शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

दु:खातून बाहेर पडण्यासाठी लागते निमित्त : डॉ. मोहन आगाशे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 1:56 AM

समाजातील प्रत्येक बाबीकडे सजगतेने पाहणे आणि चित्त देऊन श्रवण करणे किती आवश्यक असते, याचे भान ‘दिठी’ चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक दु:खाच्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी काही निमित्त निर्माण होणे आवश्यक असते, असाही संदेश या चित्रपटातून देण्यात आल्याचे ज्येष्ठ कलाकार आणि मनोविकारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी सांगितले.

ठळक मुद्दे ‘दिठी’ चित्रपटाला नाशिककरांचा प्रतिसाद

नाशिक : समाजातील प्रत्येक बाबीकडे सजगतेने पाहणे आणि चित्त देऊन श्रवण करणे किती आवश्यक असते, याचे भान ‘दिठी’ चित्रपटातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रत्येक दु:खाच्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी काही निमित्त निर्माण होणे आवश्यक असते, असाही संदेश या चित्रपटातून देण्यात आल्याचे ज्येष्ठ कलाकार आणि मनोविकारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी सांगितले.

 

नाशिक सायकियाट्रिक सोसायटी आणि आय.पी.एच. व मनतरंग फिल्म क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिठी’ या चित्रपटाचे विशेष प्रक्षेपण शुक्रवारी आयएमएच्या सभागृहात करण्यात आले. या चित्रपटात प्रमुख भूमिका निभावणारे कलाकार आणि मनोविकारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांनी यावेळी प्रेक्षकांशी संवाद साधताना जीवनातील उलथापालथीत बहुतांश माणसे मृत्यू हे अंतिम सत्य असल्याचेच विसरून जातात. त्यामुळेच आपल्या कुटुंबातील जिवलगाचा मृत्यू त्यांना सहन होत नाही. त्या दु:खातच ते स्वत:ला बुडवून घेतात. मृत्यूचे अंतिम सत्य आणि जवळच्या व्यक्तीला गमावल्याचे दु:ख हे प्रत्येकाच्याच वाट्याला येते. मात्र, त्यातून बाहेर पडण्यासाठी, त्यातून मोकळे होण्यासाठी प्रत्येकाला काहीतरी निमित्त हवे असते. तसे जर झाले तरच आपण एका नव्या दिशेने चालू लागतो. त्यामुळे असा आघात झालेल्या परिघातील प्रत्येकाने तशा स्वरूपाचे प्रयत्न करून आघातग्रस्ताला लवकरात लवकर त्या दु:खातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायला हवा,असेही आगाशे यांनी नमूद केले. केवळ बुद्धिमतेच्या जोरावर नव्हे, तर अनुभवातून आलेल्या शहाणपणावरही ते दु:ख पचवण्याचे भान देता येते, असेही डॉ. आगाशे यांनी सांगितले. दि. बा. मोकाशी यांच्या ‘आता आमोद सुनासी आले’ या लघुकथेवर आधारित असलेला आणि सुमित्रा भावे दिग्दर्शित ‘दिठी’ या चित्रपटातून तेच वास्तव मांडण्यात आले आहे. चित्रपटाला नाशिककरांनी चांगला प्रतिसाद दिला.

 

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक