शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

काथरगाव येथे कांदा चाळीला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 22:46 IST

निफाड : तालुक्यातील काथरगाव येथील वाघ वस्तीवरील साठवलेल्या कांदा चाळीला आग लागून २० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्दे२५ ट्रॅक्टर कांदा, २ मोटारसायकल, रासायनिक खतांच्या गोण्या जाळून खाक

निफाड : तालुक्यातील काथरगाव येथील वाघ वस्तीवरील साठवलेल्या कांदा चाळीला आग लागून २० लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, काथरगावचे माजी सरपंच राजाराम वाघ, काशिनाथ वाघ, डॉ. किरण वाघ आणि कुटुंबीय हे नातेवाइकांच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. रविवारी (दि.१५) दुपारी दीडच्या दरम्यान वाघ यांच्या कांदा चाळीला आग लागल्याने कांदा चाळ, कांदा चाळीतील साठवलेला कांदा, खतांच्या गोण्या व दोन मोटारसायकली या आगीत जळून खाक झाल्या.या कांदा चाळीत नवीनच काढलेले २५ ट्रॅक्टर उन्हाळ कांदे साठवलेले होते. ही आग लागल्याचे दिसताच आजूबाजूच्या शेतवस्तीतील लोकांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत कांदा चाळीसह २५ ट्रॅक्टर साठवलेले कांदे, रासायनिक खतांच्या गोण्या, २ मोटारसायकल, कृषीपंपाचे स्टार्टर, केबल वायर आदी आगीत जळून खाक झाले.या आगीत तिघा वाघ कुटुंबीयांचे अंदाजे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. कांदा चाळीपासून राजाराम वाघ, काशिनाथ वाघ, डॉ. किरण वाघ यांची घरे १५ ते २० फुटांपर्यंत होती. मात्र, सुदैवाने या आगीची झळ या घरांना बसली नाही. या तिघा वाघ कुटुंबीयांनी कष्टाने पिकवलेला कांदा, कांद्याची चाळ, दोन मोटारसायकल व इतर शेतीउपयोगी साहित्य असे एकूण २० लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तलाठी खंडागळे यांनी घटनेचा पंचनामा केला असून आगीचे कारण समजू शकलेले नाही. निफाड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. 

टॅग्स :Fairजत्राAccidentअपघात