शहरं
Join us  
Trending Stories
1
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
4
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
5
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
6
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
7
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
8
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
9
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
10
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
11
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
12
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
13
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
14
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
15
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
16
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
17
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
18
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
19
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
20
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
Daily Top 2Weekly Top 5

दफ्तर सांभाळताना धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:51 IST

नाशिक : जिल्ह्यासह शहरातही मान्सूनचे आगमन झालेले असतानाच प्लॅस्टिकबंदीची अंमलबाजवणीही सुरू असल्यामुळे दैनंदिन कामात प्लॅस्टिकचा वापर करता येत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांसह रोज शाळेत जाणारे विद्यार्थी आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठी घराबाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्रं व दफ्तर सांभाळतांना धांदल उडताना दिसत आहे.

ठळक मुद्देप्लॅस्टिकबंदीचा परिणाम : पावसापासून वह्या-पुस्तके वाचविण्यासाठी कसरत

नाशिक : जिल्ह्यासह शहरातही मान्सूनचे आगमन झालेले असतानाच प्लॅस्टिकबंदीची अंमलबाजवणीही सुरू असल्यामुळे दैनंदिन कामात प्लॅस्टिकचा वापर करता येत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांसह रोज शाळेत जाणारे विद्यार्थी आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठी घराबाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्रं व दफ्तर सांभाळतांना धांदल उडताना दिसत आहे.सध्या अकरावी प्रवेशासह विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्र्रक्रिया सुरू असून, त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असलेले कागदपत्र सोबत घेऊन सायबर कॅफेसह मार्गदर्शन केंद्र, सुविधा केंद्र, रिपोर्टिंग सेंटर आणि शाळा महाविद्यालयांमध्ये फिरावे लागत आहे.त्याचप्रमाणे प्रवेशासाठी आवश्यक असलेले जातीचे दाखले, जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले आदी विविध कागदपत्रं जमविण्यासाठी आणि ते प्रवेशप्रक्रियेत सादर करण्यासाठी पावसात फिरावे लागत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्यासाठी अतिमहत्त्वाचे असे हे कागदपत्रं भिजून खराब होण्याची भीती आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी विद्यार्थ्यांना कागदपत्रं अथवा दफ्तरातील वह्या पुस्तकांचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्या वापर येत नसल्याने पावसात महत्त्वाचे कागद आणि वह्या पुस्तके कशी जपावीत, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.शहरात प्लॅस्टिकबंदीची कडेकोट अंमलबजावणी सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्लॅस्टिकची पिशवी वापरण्याविषयी भीती आहे. त्यामुळे विद्यार्थी जाड फाइल व बॅगमधून कागदपत्रं घेऊन जात असले तरी अधूनमधून पावसाचा जोर वाढत असल्याने कागदपत्रं वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या इमारती, रस्त्यांच्या कडेची वृक्ष, बसस्थानके, चहाच्या टपºया व रस्त्यालगतच्या दुकानांच्या आश्रयाला उभे राहावे लागत असल्याने शैक्षणिक प्रवेशासाठी व शाळा महाविद्यालयांमध्ये जाताना पाण्यापासून धोका असलेले कागदपत्रं आणि वह्या पुसके सांभाळायच्या कशा? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.

पावसामुळे रेनकोटमध्येही पाणी शिरते. अशा पावसात पिशवी अथवा बॅगमध्ये कागदपत्र व प्रमाणपत्र ओले होऊन खराब झाल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे किमान विद्यार्थ्यांना तरी प्लॅस्टिक बंदीतून सवलत देण्याची गरज आहे.-मयूर कोष्टी, विद्यार्थी

प्लॅस्टिकच्या पिशवीत कागदपत्रं, प्रमाणपत्र ठेवले तर कितीही पावसात ते ओले होत नाही. परंतु, प्लॅस्टिक बंदी लागू झाल्यामुळे प्रवेशासाठी बाहेर पडताना प्लॅस्टिकची पिशवी सोबत ठेवू शकत नाही. त्याचप्रमाणे दुकानदारांकडेही प्लॅस्टिकच्या पिशव्या मिळत नसल्याने पाऊस थांबेपर्यंत तासनतास वाट पाहावी लागत असल्याने वेळ संपल्यास एकाच कामासाठी अनेक फेºया माराव्या लागतात.- रितेश टिळे, विद्यार्थी