शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जिल्ह्यातील निर्बंधात शिथिलता मात्र काही मर्यादाही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 01:02 IST

कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने राज्य शासनाने निर्बंधांमध्ये शिथिलता दिलेली आहे. राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातही निर्बंध शिथिल होणार आहेत; मात्र राज्यातील ज्या अकरा जिल्ह्यांमध्ये अधिक शिथिलता देण्यात आलेली आहे त्यामध्ये अद्यापही नाशिकचा समावेश झालेला नाही. जास्तीत जास्त लसीकरण झाले तरच जिल्ह्याला अधिकची मुभा मिळणार आहे.

ठळक मुद्देलसीकरणाची अट : अधिक शिथिलतेसाठी लसीकरणावर द्यावा लागणार भर

नाशिक : कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्याने राज्य शासनाने निर्बंधांमध्ये शिथिलता दिलेली आहे. राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातही निर्बंध शिथिल होणार आहेत; मात्र राज्यातील ज्या अकरा जिल्ह्यांमध्ये अधिक शिथिलता देण्यात आलेली आहे त्यामध्ये अद्यापही नाशिकचा समावेश झालेला नाही. जास्तीत जास्त लसीकरण झाले तरच जिल्ह्याला अधिकची मुभा मिळणार आहे. राज्य सरकारने मंगळवारपासून (दि. १) राज्यात कोरोना निर्बंध अधिक शिथिल केले आहेत. त्यामुळे अंत्ययात्रेच्या उपस्थितीवरील मर्यादा उठविण्यात आली असून, सलून, स्पा ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवली जाणार आहेत. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे आणि आठवडे बाजारदेखील सुरू होऊ शकतील; परंतु यापेक्षा अधिक मुभा जिल्ह्याला अद्यापही मिळालेली नाही. शासनाच्या आदेशानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये पहिला डोस ९० टक्के व दुसरा डोस ७० टक्के झालेला आहे त्यांना रेस्टॉरंट, थिएटर्स, नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. अशाप्रकारचे राज्यात अकरा जिल्हे आहेत. त्यामध्ये नाशिकचा समावेश नसल्याने जिल्ह्यात या सुविधांवरील निर्बंध कायम राहाणार असल्याचे दिसते. खुल्या मैदानात किंवा सभागृहात विवाह असल्यास तेथे केवळ २५ टक्के उपस्थिती राहाणार आहे.

--इन्फो--

राज्य शासनाच्या आदेशानुसार पहिला डोस ९० टक्के आणि दुसरा डोस ७० टक्के झालेल्या जिल्ह्यांचा समावेश ‘अ’ परिशिष्ठमध्ये करण्यात आलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील पहिल्या लसीकरणाचे प्रमाण ८२.८० टक्के, तर दुसऱ्या लसींचे प्रमाण ५२.२२ इतकेच असल्याने इतक्यात नाशिक जिल्ह्याचा समावेश या परिशिष्ठमध्ये झालेला नाही. त्यासाठी लसीकरणाची गती महत्त्वाची ठरणार आहे.

--कोट--

जिल्हा पातळीवर आपण खुली पर्यटनस्थळे बंद करण्याचा निर्णय १५ दिवसांपूर्वी घेतला होता. तो उतरती रुग्णसंख्या पाहता रद्द करण्यात आला आहे. बाकी सर्व नियम राज्य शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे जसेच्या तसे लागू राहतील. लसीकरणावर आधारित अकरा जिल्ह्यांना राज्य शासनाने अधिक शिथिलता दिलेली आहे. अद्याप नाशिकचा समावेश यात झालेला नाही. नागरिकांनी लसीकरणाकरिता पुढे यावे. जेणेकरून त्या वाढीव शिथिलतासुद्धा आपल्या जिल्ह्याला मिळू शकतील.

- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्या