शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

धरणांमध्ये गतवर्षी ९९ तर यंदा केवळ ८३ टक्के जलसाठा

By sandeep.bhalerao | Updated: November 3, 2023 15:52 IST

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात धरणांमध्ये ९९ टक्के इतका साठा होता तर यंदा केवळ ८३ टक्के इतकाच जलसाठा असल्याने प्रशासनाला पिण्याचे आणि सिंचनाच्या पाण्याचे नियोजन करताना कसरत करावी लागणार आहे.

नाशिक : यंदा कमी आणि असमान झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांची स्थिती गतवर्षीपेक्षा बिकट आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात धरणांमध्ये ९९ टक्के इतका साठा होता तर यंदा केवळ ८३ टक्के इतकाच जलसाठा असल्याने प्रशासनाला पिण्याचे आणि सिंचनाच्या पाण्याचे नियोजन करताना कसरत करावी लागणार आहे. जिल्ह्यात यंदा केवळ ७० ते ७५ टक्के इतकेच पर्जन्यमान झाले असल्याने परतीच्या पावसापर्यंत धरणे कशीबशी जेमतेम भरली आहेत.

ज्या धरणांमध्ये गतवर्षी शतकभर पाणीसाठा होता, त्या धरणांमध्ये यंदा ८० ते ९० टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. यावेळी केवळ पाच धरणांमधून काही दिवस विसर्ग सुरू होता तर गोदावरी नदीलादेखील गतवर्षीप्रमाणे पूरपरिस्थिती निर्माण झाली नाही. जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मोकळे आभाळ अशी एकूणच स्थिती होती. त्यामुळे ठराविक भागात झालेल्या पावसामुळे धरणांमध्ये काही प्रमाणात पाणीसाठा होऊ शकला. परंतु, गतवर्षीच्या तुलनेत साठा कमीच आहे.

 धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याचे आदेश असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून विरोध सुरू झाला आहे.जिल्ह्यात एकूण २४ लहान-मोठे धरण प्रकल्प आहेत. त्यामध्ये ७ मोठे प्रकल्प आहेत तर १७ मध्यम स्वरूपाचे प्रकल्प आहेत. याप्रमाणे असलेल्या २४ प्रकल्पांमध्ये सध्या ८३ टक्के इतका जलसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :WaterपाणीRainपाऊसDamधरण