शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

माणिकराव कोकाटेंविरोधात षड्यंत्र तर नाही ना? जयंत पाटील यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 10:44 IST

वीस-बावीस वर्षानंतर आणि तेही सत्तेत आल्यानंतर अशा प्रकारचे निकाल लागल्याने शंका निर्माण होत असल्याचे ते म्हणाले. 

नाशिक : माणिकराव कोकाटे वीस-बावीस वर्षे आमदार होते; मात्र त्यांच्या संदर्भातील गुन्ह्याचे कोणाला फारसे माहीत नव्हते, अशावेळी अचानक निकाल लागतो आणि कोकाटे यांच्या मंत्रिपद सोडण्यापर्यंत त्यांना आणणे, या मागे कोणीतरी काही रचतंय का, असा प्रश्न राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे.

बुधवारी (दि. २६) नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, कोकाटेच काय किंवा अन्य कोणाच्याही चुकीचे समर्थन करणार नाही. मात्र, वीस-बावीस वर्षानंतर आणि तेही सत्तेत आल्यानंतर अशा प्रकारचे निकाल लागल्याने शंका निर्माण होत असल्याचे ते म्हणाले. 

अर्थात अलीकडे कोणाचा गुन्हा मान्य करायचा नाही, अशी सरकार चालवणाऱ्यांची भूमिका दिसते. त्यामुळे नाशिकच्या न्यायालयाने कोकाटे यांना शिक्षा दिली तरी पुढे काय होते, ते बघावे लागेल, असे जयंत पाटील म्हणाले. तसेच, पुण्यात एका एसटी बसमध्ये झालेल्या बलात्काराबाबत बोलताना त्यांनी बलात्कार करून महिलांना मारून टाकणे, अशा अत्याचाराच्या घटना खूप वाढल्या असून सरकारचा धाक नसल्याचे दिसते. 

बस डेपोत असे प्रकार होणे खूपच गंभीर आहे, सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, असे जयंत पाटील म्हणाले. याशिवाय, बीडमधील घटनेतील फरार आरोपीबद्दल बोलताना त्यांनी परदेशात जाणाऱ्या मंत्र्याचा मुलगा परदेशात जात असेल तर त्याला विमान फिरवून परत आणू शकतो तर भारताच लपलेल्या आरोपीला हुडकण्यास काय अडचण आहे, असा प्रश्न केला आहे.

१५ ऑगस्टपर्यंत तरी पालकमंत्री जाहीर करावानाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. २६ जानेवारीच्या अगोदर पालकमंत्रिपद स्थगित झाले आता १५ ऑगस्टपर्यंत तरी पालकमंत्री घोषित करावा, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेJayant Patilजयंत पाटीलNashikनाशिक