शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

काथरगाव येथे कांदा चाळीला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 22:46 IST

निफाड : तालुक्यातील काथरगाव येथील वाघ वस्तीवरील साठवलेल्या कांदा चाळीला आग लागून २० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्दे२५ ट्रॅक्टर कांदा, २ मोटारसायकल, रासायनिक खतांच्या गोण्या जाळून खाक

निफाड : तालुक्यातील काथरगाव येथील वाघ वस्तीवरील साठवलेल्या कांदा चाळीला आग लागून २० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, काथरगावचे माजी सरपंच राजाराम वाघ, काशिनाथ वाघ, डॉ. किरण वाघ आणि कुटुंबीय हे नातेवाइकांच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. रविवारी (दि.१५) दुपारी दीडच्या दरम्यान वाघ यांच्या कांदा चाळीला आग लागल्याने कांदा चाळ, कांदा चाळीतील साठवलेला कांदा, खतांच्या गोण्या व दोन मोटारसायकली या आगीत जळून खाक झाल्या.या कांदा चाळीत नवीनच काढलेले २५ ट्रॅक्टर उन्हाळ कांदे साठवलेले होते. ही आग लागल्याचे दिसताच आजूबाजूच्या शेतवस्तीतील लोकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत कांदा चाळीसह २५ ट्रॅक्टर साठवलेले कांदे, रासायनिक खतांच्या गोण्या, २ मोटारसायकल, कृषीपंपाचे स्टार्टर, केबल वायर आदी आगीत जळून खाक झाले.या आगीत तिघा वाघ कुटुंबीयांचे अंदाजे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. कांदा चाळीपासून राजाराम वाघ, काशिनाथ वाघ, डॉ. किरण वाघ यांची घरे १५ ते २० फुटांपर्यंत होती. मात्र, सुदैवाने या आगीची झळ या घरांना बसली नाही. या तिघा वाघ कुटुंबीयांनी कष्टाने पिकवलेला कांदा, कांद्याची चाळ, दोन मोटारसायकल व इतर शेतीउपयोगी साहित्य असे एकूण २० लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तलाठी खंडागळे यांनी घटनेचा पंचनामा केला असून आगीचे कारण समजू शकलेले नाही. निफाड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. 

टॅग्स :Fairजत्राAccidentअपघात