखणाºया अधिकाºयांकडून मात्र त्याचे दुर्लक्ष होताना दिसते. काही ठिकाणी दहा दहा दिवस पाणी येत नाही, तर काही ठिकाणी महिन्यातून दोनदा पाणी मिळत असतानाही मात्र मनपाच्या अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे महापालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या पाण्याच्या मुख्य वाहिनीला त्वरित दुरु स्त करून महापालिकेचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.अधिकाºयांशी संपर्क साधूनही दुर्लक्ष  काही राजकीय पुढारी पाणी मिळत नसल्याने जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन नियोजन करण्याची विनंती करीत आहेत. मात्र, पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे लाखोली, तर पाणी वाया गेल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. पाइपलाइनमध्ये अनेक ठिकाणी गळती होत आहे. नागरिकांनी माहिती दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत पाणीपुरवठा अधिकारी कार्यकारी अभियंता चव्हाणके यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता ते रजेवर असल्याचे समजले, त्यांनी त्यांच्या कनिष्ठ अधिकारी संदीप नलावडे यांचा दूरध्वनी क्रमांक देऊन दोन दिवसांत कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पाण्यामुळे परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले असून याठिकाणी वाहने घसरून पडत आहेत़गंगापूर गावातील उजव्या पाटावरील महापालिकेच्या थेट मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने गंगापूर धरणाचे लाखो लिटर पाणी वाया गेले, आतातरी महापालिकेने सर्वत्र दुष्काळाच्या झळा बसत असताना येथे पाणी वाया जाणे योग्य नसून ही गळती महापालिकेने त्वरित थांबवून वाया जाणारे लाखो लिटर पाणी वाचवावे.- बाळासाहेब लांबे, अध्यक्ष,सोमेश्वर मंदिर संस्थान

टॅग्स :droughtदुष्काळWaterपाणी