शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात मान्सूनपुर्व सरी; काजव्यांचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 2:38 PM

रात्री १२ वाजेच्याअगोदर अभयारण्याच्या सीमेबाहेर पर्यटकांनी येणे गरजेचे असून त्यानंतर कोणी पर्यटक अभयारण्य क्षेत्रात वावरताना आढळून आल्यास वन्यजीव विभागाकडून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश भंदारदरा, राजूर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना अंजनकर यांनी दिले आहे.

ठळक मुद्देशनिवारी पर्यटकांच्या गर्दीने उच्चांक गाठलावृक्षराजीवर काजव्यांचा लखलखाट रात्री पहावयास मिळतोभारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात येतील

नाशिक : शहरापासून अवघ्या ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या नाशिकवन्यजीव विभागाच्या अखत्यारितीतील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात सध्या काजव्यांची चमचम अनुभवयास येत आहे. आठवडाभरापासून काजव्यांची उत्पत्ती या भागात झालेली पहावयास मिळत आहे; मात्र रविवारी (दि.९) व सोमवारीदेखील पावसाने हजेरी लावल्यामुळे काजव्यांचे प्रमाण घटल्याची माहिती वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिली.पुढील आठवडाभर काजवे काही प्रमाणात बघावयास मिळणार असल्याने पर्यटकांना महोत्सवांतर्गत अभयारण्यात सशुल्क प्रवेश दिला जाणार आहे; मात्र रात्री १२ वाजेच्याअगोदर अभयारण्याच्या सीमेबाहेर पर्यटकांनी येणे गरजेचे असून त्यानंतर कोणी पर्यटक अभयारण्य क्षेत्रात वावरताना आढळून आल्यास वन्यजीव विभागाकडून कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश भंदारदरा, राजूर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना अंजनकर यांनी दिले आहे.

निसर्गाचा अद्भूत आविष्कार सह्याद्रीच्या कुशीत अभयारण्य क्षेत्रात काहीसा विलंबाने अनुभवयास आला. मागील दोन दिवसांपासून भंडारदरा वनपरिक्षेत्रातील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रविवारी (दि.१०) पर्यटकांची संख्या रोडावलेली होती; मात्र शनिवारी पर्यटकांच्या गर्दीने उच्चांक गाठला. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला येथील वृक्षराजीवर काजव्यांचा लखलखाट अंधा-या रात्री पहावयास मिळतो. काजव्यांच्या आकर्षणापोटी नाशिक, मुंबई, पुणे, अहमदनगरसह या जिल्ह्यांमधून तसेच गुजरात राज्यांमधील अहमदाबाद, सुरत, राजकोट जिल्ह्यांमधूनही पर्यटक हजेरी लावत आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक वन्यजीव विभागाकडून अभयारण्यक्षेत्रात पाळावयाच्या नियमावलीच्या पत्रकांचे भंडारदरा-मुतखेल, शेंडी-घाटघर नाक्यांवर वाटप करण्यात येत आहे. तसेच या परिसरात जागृतीपर सूचना फलकही उभारण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणा-या टवाळखोरांसह हौशी हुल्लडबाजांवर कारवाईचे आदेश दिल्याचे अंजनकर यांनी सांगितले. याबाबत राजूर पोलीस निरीक्षकांसह अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षकांनाही पत्र वन्यजीव विभागाकडून पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांनी काजव्यांचा सुरक्षित अंतरावरून आनंद लुटावा, काजवे पकडण्याचा किंवा ज्या झाडांवर काजवे चमकत आहे, त्या झाडांवर माती, दगड आदी वस्तू फेकण्याचा प्रयत्न अजिबात करू नये, अन्यथा साध्या वेशातील स्वयंसेवकांद्वारे संबंधित पर्यटकांच्या वाहनांचे क्रमांक गस्ती पथकाला कळवून त्यांच्यावर दंडात्मक तसेच भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

या नियमांचे करावे काटेकोर पालन

  • रात्री ९ वाजेपूर्वी अभयारण्यात प्रवेश करावा.
  • रात्री १२ वाजेच्या अगोदर अभयारण्य क्षेत्र तत्काळ सोडावे.
  • अभयारण्यातील मुख्य रस्ता सोडून वृक्षराजीमध्ये जाणे टाळावे.
  • अभयारण्य क्षेत्रात वावरत आहोत, याचे भान ठेवावे, जेणेकरून वन्यप्राण्यांकडून कोणालाही दुखापत होणार नाही.
  • झाडांपासून सुरक्षित अंतरावर थांबून काजव्यांचे निरीक्षण करावे.
  • काजव्यांना धोका होईल असे वर्तन करू नये.
  • अभयारण्यात येताच वाहनांचे दिवे मंद ठेवावे.
  • अनावश्यकरीत्या हॉर्नचा वापर करू नये.
  • स्वत:जवळ ज्वलनशील पदार्थ बाळगू नये.
  • वनविभाग व पोलीस गस्त पथकाला सहकार्य करावे. 
टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागwildlifeवन्यजीवtourismपर्यटन