शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

व्यवसायाला धर्मापेक्षाही मोठे मानले तर यश निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:34 IST

आपला उद्योग आणि उत्पादनाच्या ब्रॅन्डला ख्याती मिळवून द्यायची तर त्या ध्यासाने परिश्रम आवश्यक असतात. केवळ जिद्दीनेच नव्हे तर त्यापेक्षाही अधिक इरेला पेटून व्यवसाय केला आणि व्यवसायाला धर्मापेक्षाही मोठे मानले तर यश निश्चित मिळते, असा यशाचा मंत्र मसालाकिंग धनंजय दातार यांनी ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल (बीबीएनजी) या संस्थेच्या पाचव्या परिषदेत बोलतांना दिला.

ठळक मुद्देमसालाकिंग धनंजय दातार । ‘बीबीएनजी’च्या कौस्तुभ पुरस्कारांचे वितरण

नाशिक : आपला उद्योग आणि उत्पादनाच्या ब्रॅन्डला ख्याती मिळवून द्यायची तर त्या ध्यासाने परिश्रम आवश्यक असतात. केवळ जिद्दीनेच नव्हे तर त्यापेक्षाही अधिक इरेला पेटून व्यवसाय केला आणि व्यवसायाला धर्मापेक्षाही मोठे मानले तर यश निश्चित मिळते, असा यशाचा मंत्र मसालाकिंग धनंजय दातार यांनी ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल (बीबीएनजी) या संस्थेच्या पाचव्या परिषदेत बोलतांना दिला.गोविंदनगरमधील मनोहर गार्डन येथे झालेल्या या परिषदेत राज्याच्या विविध भागांसह अन्य राज्यांतील ब्राह्मण उद्योजक, व्यावसायिक सहभागी झाले होते. यावेळी दातार यांच्या हस्ते प्रख्यात उद्योजक राम भोगले(औरंगाबाद) यांना जीवनगौरव तर गिरीश टिळक, राजेश व्यास, डॉ. सुहास नांदुर्डीकर आणि शरद पोंक्षे यांना उद्योग कौस्तुभ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.दातार यांनी यावेळी बोलताना उद्योग कसा करावा, हे सांगण्यापेक्षा मी उद्योग कसा केला, कसा वाढवला त्याचे स्वानुभव कथन केले. आपण एका दुकानदाराचे बघून व्यवसायातून दररोज विशिष्ट रक्कम बाजूला काढू लागल्याने मोठी रक्कम जमा होऊ लागली. कमी व्याजदाराने काही कर्ज घेतले. त्यातून मग अन्य शहरांमध्ये अजून दुकाने सुरू केली. तरुणाईचा कल बघून धंद्याच्या स्वरूपात बदल करीत सर्वत्र चकाचक स्वरूप आणले. तसेच ग्राहकाशी सदैव नम्रतेने वागलो. त्यामुळेच अरब देशातगेलेला एक सामान्य घरातील मुलगा अरबपती झाला व फोर्ब्जच्या यादीत जगातील श्रीमंतांमध्ये चौदाव्या स्थानी झळकू लागल्याचे दातार यांनी नमूदकेले.पुरस्कारार्थींच्या वतीने शरद पोंक्षे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर महापौर सतीश कुलकर्णी, वंदना दातार, बीबीएनजीचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, सचिव विराज लोमटे, मुकुंद कुलकर्णी, अभिजित चांदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.मुंबईत दारोदार फिरून माल विकलामुंबईत आणि विशेषत: ठाण्यात दारोदार फिरून आपण इन्स्टंट मिक्स व फिनाईल विकायचो. काही लोक चौकशा खूप करायचे आणि घ्यायचे मात्र काही नाही. दिवसभर शेकडो जिने चढ-उतार करून दिवसाला कशाबशा फिनेलच्या १५-२० बाटल्या विकल्या जायच्या. पण त्या सगळ्या अनुभवांमधून खूप शिकायला मिळाले. अपयशने खचून न जाता परिश्रम करीत राहण्याचा धडा यातून मिळाला, असे दातार यांनी सांगितले़आईकडून मिळाले सर्वात मोठे बक्षीसदुबईत गेल्यावर लादी पुसण्यापासून ओझी वाहण्यापर्यंतची कामे केली. छोटासा व्यवसाय सुरू केल्यानंतर तेथील क्रेडीटच्या पद्धतीमुळे व्यवसायात पूर्ण तोटा झाला. आईला कळवल्यावर आईने मंगळसूत्रासह दागिने विकून उद्योगासाठी पैसे दिले. भविष्यात व्यवसाय यशस्वी केल्यानंतर आईला दागिने परत केले, तेव्हा आईने मायेने तोंडावरून फिरवलेला हात हे माझ्यासाठी सर्वात मोठे बक्षीस होते, असे दातार यांनी सभागृहात सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

टॅग्स :cultureसांस्कृतिक