शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
2
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
3
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
4
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
5
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
6
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
7
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
8
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
9
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
10
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
11
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
12
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
13
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
14
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
15
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
16
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
17
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
18
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
19
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!
20
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार

भाषा, प्रांतवाद ही संकुचित भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 1:02 AM

समरसता, सेवा आणि हिंंदुत्व हा व्यापक संघ विचार असून भाषा, प्रांतवाद ही संकुचित भावना आहे. समरसता म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा विचार असल्याने अल्प आणि बहुमताच्या संख्येचा विचार करणे चुकीचे आहे. सर्वांना बरोबर घेऊन चाललो तरच जगावर वर्चस्व राखता येऊ शकेल, असे प्रतिपादन राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले.

ठळक मुद्देभय्याजी जोशी : अहिरे स्मृतिग्रंथ प्रकाशन सोहळ्यात प्रतिपादन

नाशिक : समरसता, सेवा आणि हिंंदुत्व हा व्यापक संघ विचार असून भाषा, प्रांतवाद ही संकुचित भावना आहे. समरसता म्हणजे सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा विचार असल्याने अल्प आणि बहुमताच्या संख्येचा विचार करणे चुकीचे आहे. सर्वांना बरोबर घेऊन चाललो तरच जगावर वर्चस्व राखता येऊ शकेल, असे प्रतिपादन राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केले.गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात कै. बाळासाहेब अहिरे स्मृतिग्रंथ प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, निशिकांत अहेर, नानासाहेब जाधव, स्मृतिग्रंथ समितीचे कैलासनाना साळुंखे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कै. बाळासाहेब अहिरे स्मृतिग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी जोशी म्हणाले, संघाचा विचार हा सर्वांना बरोबर घेऊन चालण्याचा आहे.भाषा, प्रांतवाद समाजाला संकुचित करीत असल्यामुळे समाजातील ही विषमता दूर करण्याचे काम संघ समरसतेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाषा, प्रांत हा काही अल्प आणि बहुमताचा विषय नाही तर समरसता आचरणाचा विषय असल्याचे जोशी म्हणाले. हिंदुत्व हे एक सत्य असल्यामुळे सत्य सिद्ध करण्याला बहुमत लागत नाही. त्यामुळे धर्मांतरीत करून हिंदूंची संख्या वाढविण्याची गरज नसल्याचे विधानही त्यांनी केले.हिंदुत्व ही समर्पण आणि समरसता असून हा विचार संघाच्या असंख्य ज्येष्ठांनी रूजविला आहे. त्याच पाऊलखुणांवर संघाची पुढची पिढी साधना करीत आहे. आपसातील मतभेद विसरून उभे राहिलो तरच आपण जगात स्थान निर्माण करू शकतो, असा पुनरुच्चार करताना जोशी यांनी प्राचीन काळापासून चालत आलेल्या हिंदुत्व विचाराचे पोषण राष्टÑीय स्वयंसेवक संघ करीत असल्याचे सांगितले. हिंदुत्व विचाराचे आणि चिंतनाचे पोषण झाले नाही तर हा विचारच दुर्बल होऊन जाईल, असेही ते म्हणाले.हिंदुत्व म्हणजे समर्पणहिंदुत्व म्हणजे सर्वसमावेशक समर्पणाची भावना आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा हा विचार आचरणात आणण्याची आवश्यकता आहे. जो सर्वांना बरोबर घेऊन चालेल तोच जगावर वर्चस्व राखू शकतो. आम्ही कोण तर आम्ही अमुकअमुक आहोत ही समरतसेची भावना नाही तर सर्वांबरोबर घेण्याचा विचार आहे. समरतेविषयी आज कुणीही बोलू शकतो. परंतु समरसता ही आचरणातून अंमलात आणण्याची आवश्यकता असल्याचे भय्याजी जोशी म्हणाले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकliteratureसाहित्यRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ