शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
2
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
4
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
5
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
6
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
7
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
8
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
9
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
10
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
12
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
13
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
14
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
15
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
16
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
17
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
18
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
19
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
20
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?

‘इंडिया बुल्स’ पूर्णत्वाकडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:55 IST

कोळशापासून तयार केलेली वीज आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे सांगत सिन्नरच्या विशेष आर्थिक क्षेत्रात रतन इंडियाने उभारलेला विद्युत प्रकल्प भंगारात निघाल्याचे ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी सांगितले असले तरी, या कंपनीचा १३५० मेगावॉट विजेची निर्मिती करणारा प्रकल्प पूर्ण झालेला असून, त्याची डिझेल व कोळशाचा वापर करून चाचणीही झालेली असल्याने कोणत्याही परिस्थितीत नजीकच्या काळात या प्रकल्पातून वीजनिर्मिती केली जाईल, असा दावा कंपनीने केला आहे.

नाशिक : कोळशापासून तयार केलेली वीज आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे सांगत सिन्नरच्या विशेष आर्थिक क्षेत्रात रतन इंडियाने उभारलेला विद्युत प्रकल्प भंगारात निघाल्याचे ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी सांगितले असले तरी, या कंपनीचा १३५० मेगावॉट विजेची निर्मिती करणारा प्रकल्प पूर्ण झालेला असून, त्याची डिझेल व कोळशाचा वापर करून चाचणीही झालेली असल्याने कोणत्याही परिस्थितीत नजीकच्या काळात या प्रकल्पातून वीजनिर्मिती केली जाईल, असा दावा कंपनीने केला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने सन २००७ मध्ये देशात उद्योग वृद्धिंगत करण्यासाठी ठिकठिकाणी विशेष आर्थिक क्षेत्र विकसित करण्याचा निर्णय घेतला होता व त्याअनुषंगाने सिन्नर तालुक्यातील गुळवंच व मुसळगाव येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून १०४७ हेक्टर जागा संपादित करण्यात आली होती. सिन्नरच्या औद्योगिक वसाहतीचा विस्तार होऊन त्याचा परिणाम रोजगार निर्मितीवर तसेच व्यापार, उद्योगावर होण्याच्या आशेने येथील शेतकºयांनी स्वखुशीने आपली जागा विशेष आर्थिक क्षेत्रासाठी दिली होती. एमआयडीसीने संपािदत केलेली ही जागा इंडिया बुल्सला त्यावेळी भाड्याने दिली. या विशेष आर्थिक क्षेत्रात प्रोसेसिंग व नॉन प्रोसेसिंग असे दोन विभाग असून, प्रोसेसिंग विभागात उद्योगांना जागा दिली जाणार आहे, तर नॉन प्रोसेसिंग भागात रहिवास व अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राखीव आहे.नॉन प्रोसेसिंग भागातील ९६३ एकर जागेवर सुमारे आठ हजार कोटी रुपये खर्च करून इंडिया बुल्सने वीज प्रकल्प उभारला आहे. त्यात प्रामुख्याने २७० मेगावॉट वीज निर्माण करणारे पाच युनिट उभारण्यात आले आहेत. त्यातून एकाच वेळी १३५० मेगावॉट वीज निर्मिती होईल. या प्रकल्पाची चाचणीही पूर्ण झाली असून, कोळसाद्वारे वीज निर्मिती केली जाणार असल्याने एकलहरे येथून कोळसा वाहून आणण्यासाठी गुळवंचपर्यंत थेट स्वतंत्र रेल्वेलाइनही टाकण्याचे काम सुरू आहे. या रेल्वेसाठीही इंडिया बुल्सने हजारो कोटी रुपये आजवर खर्च केले असून, त्याचे कामही ६० टक्के पूर्ण झाले आहे. इंडिया बुल्सने विशेष आर्थिक क्षेत्रासाठी हजारो कोटी रुपये आजवर खर्च केले असून, त्यासाठी पॉवर फायनान्स कार्पोरेशन कंपनीकडून इंडिया बुल्सने सुमारे ९ हजार कोटी रुपये कर्जही घेतले आहे. कंपनीकडून दुसºया टप्प्यात या वीज प्रकल्पाचे आणखी विस्तारीकरण केले जाणार आहे. त्यातून १३५० मेगावॉट वीज निर्मिती करण्याचा प्रस्ताव आहे. याशिवाय विशेष आर्थिक क्षेत्रात अन्य उद्योगांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी ले-आउटही मंजूर आहेत. केंद्र व राज्य सरकार ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून उद्योग- धंद्यांना प्रोत्साहन देतानाच, गुंतवणूकदारांना आकर्षित करीत आहे. असे असताना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी इंडिया बुल्सचा प्रकल्प ‘स्क्रॅप’मध्ये काढण्याच्या जाहीरपणे केलेल्या विधानांमुळे विशेष आर्थिक क्षेत्रासाठी जागा दिलेले शेतकरी, तेथे उद्योग उभारण्यासाठी उत्सुक असलेल्या उद्योजकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या संदर्भात वीज प्रकल्पाचे व्यवस्थापक एम. पी. सिंग यांना संपर्क साधला असता, त्यांनी ऊर्जामंत्र्यांच्या विधानाबद्दल अनभिज्ञता दर्शविली. इंडिया बुल्सचा वीज प्रकल्प पूर्ण झाला असून, कोणत्याही क्षणी त्यातून वीज निर्मिती केली जाऊ शकते.या प्रकल्पासाठी लागणारा कोळसा ने-आण करण्यासाठी रेल्वेचेही काम सुरू असून, ही व्यवस्था पूर्ण झाल्यास कोळशाचा प्रश्न सुटेल व कंपनी आपली वीज निर्मिती सुरू करेल, असे त्यांनी सांगितले. सरकारला आमची वीज नको असेल तर अन्य ग्राहकांना ती दिली जाईल व त्यासाठी टेंडर मागविले जाईल असेही ते म्हणाले.