शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

दफ्तर सांभाळताना धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:51 IST

नाशिक : जिल्ह्यासह शहरातही मान्सूनचे आगमन झालेले असतानाच प्लॅस्टिकबंदीची अंमलबाजवणीही सुरू असल्यामुळे दैनंदिन कामात प्लॅस्टिकचा वापर करता येत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांसह रोज शाळेत जाणारे विद्यार्थी आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठी घराबाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्रं व दफ्तर सांभाळतांना धांदल उडताना दिसत आहे.

ठळक मुद्देप्लॅस्टिकबंदीचा परिणाम : पावसापासून वह्या-पुस्तके वाचविण्यासाठी कसरत

नाशिक : जिल्ह्यासह शहरातही मान्सूनचे आगमन झालेले असतानाच प्लॅस्टिकबंदीची अंमलबाजवणीही सुरू असल्यामुळे दैनंदिन कामात प्लॅस्टिकचा वापर करता येत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांसह रोज शाळेत जाणारे विद्यार्थी आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठी घराबाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्रं व दफ्तर सांभाळतांना धांदल उडताना दिसत आहे.सध्या अकरावी प्रवेशासह विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्र्रक्रिया सुरू असून, त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असलेले कागदपत्र सोबत घेऊन सायबर कॅफेसह मार्गदर्शन केंद्र, सुविधा केंद्र, रिपोर्टिंग सेंटर आणि शाळा महाविद्यालयांमध्ये फिरावे लागत आहे.त्याचप्रमाणे प्रवेशासाठी आवश्यक असलेले जातीचे दाखले, जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले आदी विविध कागदपत्रं जमविण्यासाठी आणि ते प्रवेशप्रक्रियेत सादर करण्यासाठी पावसात फिरावे लागत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्यासाठी अतिमहत्त्वाचे असे हे कागदपत्रं भिजून खराब होण्याची भीती आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी विद्यार्थ्यांना कागदपत्रं अथवा दफ्तरातील वह्या पुस्तकांचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्या वापर येत नसल्याने पावसात महत्त्वाचे कागद आणि वह्या पुस्तके कशी जपावीत, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.शहरात प्लॅस्टिकबंदीची कडेकोट अंमलबजावणी सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्लॅस्टिकची पिशवी वापरण्याविषयी भीती आहे. त्यामुळे विद्यार्थी जाड फाइल व बॅगमधून कागदपत्रं घेऊन जात असले तरी अधूनमधून पावसाचा जोर वाढत असल्याने कागदपत्रं वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या इमारती, रस्त्यांच्या कडेची वृक्ष, बसस्थानके, चहाच्या टपºया व रस्त्यालगतच्या दुकानांच्या आश्रयाला उभे राहावे लागत असल्याने शैक्षणिक प्रवेशासाठी व शाळा महाविद्यालयांमध्ये जाताना पाण्यापासून धोका असलेले कागदपत्रं आणि वह्या पुसके सांभाळायच्या कशा? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.

पावसामुळे रेनकोटमध्येही पाणी शिरते. अशा पावसात पिशवी अथवा बॅगमध्ये कागदपत्र व प्रमाणपत्र ओले होऊन खराब झाल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे किमान विद्यार्थ्यांना तरी प्लॅस्टिक बंदीतून सवलत देण्याची गरज आहे.-मयूर कोष्टी, विद्यार्थी

प्लॅस्टिकच्या पिशवीत कागदपत्रं, प्रमाणपत्र ठेवले तर कितीही पावसात ते ओले होत नाही. परंतु, प्लॅस्टिक बंदी लागू झाल्यामुळे प्रवेशासाठी बाहेर पडताना प्लॅस्टिकची पिशवी सोबत ठेवू शकत नाही. त्याचप्रमाणे दुकानदारांकडेही प्लॅस्टिकच्या पिशव्या मिळत नसल्याने पाऊस थांबेपर्यंत तासनतास वाट पाहावी लागत असल्याने वेळ संपल्यास एकाच कामासाठी अनेक फेºया माराव्या लागतात.- रितेश टिळे, विद्यार्थी