शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या पातळीत वाढ; चार धरणांतून विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 00:59 IST

शहर व जिल्ह्यात पावसाचा मुक्काम कायम असून, त्यामुळे धरणसाठ्यात वाढ होऊ लागल्याने दारणासह चार धरणांतून काही प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर दुपारी शहर व परिसरात पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे त्याचा जनजीवनावर परिणाम झाला.

ठळक मुद्देपावसाचा मुक्काम कायम : गंगापूरमध्ये ६७ टक्के साठा

नाशिक : शहर व जिल्ह्यात पावसाचा मुक्काम कायम असून, त्यामुळे धरणसाठ्यात वाढ होऊ लागल्याने दारणासह चार धरणांतून काही प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. शुक्रवारी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर दुपारी शहर व परिसरात पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे त्याचा जनजीवनावर परिणाम झाला.चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारीदेखील हजेरी कायम ठेवली. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात ६०२ मिलिमीटर म्हणजे सरासरी ४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या पावसाच्या माहेरघरी अतिवृष्टी झाली आहे. दोन्ही तालुक्यांमध्ये अनुक्रमे १२० व ११० मिलिमीटर इतका पाऊस झाला. पावसाळा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस नोंदविला गेला आहे.दारणा धरणात ९३ टक्के पाणीसाठानाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ६७ टक्के तर धरण समूहात ४८ टक्के जलसाठा झाला असून, दारणा धरण ९३ टक्के भरल्यामुळे शुक्रवारी मध्यरात्रीपासून धरणातून विसर्ग सुरू केल्याने दारणा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे.च्याशिवाय शंभर टक्के भरलेल्या भावली व हरणबारी या दोन्ही धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. पुनंद व माणिकपुंजमधून देखील काही प्रमाणात पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाला घ्यावा लागला.पेठला ५३ व सुरगाण्याला ६२ मिलिमीटर पाऊस झाला. अन्य तालुक्यातही पावसाने कमीअधिक प्रमाणात हजेरी कायम ठेवल्याने शेतकरी सुखावले आहेत. या पावसामुळे नदी, नालेही वाहू लागले असून, धरणांच्या साठ्यात वाढ झाली. चोवीस तासात जिल्ह्यातील धरणांमध्ये दोन टक्क्याने वाढ होऊन ५३ टक्के पाणी साठले आहे.

टॅग्स :NashikनाशिकDamधरणRainपाऊस