शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: वैष्णवी हगवणे यांच्या फरार सासऱ्याला अटक; दीरही पोलिसांच्या जाळ्यात, पहाटे कारवाई
2
बांगलादेशी सैन्याने डोळे वटारले; मोहम्मद युनूस यांच्या गोटात पळापळ, राजीनामा देण्यास तयार
3
हार्वर्ड विद्यापीठात दुसऱ्या देशांतील विद्यार्थ्यांना नो एन्ट्री! ट्रम्प प्रशासनाने घेतला मोठा निर्णय
4
Vaishnavi Hagawane Death Case : फरार काळात मटणावर ताव, हगवणे पिता -पुत्राचा फरार काळातील सीसीटीव्ही आला समोर
5
पहलगाम हल्ल्याआधी दिल्ली होते टार्गेटवर, ISI एजंट अन्सारुल मियाँने चौकशीदरम्यान केले उघड
6
आजचे राशीभविष्य २३ मे २०२५ : अचानक धनलाभ संभवतो, कसा असेल आजचा दिवस...
7
नसांत रक्त नव्हे तर गरम सिंदूर वाहतोय! दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत पाकला मोजावी लागेल: PM
8
जपान, अरब अमिरातीचा भारताला भक्कम पाठिंबा; भारतीय शिष्टमंडळांनी मांडली प्रभावी भूमिका
9
पाक म्हणे, १९७१च्या युद्धातील पराभवाचा आम्ही बदला घेतला; शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती
10
वक्फ बोर्ड: आव्हान याचिकांवरील अंतरिम आदेश राखून ठेवला; ३ दिवस सुनावणीनंतर SCचा निर्णय
11
ED मर्यादा ओलांडतेय; SCचे फटकारे, संघराज्य संकल्पनेचेही उल्लंघन केल्याने सुनावले खडेबोल
12
धुळ्याच्या नोटघबाडाची SIT चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, कारवाई करणार
13
७०-७५ उमेदवारांची तयारी, २२७ पैकी १०० जागांवर मुंबईत शिंदेसेनेचा दावा; भाजपच्या पोटात गोळा!
14
३,७०० कामगारांची नोकरी वाचली; उद्धव ठाकरेंकडून समधान व्यक्त, कामगार सेनेचे नेते मातोश्रीवर
15
आम्ही तयार आहोत! मनसेशी युतीसाठी उद्धवसेना सकारात्मक; ठाकरे गटाच्या नेत्यांकडून प्रतिसाद
16
काश्मीरमध्ये अहिल्यानगरचा जवान शहीद; दहशतवाद्यांविरुद्ध लढताना संदीप गायकर यांना हौतात्म्य
17
सलमान खानच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न; महिलेसह दोघांना वांद्रे पोलिसांकडून अटक
18
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
19
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
20
IPL 2025 : शाहरुख खान काठावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी

दफ्तर सांभाळताना धांदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:51 IST

नाशिक : जिल्ह्यासह शहरातही मान्सूनचे आगमन झालेले असतानाच प्लॅस्टिकबंदीची अंमलबाजवणीही सुरू असल्यामुळे दैनंदिन कामात प्लॅस्टिकचा वापर करता येत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांसह रोज शाळेत जाणारे विद्यार्थी आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठी घराबाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्रं व दफ्तर सांभाळतांना धांदल उडताना दिसत आहे.

ठळक मुद्देप्लॅस्टिकबंदीचा परिणाम : पावसापासून वह्या-पुस्तके वाचविण्यासाठी कसरत

नाशिक : जिल्ह्यासह शहरातही मान्सूनचे आगमन झालेले असतानाच प्लॅस्टिकबंदीची अंमलबाजवणीही सुरू असल्यामुळे दैनंदिन कामात प्लॅस्टिकचा वापर करता येत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांसह रोज शाळेत जाणारे विद्यार्थी आणि महाविद्यालयीन प्रवेशासाठी घराबाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची कागदपत्रं व दफ्तर सांभाळतांना धांदल उडताना दिसत आहे.सध्या अकरावी प्रवेशासह विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्र्रक्रिया सुरू असून, त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असलेले कागदपत्र सोबत घेऊन सायबर कॅफेसह मार्गदर्शन केंद्र, सुविधा केंद्र, रिपोर्टिंग सेंटर आणि शाळा महाविद्यालयांमध्ये फिरावे लागत आहे.त्याचप्रमाणे प्रवेशासाठी आवश्यक असलेले जातीचे दाखले, जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले आदी विविध कागदपत्रं जमविण्यासाठी आणि ते प्रवेशप्रक्रियेत सादर करण्यासाठी पावसात फिरावे लागत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्यासाठी अतिमहत्त्वाचे असे हे कागदपत्रं भिजून खराब होण्याची भीती आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी विद्यार्थ्यांना कागदपत्रं अथवा दफ्तरातील वह्या पुस्तकांचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्या वापर येत नसल्याने पावसात महत्त्वाचे कागद आणि वह्या पुस्तके कशी जपावीत, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.शहरात प्लॅस्टिकबंदीची कडेकोट अंमलबजावणी सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्लॅस्टिकची पिशवी वापरण्याविषयी भीती आहे. त्यामुळे विद्यार्थी जाड फाइल व बॅगमधून कागदपत्रं घेऊन जात असले तरी अधूनमधून पावसाचा जोर वाढत असल्याने कागदपत्रं वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या इमारती, रस्त्यांच्या कडेची वृक्ष, बसस्थानके, चहाच्या टपºया व रस्त्यालगतच्या दुकानांच्या आश्रयाला उभे राहावे लागत असल्याने शैक्षणिक प्रवेशासाठी व शाळा महाविद्यालयांमध्ये जाताना पाण्यापासून धोका असलेले कागदपत्रं आणि वह्या पुसके सांभाळायच्या कशा? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.

पावसामुळे रेनकोटमध्येही पाणी शिरते. अशा पावसात पिशवी अथवा बॅगमध्ये कागदपत्र व प्रमाणपत्र ओले होऊन खराब झाल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे किमान विद्यार्थ्यांना तरी प्लॅस्टिक बंदीतून सवलत देण्याची गरज आहे.-मयूर कोष्टी, विद्यार्थी

प्लॅस्टिकच्या पिशवीत कागदपत्रं, प्रमाणपत्र ठेवले तर कितीही पावसात ते ओले होत नाही. परंतु, प्लॅस्टिक बंदी लागू झाल्यामुळे प्रवेशासाठी बाहेर पडताना प्लॅस्टिकची पिशवी सोबत ठेवू शकत नाही. त्याचप्रमाणे दुकानदारांकडेही प्लॅस्टिकच्या पिशव्या मिळत नसल्याने पाऊस थांबेपर्यंत तासनतास वाट पाहावी लागत असल्याने वेळ संपल्यास एकाच कामासाठी अनेक फेºया माराव्या लागतात.- रितेश टिळे, विद्यार्थी