शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

निसर्गप्रेमी पोलिसांच्या कामाला गृहमंत्र्यांकडून कौतुकाची थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 6:06 PM

कळवण : दिवसेंदिवस झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असुन पर्यावरणाचा ऱ्हास होत असतांना नांदुरी येथील कळवण पोलीस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल योगेश गवळी व निसर्गप्रेमीसौजन्य ग्रुप यांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी नांदुरी येथे वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनाचा विधायक उपक्रम राबवला जात आहे. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळतांनाच पोलिसांनी निसर्ग जोपासण्यासाठी चालवलेले प्रयत्न कौतुकाचा विषय ठरले असुन कळवण पोलिस स्टेशनसह गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांचे थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले आहे.

ठळक मुद्देनांदुरी घाटात पर्यावरण संवर्धन अन् वृक्षलागवडीने परीसराचा कायापालट

मनोज देवरेकळवण : दिवसेंदिवस झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असुन पर्यावरणाचा ऱ्हास होत असतांना नांदुरी येथील कळवण पोलीस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल योगेश गवळी व निसर्गप्रेमीसौजन्य ग्रुप यांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून सप्तशृंग गडाच्या पायथ्याशी नांदुरी येथे वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनाचा विधायक उपक्रम राबवला जात आहे. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळतांनाच पोलिसांनी निसर्ग जोपासण्यासाठी चालवलेले प्रयत्न कौतुकाचा विषय ठरले असुन कळवण पोलिस स्टेशनसह गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांचे थेट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले आहे.साडेतीन शक्तीपिठांपैकी अर्धपिठ असलेल्या सप्तशृंगीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातुन मोठ्या संख्येने भाविक येत असतात. सप्तशृंग गडाच्या परिसरात विविध औषधी वनस्पती असुन या परिसराला नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे. नांदुरी येथील पोलिस कर्मचारी योगेश गवळी यांच्या संकल्पनेतुन नांदुरीचा निसर्गप्रेमी सौजन्य ग्रुप व कळवण पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सप्तशृंग घाट ते नांदुरी नाक्यापर्यंत तसेच सप्तशृंग गडावर सुमारे एक हजार हून अधिक वृक्ष लावण्यात आले असुन त्यांची परिपुर्ण काळजी घेतली जात आहे.गवळी यांच्या या उपक्रमाची दखल घेत गृहमंत्री देशमुख यांनी आपल्या ट्विटर व फेसबुक अकाऊंटवर गवळी यांचे कौतुक केले आहे. त्यात त्यांनी गवळी यांचे कौतुक करत कळवण पोलिसांनी सामाजिक जाणिवेतून केलेले हे कार्य कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे. वृक्ष ही निसर्गाची अतिशय मौल्यवान संपत्ती असून आपण सर्व जण मिळून त्यांचे संवर्धन करूया असे आवाहनही देशमुख यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून केले आहे.दोन वर्षात हजाराहून अधिक वृक्ष लागवडदोन वर्षांपासून सुरू असलेल्या वृक्षारोपण व संवर्धन उपक्रमाच्या माध्यमातून नांदुरी ते सप्तशृंग गड घाटात पाचशे ते सहाशे,गडावर पाचशे विविध प्रकारचे वृक्ष लावण्यात आले आहेत. नांदुरी येथील तेरा महिला बचत गट तर सादडविहिर येथील सहा महिला बचत गटातील प्रत्येक महिलेला पाच असे एक हजार झाडे रोपण व संगोपनासाठी दिली आहेत.सुरवातीपासुनच निसर्गाशी जुळलेली नाळ कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. वृक्षारोपण व संवर्धन उपक्रमाची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेऊन कौतुक केले यामुळे अतिशय आनंद झाला असून निश्चितपणे आम्हाला प्रेरणा मिळाली आहे.- योगेश गवळी, पोलिस कॉन्स्टेबल.

टॅग्स :PoliceपोलिसSocialसामाजिक