शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

कवी कट्ट्यावर २३ तास काव्यरस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:45 IST

नाशिक : साहित्य संमेलनातील सर्वाधिक चर्चित भाग असलेल्या कवी कट्ट्याबाबतचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला असून, नाशिकला कवी कट्ट्यावर ...

नाशिक : साहित्य संमेलनातील सर्वाधिक चर्चित भाग असलेल्या कवी कट्ट्याबाबतचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला असून, नाशिकला कवी कट्ट्यावर होणारे कविसंमेलन तब्बल २३ तास रंगणार आहे. त्यात राज्य आणि राज्याबाहेरील ४५० कवी त्यांच्या एकमेव कवितेचे सादरीकरण करणार आहेत.

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक बोलीभाषेतील कवींचादेखील त्यात अंतर्भाव करण्यात येणार आहे. तसेच काव्यातील ग्रामीण, नागरी, सामाजिक, दलीत, बोली, गझल, छंदोबध्द, मुक्तछंद आणि अन्य सर्व काव्यप्रकारांचाही त्यात अंतर्भाव करण्यात येणार आहे. या कवीकट्ट्यासाठी पुण्याचे राजन लाखे, नाशिकचे शंकर बोऱ्हाडे आणि संतोष वाटपाडे तसेच बडोद्याचे प्रसाद देशपांडे यांचा समावेश करण्यात आला असल्याचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ आणि निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांनी कळविले आहे. या कवी कट्ट्यावरील सादरीकरणासाठी कविता स्वरचित असावी, २० ओळींपेक्षा मोठी नसावी, कविता निवड समिती करेल, कवितेचे सादरीकरण ३ मिनिटात करणे बंधनकारक असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या सर्व बाबींचे पालन केल्यासच कविता सादरीकरणाला परवानगी देण्यात येणार आहे.

इन्फो

नवकवींना व्यासपीठाची आस

नुकताच एखाद-दुसरा काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेल्या नवकवींसाठी साहित्य संमेलनातील कवीकट्टा हे अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ असते. या कवीकट्ट्यावर कुणाची कविता नावाजली गेली, तर त्या कवीचे नाव लवकरच राज्यभरात गाजू लागल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे नाशिकच्या या कवी कट्ट्यावर कोणत्या कवीला विशेष दाद मिळते, त्याचीदेखील रसिकांना उत्सुकता राहणार आहे.

इन्फो

निमंत्रितांच्या यादीची महामंडळाकडून निश्चिती

साहित्य संमेलनात जे मुख्य कविसंमेलन रंगते, त्यासाठी राज्यातील केवळ मोजक्या ज्येष्ठ श्रेष्ठ कवींनाच निमंत्रित केले जाते. या कवींमध्ये कुणाची निवड करायची, कुणाला निमंत्रण द्यायचे त्याचे सर्वाधिकार संपूर्णपणे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे असतात. त्यामुळे त्या निमंत्रित कवींमध्ये कुणाचा अंतर्भाव असेल, त्याबाबतची यादी निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्या निमंत्रित कवींची नावे निश्चित होणार, ते महामंडळाकडून जाहीर झाल्यानंतरच समजू शकणार आहे.