शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
4
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
5
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
6
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
7
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोड्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
8
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
9
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
10
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
11
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
12
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
13
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
15
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
16
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
17
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
18
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
19
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
20
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
Daily Top 2Weekly Top 5

काकासाहेब देवधर शाळेत गोंधळ ;शाळेत वाहने न सोडल्याने सुरक्षारक्षक पालकांमध्ये वाद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 18:59 IST

दिंडोरीरोडवरील पुणे विद्यार्थी वसतिगृहाच्या काकासाहेब देवधर शाळा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात संतप्त पालकांनी शुक्रवारी (दि.१५) सकाळी शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन करून शाळा प्रशासनाला धारेवर धरले. शाळेतील विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या विविध अडचणींबाबत शाळेचे मुख्याध्यापक व शाळा प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी संतप्त पालकांनी केला. 

ठळक मुद्देकाकासाहेब देवधर शाळेत सुरक्षारक्षक-पालकांमध्ये वाद वाहनाना शाळेत प्रवेश रोखल्याने पालक आक्रमक शाळा प्रशासनाविरोधात पालकांची निदर्शने

नाशिक : दिंडोरीरोडवरील पुणे विद्यार्थी वसतिगृहाच्या काकासाहेब देवधर शाळा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात संतप्त पालकांनी शुक्रवारी (दि.१५) सकाळी शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन करून शाळा प्रशासनाला धारेवर धरले. शाळेतील विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या विविध अडचणींबाबत शाळेचे मुख्याध्यापक व शाळा प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी संतप्त पालकांनी केला. दिंडोरीरोड परिसरातील पुणे विद्यार्थी वसतिगृहाची काकासाहेब देवधर शाळा व महाविद्यालयातील सुरक्षारक्षकांनी शुक्रवारी (दि.१५) विद्यार्थ्यांच्या पालकांना वाहने नेण्यास मज्जाव केला. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी शाळा प्रशासनावर आरोपांच्या फैरी झाडत शाळेच्या आवारात असलेल्या शौचालयात पाणी नाही, शिक्षकांच्या वारंवार बदल्या होतात, शाळेने ई-लर्निंगचे दरमहा पाचशे रुपये याप्रमाणे पैसे घेतलेले आहे. विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरवर शिकविले जाते, मात्र प्रोजेक्टर पंधरा दिवस चालू तर पंधरा दिवस बंद असतात. वारंवार शिक्षकांच्या बदल्या होत असल्याने त्यांच्या जागी येणाºया शिक्षकांकडून प्रोजेक्टरवर शिकविल्या जाणाºया माहितीत तफावत असते. याशिवाय शाळेतीलच तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी आवारात गुटखा खातात, तर कधी कधी विद्यार्थिनींसोबत छेड काढण्याचे प्रकारही घडतात. मात्र शाळेचे सुरक्षारक्षक विद्यार्थ्यांच्या पालकांना मुख्याध्यापक अथवा संचालकांना भेटून देत नसल्याचा आरोप पालकांनी यावेळी केला. दरम्यान, याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. 

तीन वर्षांपासून पालकांसोबत बैठक नाहीगेल्या तीन वर्षांपासून शालेय व्यवस्थापन समिती व पालक वर्गांची बैठक झालेली नाही असा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी करून शाळा प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्तकेली. सुमारे तासभर पालकांनी प्रवेशद्वारावर उभे राहून आंदोलन केले. त्यानंतर म्हसरूळ पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या संदर्भात शनिवारी (दि.१६) पालक व शाळा व्यवस्थापनाची बैठक घेऊन त्यात चर्चा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. 

शाळा प्रशासनाचे दुर्लक्षविद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवेशद्वारावर सोडले तर त्यांना पायी जावे लागते. या ठिकाणी महाविद्यालय असल्याने महाविद्यालयातील विद्यार्थी वेगाने वाहने ने-आण करतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या अडचणींबाबत वारंवार शाळेच्या संचालकांना व मुख्याध्यापक मनीषा साठे यांच्याकडे तक्रार मांडण्यासाठी पालकांना शाळेचे सुरक्षारक्षक जाऊ देत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. -सचिन पवार, पालक

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थीagitationआंदोलनcollegeमहाविद्यालय