शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या वातावरणाच्या संशोधनाची माहिती प्रदर्शनात यावी

By admin | Updated: November 19, 2014 01:15 IST

बदलत्या वातावरणाच्या संशोधनाची माहिती प्रदर्शनात यावी

  नाशिक : शेतीला सर्वाधिक फटका हा वातावरण बदलाचा बसतो आहे़ अचानक येणारा पाऊस, गारपीट यामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत असून, बदलत्या वातावरणाची पूर्वसूचना देणारे तंत्रज्ञान प्रदर्शनातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे, असे मत खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी येथे व्यक्त केले़ 'ुमन सर्र्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स यांच्या वतीने ठक्कर मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कृषिथॉन कृषी प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते़ गेले पाच दिवस सुरू असलेल्या या प्रदर्शनाचा आज समारोप झाला़ यावेळी चव्हाण व उपस्थितांच्या हस्ते उत्कृष्ट सजावटीचा स्टॉल हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रने पटकावला़ तसेच इतर स्टॉलधारकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले़ पाऊस सुरू असतानाही जिल्'ासह राज्यभरातून तसेच इतर राज्यांतील अशा सुमारे तीन लाख शेतकऱ्यांनी प्रदर्शनास भेट दिली व प्रदर्शनात सुमारे ५० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला़ याप्रसंगी आत्मा प्रकल्पाचे सागर खैरनार, औरंगाबाद राष्ट्रवादी कॉँगे्रसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, आयोजक संजय न्याहारकर, विजय पाटील, साहिल न्याहारकर, भगवान खैरनार, संजय सोनवणे आदि उपस्थित होते़ अखेरच्या सत्रात आज यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कृषी विभागप्रमुख रावसाहेब पाटील यांनी कृषी क्षमता व पोषणमूल्य यावर मार्गदर्शन केले़ तसेच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांना कृषी विज्ञान केंद्राचे हेमराज राजपूत यांनी उत्तरे दिली़ नांदेड येथील व्यंकटेश जोशी व शिवाजी केश्वटवार यांनी सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन केले़