शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

ट्रकच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार; दोन अपघातांत तिघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 19:55 IST

जेलरोड कोठारी कन्या शाळा येथे रस्ता ओलांडताना दुचाकी-ट्रकमध्ये अपघात होऊन लाखलगाव येथील पती-पत्नी ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना घडली.

ठळक मुद्देजेलरोड, आडगाव शिवारात घडल्या दुर्घटना

नाशिक : शहरातील जेलरोड व आडगाव शिवारात महामार्गालगत भरधाव ट्रक व कंटेनरच्या धडकेत दुचाकीने प्रवास करणाऱ्या एका दाम्पत्यासह दुसऱ्या प्रवासी महिलेचा बुधवारी (दि.२१) जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.जेलरोड कोठारी कन्या शाळा येथे रस्ता ओलांडताना दुचाकी-ट्रकमध्ये अपघात होऊन लाखलगाव येथील पती-पत्नी ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना घडली. नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील लाखलगाव येथील चंद्रभान अशोक जाधव (४१) व त्यांची पत्नी मनीषा चंद्रभान जाधव (३८) हे दोघे बुधवारी दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास भारत प्रतिभूती मुद्रणालयाकडून कोठारी कन्या शाळेजवळून त्यांच्या दुचाकीने (एम.एच.१५ एफवाय ७२०३) मार्गस्थ होत जेलरोडकडे वळण घेत होते. यावेळी जेलरोडकडून बिटकोकडे येणारा ट्रक (एमएच०४ डीएस ३५१४) व जाधव यांच्या दुचाकीमध्ये अपघात झाला. यामध्ये चंद्रभान व त्यांची पत्नी मनीषा जाधव हे दोघेही ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त दोन्ही वाहने व ट्रकचालक शेख हसन भिकन (रा. सिन्नर) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत चंद्रभान जाधव यांच्या पश्चात आई, दोन लहान मुले, भाऊ, भावजई असा परिवार आहे. 

आडगावला कंटनेरच्या धडकेत महिला ठार

 मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारात असलेल्या हॉटेल जत्रा चौफुलीवर पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटनेरने रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुका येथील महिला जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत कंटेनर चालकाविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात राहणारे खंडू बाळू आगविले व त्यांची पत्नी निर्मला खंडू आगविले हे दाम्पत्य औरंगाबाद येथून घोटी-इगतपुरीला जात असताना हॉटेल जत्रा चौफुलीजवळ त्यांची दुचाकी (एमएच २० सी जी ५३८६) उभी केली असता पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या दहाचाकी अवजड कंटेनरच्या ( एम एच.१५ ईजी ४७९१) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीजवळ उभ्या असलेल्या निर्मला गंभीर जखमी झाल्याने त्यांना त्यांच्या पतीने तत्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली अपघाताबाबत सिन्नर येथील कंटेनरचालक अशोक रावबा चकोर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयAccidentअपघातDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारी