शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

उन्हाचा तडाखा वाढताच टॅँकरची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 1:24 AM

पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ११३ टक्के पाऊस पडूनही एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात टॅँकरच्या मागणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली असून, उन्हाचा तडाखा वाढताच धरणांच्या साठ्यामध्येही कमालीची घट निर्माण झाली आहे. नेहमीच अवर्षणग्रस्त असलेल्या बागलाण व येवला तालुक्यात भीषण पाणीटंचाई भासू लागली असल्याने टॅँकर मागणीत वाढ झाली आहे.

नाशिक : पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ११३ टक्के पाऊस पडूनही एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात टॅँकरच्या मागणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली असून, उन्हाचा तडाखा वाढताच धरणांच्या साठ्यामध्येही कमालीची घट निर्माण झाली आहे. नेहमीच अवर्षणग्रस्त असलेल्या बागलाण व येवला तालुक्यात भीषण पाणीटंचाई भासू लागली असल्याने टॅँकर मागणीत वाढ झाली आहे. येवला व बागलाण या दोन तालुक्यांना जानेवारी महिन्यापासूनच पाण्याची टंचाई भासू लागलेली असताना प्रशासनाने निव्वळ आडमुठेपणामुळे टॅँकर मंजूर करण्यास तब्बल दीड महिना टाळाटाळ केली. फेब्रुवारीच्या अखेरीस प्रशासनाने टॅँकरला मंजुरी दिली असली तरी, अजूनही पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. उलट मार्चअखेरपासून जिल्ह्यात उष्णतेच्या पाऱ्याने ४० अंश सेल्सिअस तपमान गाठल्यामुळे पाण्याच्या मागणीत वाढ झाली. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात ५७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर खुद्द गंगापूर धरणात ५९ टक्के पाणी असल्याने नाशिककरांना दोन महिने चिंता करण्याची तशी गरज नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दारणा धरणात ७१ टक्के साठा असून, मे महिन्यात नगर व औरंगाबाद जिल्ह्यासाठी दोन आवर्तने सोडण्यात येणार आहेत. गिरणा खोºयात ३० टक्के, तर पालखेड धरण समूहात ३४ टक्केच पाणी शिल्लक आहे.  सध्या जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, येवला व सिन्नर या चार तालुक्यांतील २१ गावे व एक वाडीसाठी १३ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, येवला तालुक्यातील  १३ गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. पाणीटंचाई भासणाºया गावांमध्ये गारखेडे, सोमठाण गणेश, सायगाव, कोटखेडे, वसंतनगर, गोरखनगर, पांजरवाडी, शिवाजीनगर, रेंडाळे, आडसुरेगाव, भुलेगाव, अनकाई या गावांचा समावेश आहे. गेल्या वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्णात फक्त ८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यात बागलाणला ७ व मालेगावच्या १ टॅँकरचा समावेश होता. त्यामानाने गेल्या पावसाळ्यात चांगला पाऊस होऊनही यंदा ग्रामीण भागात पाण्याची समस्या गंभीर झाली आहे.

टॅग्स :Waterपाणी