शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

होळीचा सण : आदिवासी भागातील वनक्षेत्रात ‘अ‍ॅलर्ट’

By अझहर शेख | Published: March 20, 2019 1:54 PM

या पार्श्वभूमीवर होळीपुर्व जनप्रबोधन करत हरसूलसारख्या विविध वनपरिक्षेत्रांतर्गत ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत. या माध्यमातून गावकऱ्यांना होळी पेटविताना कुठल्याहीप्रकारची वृक्षतोड होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देहोळीचा सण जागतिक वनदिनाच्या पुर्वसंध्येला साजरा

अझहर शेख, नाशिक :होळी’निमित्तनाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, हरसूल, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, इगतपुरी आदि आदिवासीबहुल वनपरिक्षेत्रांमध्ये नाशिक पुर्व-पश्चिम वनविभागाकडून ‘अ‍ॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या अनुषंगाने या भागातील जंगलांमध्ये चोख गस्त घालण्याचे आदेश वनरक्षकांना देण्यात आले आहेत.

नाशिक जिल्ह्यात मोठ्या संख्येने वनक्षेत्र आदिवासी जिल्ह्यांमध्ये टिकून आहे. या भागातील जंगलसंवर्धन आदिवासी जनतेच्या मदतीने वनविभागाकडून केले जात आहे. ‘होळी’चा सण आदिवासी संस्कृतीती मोठा सण मानला जातो. या सणाला आदिवासी बांधवांकडून मोठा उत्सव साजरा होतो. या पार्श्वभूमीवर होळीपुर्व जनप्रबोधन करत हरसूलसारख्या विविध वनपरिक्षेत्रांतर्गत ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत. या माध्यमातून गावकऱ्यांना होळी पेटविताना कुठल्याहीप्रकारची वृक्षतोड होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. होळीचे निमित्त करून वनक्षेत्रात घुसखोरी करत वृक्षतोड करताना आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच होळीचा सण जागतिक वनदिनाच्या पुर्वसंध्येला साजरा होत असल्यामुळे त्या पार्श्वभूमीवर वनांचे महत्त्व पटवून देत जनजागृती करण्यावर वनविभागाकडून भर दिला जात आहे.संपुर्ण जिल्ह्याचा विचार केल्यास ३ हजार ४३० चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रावर वने टिकून आहेत. त्यापैकी वनविभागाच्या एकूण वनक्षेत्र ३ हजार १९२ चौरस किलोमीटर इतके आहे. यामध्ये संरक्षित वन क्षेत्र, राखीव वने, संरक्षित क्षेत्राचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्याची पुर्व-पश्चिम अशी विभागणी वनविभागाने तालुकानिहाय केली आहे.वनक्षेत्राच्या संरक्षण व संवर्धनासाठी नागरिकांनी वैयक्तिक सहभाग घेण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

वने टिकली तर पृथ्वी टिकेल...

वनांचे अस्तित्व सजीवसृष्टीसाठी महत्त्वाचे आहे. पर्यावरण आणि जैवविविधतेच्या जोपासणेसाठी वने टिकविणे ती वाढविणे काळाची गरज आहे. कारण वने टिकली तर पर्जन्यमानाचे प्रमाण संतुलन टिकून राहील आणि वनोपजाच्या माध्यमातून उदरनिर्वाहचा प्रश्न मार्गी लागेल तसेच वन्यप्राण्यांची जैवविविधता जोपासण्यास मदत होईल. चांगल्या पर्जन्यमानासाठी तसेच नदी, नाले, आहोळ वाहते ठेवण्यासाठी आपआपल्या भागातील वनांचे रक्षण करणे हे नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे. वनाच्छादित प्रदेश कसा वाढविता येईल, या दृष्टीकोनातून वृक्ष लागवड व संवर्धनावर भर देण्याची गरज आहे.---नाशिक जिल्ह्याची जैवविविधता समृध् व सक्षम करण्यासाठी वन संरक्षण करणे गरजेचे आहे. मागील काही वर्षांपासून वन्यप्राण्यांचा नागरी वस्तीकडे होणारा प्रवास वने संरक्षित नसल्याचे संकेत देणारा आहे. त्यामुळे वन्यप्राणी-मानव संघर्ष वाढण्यास मदत होत आहे. वने टिकली तर त्या वनांमध्ये वन्यप्राण्यांची गुजराणसाठी लागणाऱ्या नैसर्गिक संसाधनांची निर्मिती होईल, आणि त्यांचा नागरी वस्तीकडे होणारा प्रवास कुठेतरी थांबेल. नागरिकांनी कुºहाडबंदी, शिकारबंदी, चराईबंदीसह अतिक्रमणाचे नियम काटेकोरपणे पाळावेत. जंगलात स्वार्थापोटी आगी लावू नयेत. तसेच वृक्ष संवर्धनावर भर द्यावा, एवढेच आवाहन मी यानिमित्ताने करू इच्छितो. जंगलाला आगी लावण्याचे प्रकार टाळावे, अतिक्रमणांपासून दूर रहावे, वेळ लागणार.- शिवाजी फुले, उपवनसंरक्षक नाशिक पश्चिम भागशासनाच्या ३३कोटी वृक्ष लागवड संवर्धन अभियानात जनतेने वैयक्तिक सहभाग वाढवावा. जेणेकरून वनक्षेत्र वाढण्यास मदत होईल. आपआपल्या परिसरात मोकळ्या जागेत वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन करावे. सभोवताली अस्तित्वात असलेल्या वनांचे संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा. वनांचा सांभाळ ही केवळ शासनाची किंवा वनविभागाची जबाबदारी नसून जनतेचीदेखील जबाबदारी आहे. वनांचा फायदा सर्वांगिण सजीवसृष्टीला होत असतो, हे लक्षात घ्यावे.- तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक नाशिक पुर्व भाग 

 

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागHoliहोळी