शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
2
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
3
६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
4
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
5
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
6
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
7
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
8
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
9
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली
10
Anthem Biosciences IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; कधीपर्यंत आणि किती करावी लागेल गुंतवणूक, GMP किती?
11
मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?
12
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
13
अरे देवा! आई वारंवार भेंडीची भाजी बनवायची म्हणून लेक चिडला, १२०० किमी दूर पळून गेला अन्...
14
नोकरीसाठी डिग्री आणि सीव्हीची गरज नाही! थेट १ कोटी रुपयांचं पॅकेज, फक्त 'या' २ अटी पूर्ण करा
15
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
16
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
17
"कलाकाराला ऐकून घ्यावंच लागतं, पण..." शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं पुन्हा प्रत्युत्तर
18
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
19
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
20
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार

अशाने कमळ कसे फुलेल? 

By श्याम बागुल | Updated: February 13, 2019 19:08 IST

नाशिक विभागातील नाशिक व नगर जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघापैकी दोन मतदार संघ शिवसेनेकडे व दोन भारतीय जनता पक्षाकडे आहेत. त्यामुळे नाशिक मुक्कामी भाजपाने त्यांच्या शक्ती केंद्र प्रमुखाचे संमेलन नाशिकमध्ये घेणे यामागे दुहेरी अर्थ प्रतिध्वनीत होतो. मुळात शिवसेनेकडून त्यांचे

ठळक मुद्देखासदाराबरोबरच आमदार व मार्गदर्शकांनी पाठ फिरविल्याव्यासपीठावरील पदाधिका-यांनीही सोयीस्कर काढता पाय घेतला

श्याम बागुलनाशिक : लोकसभा निवडणूक दृष्टिपथात असली तरी ही निवडणूक राज्यात स्वबळावर लढविणार की शिवसेनेला बरोबर घेणार याविषयी खुद्द भाजपाच संभ्रमात असून, त्यातही युती झाली तर दोन्ही पक्षांना पूरकच ठरेल, अशी भावना विद्यमान खासदारांबरोबरच आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवणाऱ्या इच्छुकांचीदेखील आहे. असे असताना भारतीय जनता पक्षाने नुकतेच नाशिक येथे नाशिक व नगर जिल्ह्यातील प्रत्येकी दोन लोकसभा मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुखांचे संमेलन घेऊन त्यांच्या शिडात हवा भरण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु या संमेलनाकडे विद्यमान खासदाराबरोबरच आमदार व मार्गदर्शकांनी पाठ फिरविल्याने पक्षाचे शक्ती केंद्र म्हणून घेणा-या कार्यकर्त्यांचा शक्तीपातच झालेला दिसला. सत्ताधारी पक्षाच्या नेत्या, कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीपूर्वी अशा प्रकारची उदासीनता असेल तर निवडणुकीत कमळ कसे फुलेल?

नाशिक विभागातील नाशिक व नगर जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघापैकी दोन मतदार संघ शिवसेनेकडे व दोन भारतीय जनता पक्षाकडे आहेत. त्यामुळे नाशिक मुक्कामी भाजपाने त्यांच्या शक्ती केंद्र प्रमुखाचे संमेलन नाशिकमध्ये घेणे यामागे दुहेरी अर्थ प्रतिध्वनीत होतो. मुळात शिवसेनेकडून त्यांचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळण्याविषयी साशंकता आहे, त्यामागे नाशिक लोकसभा मतदारसंघाचा आजवरचा पूर्वेतिहासाचे कारण दिले जाते. एकदा निवडून दिलेला खासदार पुन्हा निवडून येत नाही व त्यातही त्याच पक्षाकडून त्याला उमेदवारी मिळाली तरी, त्याला यश मिळत नाही या वास्तवासी शिवसेना अवगत आहे, अशातच मध्यंतरीच्या काळात गोडसे यांचे स्थानिक नेतृत्वाशी बिघडलेले संबंध पाहता, शिवसेना नवीन चेह-याच्या शोधात असलेल्या होणा-या पक्षांतर्गत चर्चाशी स्वत: गोडसे अवगत आहेत. त्यामुळे त्यांनी दिल्ली दरबारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आदी मंडळींशी साधलेली जवळीकता बरेच काही सांगून गेली आहे. त्यामुळे निवडणूक युती झालीच नाही तर गोडसे भाजपाचे उमेदवार असणार नाही, अशी खात्री कोणी देऊ शकणार नाही. त्यामुळेच भाजपाच्या शक्ती केंद्र प्रमुखांच्या नाशिक संमेलनाला अधिक महत्त्व आहे. असे असले तरी, नाशिक लोकसभा मतदारसंघातील कार्यरत शक्ती केंद्र प्रमुखांची संख्या अगदीच बोटावर मोजण्याइतकी असल्याचा अनुभव आयोजकांनी घेत नाराजी व्यक्त केली. शिर्डीची जागादेखील शिवसेनेची आहे. सदाशिव लोखंडे खासदार असून, या जागेसाठीही तयारी करून भाजपा सेनेवर अप्रत्यक्ष दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेल्या नगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार दिलीप गांधी हे आवर्जून या संमेलनाला हजर होते, त्यांच्या मतदारसंघातील शक्ती केंद्र प्रमुख ख-या तयारीनेच आल्याचे जाणवल्याशिवाय राहिले नाही, त्या मानाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे स्वत:च या संमेलनाला गैरहजर राहिल्याने त्यांची निवडणुकीविषयीची गांभीर्यता दिसून आली. परंतु त्यांच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांची शक्तीदेखील कोठे दिसली नाही. या संमेलनाचे वैशिष्ट्ये म्हणजे प्रमुख मार्गदर्शक राष्टÑीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीला सामोरे कसे जावे याविषयी मार्गदर्शन करणे अपेक्षित असताना त्यांनी राजकीय भाषण करून आटोपते घेतले, त्यांनी व्यासपीठ सोडताच व्यासपीठावरील पदाधिका-यांनीही सोयीस्कर काढता पाय घेतला. या संमेलनासाठी राम शिंदे यांनी नावापुरती हजेरी लावली तर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सपशेल पाठ फिरविली. शक्ती केंद्र प्रमुख म्हणून आलेल्यांनी भोजनाचा आस्वाद व आपल्या भागातील मतदार याद्या घेऊन अवघ्या तीन तासांत दिवसभरासाठी आयोजित संमेलन पार पडले. ‘अब की बार फिर मोदी सरकार’ अशी घोषणा पक्ष एकीकडे देत असताना वास्तवात नेते, कार्यकर्त्यांमध्ये असे नैराश्य असेल तर पुन्हा कमळ कसे फुलणार असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकBJPभाजपा