शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

धरणांमध्ये गतवर्षी ९९ तर यंदा केवळ ८३ टक्के जलसाठा

By sandeep.bhalerao | Updated: November 3, 2023 15:52 IST

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात धरणांमध्ये ९९ टक्के इतका साठा होता तर यंदा केवळ ८३ टक्के इतकाच जलसाठा असल्याने प्रशासनाला पिण्याचे आणि सिंचनाच्या पाण्याचे नियोजन करताना कसरत करावी लागणार आहे.

नाशिक : यंदा कमी आणि असमान झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांची स्थिती गतवर्षीपेक्षा बिकट आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात धरणांमध्ये ९९ टक्के इतका साठा होता तर यंदा केवळ ८३ टक्के इतकाच जलसाठा असल्याने प्रशासनाला पिण्याचे आणि सिंचनाच्या पाण्याचे नियोजन करताना कसरत करावी लागणार आहे. जिल्ह्यात यंदा केवळ ७० ते ७५ टक्के इतकेच पर्जन्यमान झाले असल्याने परतीच्या पावसापर्यंत धरणे कशीबशी जेमतेम भरली आहेत.

ज्या धरणांमध्ये गतवर्षी शतकभर पाणीसाठा होता, त्या धरणांमध्ये यंदा ८० ते ९० टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. यावेळी केवळ पाच धरणांमधून काही दिवस विसर्ग सुरू होता तर गोदावरी नदीलादेखील गतवर्षीप्रमाणे पूरपरिस्थिती निर्माण झाली नाही. जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस तर काही ठिकाणी मोकळे आभाळ अशी एकूणच स्थिती होती. त्यामुळे ठराविक भागात झालेल्या पावसामुळे धरणांमध्ये काही प्रमाणात पाणीसाठा होऊ शकला. परंतु, गतवर्षीच्या तुलनेत साठा कमीच आहे.

 धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याचे आदेश असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून विरोध सुरू झाला आहे.जिल्ह्यात एकूण २४ लहान-मोठे धरण प्रकल्प आहेत. त्यामध्ये ७ मोठे प्रकल्प आहेत तर १७ मध्यम स्वरूपाचे प्रकल्प आहेत. याप्रमाणे असलेल्या २४ प्रकल्पांमध्ये सध्या ८३ टक्के इतका जलसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :WaterपाणीRainपाऊसDamधरण