शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

माणिकराव कोकाटेंविरोधात षड्यंत्र तर नाही ना? जयंत पाटील यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 10:44 IST

वीस-बावीस वर्षानंतर आणि तेही सत्तेत आल्यानंतर अशा प्रकारचे निकाल लागल्याने शंका निर्माण होत असल्याचे ते म्हणाले. 

नाशिक : माणिकराव कोकाटे वीस-बावीस वर्षे आमदार होते; मात्र त्यांच्या संदर्भातील गुन्ह्याचे कोणाला फारसे माहीत नव्हते, अशावेळी अचानक निकाल लागतो आणि कोकाटे यांच्या मंत्रिपद सोडण्यापर्यंत त्यांना आणणे, या मागे कोणीतरी काही रचतंय का, असा प्रश्न राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे.

बुधवारी (दि. २६) नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, कोकाटेच काय किंवा अन्य कोणाच्याही चुकीचे समर्थन करणार नाही. मात्र, वीस-बावीस वर्षानंतर आणि तेही सत्तेत आल्यानंतर अशा प्रकारचे निकाल लागल्याने शंका निर्माण होत असल्याचे ते म्हणाले. 

अर्थात अलीकडे कोणाचा गुन्हा मान्य करायचा नाही, अशी सरकार चालवणाऱ्यांची भूमिका दिसते. त्यामुळे नाशिकच्या न्यायालयाने कोकाटे यांना शिक्षा दिली तरी पुढे काय होते, ते बघावे लागेल, असे जयंत पाटील म्हणाले. तसेच, पुण्यात एका एसटी बसमध्ये झालेल्या बलात्काराबाबत बोलताना त्यांनी बलात्कार करून महिलांना मारून टाकणे, अशा अत्याचाराच्या घटना खूप वाढल्या असून सरकारचा धाक नसल्याचे दिसते. 

बस डेपोत असे प्रकार होणे खूपच गंभीर आहे, सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, असे जयंत पाटील म्हणाले. याशिवाय, बीडमधील घटनेतील फरार आरोपीबद्दल बोलताना त्यांनी परदेशात जाणाऱ्या मंत्र्याचा मुलगा परदेशात जात असेल तर त्याला विमान फिरवून परत आणू शकतो तर भारताच लपलेल्या आरोपीला हुडकण्यास काय अडचण आहे, असा प्रश्न केला आहे.

१५ ऑगस्टपर्यंत तरी पालकमंत्री जाहीर करावानाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. २६ जानेवारीच्या अगोदर पालकमंत्रिपद स्थगित झाले आता १५ ऑगस्टपर्यंत तरी पालकमंत्री घोषित करावा, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेJayant Patilजयंत पाटीलNashikनाशिक