शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

आदिवासी वस्त्यांशेजारील कचऱ्यामुळे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 19:02 IST

तळवाडे दिगर : येथील भवाडा रोड लगतच्या आदिवासी वस्तींसह दसाणा रोड शेजारी राहणा-या दलित वस्तीशेजारी साचलेल्या कचरा व उकिरड्यांमुळे तसेच ग्रामपंचायतीद्वारा बांधण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

एकीकडे देशभरात स्वच्छतेसंदर्भात आग्रही भूमिका घेतली जात असताना आम्ही स्वातंत्र्यात आहोत की पारतंत्र्यात असा सवाल संतप्त नागरिकांकडून विचारला जात आहे. लोकांना भेडसावणाºया व त्रस्त करणा-या या समस्येचे निराकरण करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने एकप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासण्याचे काम ग्रामपंचायतीकडून केले जात असल्याचा आरोप दलित आदिवासी बांधवांकडून केला जात आहे. गावामध्ये दर गुरु वारी आठवडे बाजार भरतो. येथील भवाडा रोड लगत मोठ्या प्रमाणात मांसाहारी पदार्थांची विक्र ी होते. रस्त्याला असलेल्या गुरांच्या दवाखान्याजवळ तसेच आदीवासी वस्तीलगत व्यावसायिकांकडून मांसाहारी पदार्थांचे अवशेष फेकले जातात. यामुळे या भागात प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येते.याबरोबरच दसाणा रोड लगत असलेल्या दलित वस्तीजवळही ग्रामपंचायतीने सार्वजनिक संडास बांधले असून त्याठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने तसेच नियमित साफसफाई होत नसल्याने तेथेही मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे नागरिकांना त्या भागात जगणे असह्य झाले आहे. या दोन्ही रस्त्यावरून दिवसभर वाहनांची, पादचाऱ्यांची तसेच शाळकरी मुलांची वर्दळ असते. त्यांनाही या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. साचलेल्या कच-यामध्ये पाणी साचल्यानंतर दुर्गंधीत भर पडत असून डासांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामपंचायतीने गावाचे आरोग्य डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण गावभर स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतHealthआरोग्य