शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

खेडलेझुंगे परिसरात द्राक्ष मण्यांना तडे, बागायतदार हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 5:19 PM

खेडलेझुंगे : मागील आठवड्यापासून वातावरणातील सततच्या बदलामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. वातावरणातील बदलामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडत चालला आहे. मागील ३/४ दिवसांपासून अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, धुके, दव, कडाक्याचा गारठा, यामुळे पाणी उतरलेल्या/साखर उतरलेल्या द्राक्षांच्या मण्यांना तडे जात आहेत. त्यामुळे परिसरातील द्राक्ष बागायतदारांचे नुकसान होत आहे. अर्ली द्राक्ष बागायतादारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करून वाचविलेल्या बागा अवकाळीमुळे नुकसानग्रस्त होत आहेत. त्यामुळे शेतकरी पूर्णतः हतबल झालेला आहे. 

मागील वर्षीचे काढणीला आलेले पीक कोविड १९ मुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये सापडले. बाजारपेठा कधी चालू तर कधी बंद, निर्यात बंदी, शेतीमालाला नसलेला भाव, यामुळे मागील वर्षीचे नुकसान सहन करीत नव्याने या वर्षी केलेली मशागत आणि खर्चही अवकाळीमुळे वाया जाणार असल्याचे चिन्ह परिसरात दिसून येत आहे. डाळिंब बागायतदार यांनी फळधारणा जोमाने होण्यासाठी बगीचांना पाण्याचा ताण देण्यास सुरुवात केलेली असतानाच, झालेल्या पावसामुळे त्यांच्याही पदरी निराशा पडलेली आहे. त्यामुळे या वर्षी द्राक्ष आणि डाळिंब बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. घडांवर पाणी शिल्लक राहत असल्याने, घड सडू लागले आहेत. मणी क्रॅक झाल्याने पूर्ण घड सडणार आहे. मावा, तुडतुडे यांसारख्या किटकांचा वावर वाढणार आहे. त्यामुळे किटकनाशकांचा खर्च वाढणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती