शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

पाटबंधारे विभागात अभियंता ते  कॅबिनेट मंत्री पदापर्यंत प्रवास; दादा भुसे आनंद दिघेंच्या संपर्कात आले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 14:15 IST

शासकीय सेवेचा राजीनामा दिल्यानंतर ते मालेगावी आले. शहरात जाणता राजा मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्यास प्रारंभ केला. रक्तदान शिबिरे घेतली. त्यामुळे मंत्री नसताना देखील त्यांच्या संपर्क कार्यालयात नेहमी दरबार भरलेला असे.

  - शफीक शेख/संजय पाठकमालेगाव : मालेगाव बाह्य मतदार संघातून दादा भुसे सलग चार वेळा विजयी झाले. त्यांचे वडील वडील स्वर्गीय दगडू बयाजी भुसे हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचे कुटुंबिय शेतकरी परिवारातील होते. दादा भुसे यांचा जन्म ६ मार्च १९६४ रोजी झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण मालेगावातच झाले. त्यानंतर ते अभियंता झाले. त्यांनी डिप्लोमा इन सिव्हील इंजिनियरची पदविका मिळवली. त्यांनतर ते पाटबंधारे विभागात अभियंता म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले. त्यांनी सुमारे १५ वर्षे त्यांनी शासकीय सेवा केली. त्यानंतर ते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले. भुसे यांचेवर आनंद दिघे यांच्या कार्याचा प्रभाव असल्याने त्यांनी शासकीय सेवेचा राजीनामा देऊन सामाजिक कार्यात स्वत:ला झाेकून दिले. त्यांच्या पत्नी अनिता भुसे, मुले अजिंक्य आणि अविष्कार भुसे असा परिवार असून दोन्ही मुले शिवसेनेच्या माध्यमातून समाजसेवेत काम करीत आहेत. पत्नी अनिता भुसे महिलांसाठी सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.

शासकीय सेवेचा राजीनामा दिल्यानंतर ते मालेगावी आले. शहरात जाणता राजा मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्यास प्रारंभ केला. रक्तदान शिबिरे घेतली. त्यामुळे मंत्री नसताना देखील त्यांच्या संपर्क कार्यालयात नेहमी दरबार भरलेला असे.त्यानंतर त्यांना शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून काम केले. २००४ मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवून दादा भुसे विजयी झाले त्यानंतर त्यांनी मागे वळून कधी पाहिलेच नाही. सलग चारवेळा त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजयी होण्याचा विक्रम केला.

५ डिसेंबर २०१४ ते ९ जुलै २०१६ मध्ये त्यांना मंत्रिमंडळात प्रथम सहकार राज्यमंत्री पदाची संधी मिळाले. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ९ जुलै २०१६ ते १२ १९ मध्ये ग्रामविकास राज्यमंत्री पदाची संधी मिळाली. त्यांनतर ५ जानेवारी २०२० पासून कॅबिनेट मंत्री पदी निवड झाली. कृषीमंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री पदाचा कार्यभार पाहताना त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. याच काळात त्यांनी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही काम केले.

नाशिक जिल्ह्यातून भाजपाला संधी नाही...

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात नाशिक भाजपाला संधी न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात उतर महाराष्ट्राला पाच मंत्री पद मिळाले आहेत नाशिक मधून शिवसेनेचे दादा भुसे आणि आमदार सुहास कांदे हे सर्वप्रथम फुटले होते. त्यापैकी दादा भुसे यांना मंत्री पद मिळाले आहे. मात्र, भाजपाचे पाच आमदार असूनही एकालाही संधी न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नाशिक मधून आमदार देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर सीमा हिरे आणि ऍड. राहुल ढिकले यांच्या नावाची प्रामुख्याने चर्चा होत होती मात्र, त्यापैकी एकालाही संधी मिळालेली नाही. उलट शिवसेनेचे दोन आमदार असून त्यातील एकला मंत्री पद मिळाल्याने त्यांना मंत्री मंडळात 50 टक्के संधी मिळाली आहे. नाशिक शहरात भाजपचे तीन आणि ग्रामीण मध्ये 2 असे पाच आमदार असून त्यापैकी एकालाही संधी मिळाली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना