शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

आदिवासी वस्त्यांशेजारील कचऱ्यामुळे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 19:02 IST

तळवाडे दिगर : येथील भवाडा रोड लगतच्या आदिवासी वस्तींसह दसाणा रोड शेजारी राहणा-या दलित वस्तीशेजारी साचलेल्या कचरा व उकिरड्यांमुळे तसेच ग्रामपंचायतीद्वारा बांधण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

एकीकडे देशभरात स्वच्छतेसंदर्भात आग्रही भूमिका घेतली जात असताना आम्ही स्वातंत्र्यात आहोत की पारतंत्र्यात असा सवाल संतप्त नागरिकांकडून विचारला जात आहे. लोकांना भेडसावणाºया व त्रस्त करणा-या या समस्येचे निराकरण करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने एकप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासण्याचे काम ग्रामपंचायतीकडून केले जात असल्याचा आरोप दलित आदिवासी बांधवांकडून केला जात आहे. गावामध्ये दर गुरु वारी आठवडे बाजार भरतो. येथील भवाडा रोड लगत मोठ्या प्रमाणात मांसाहारी पदार्थांची विक्र ी होते. रस्त्याला असलेल्या गुरांच्या दवाखान्याजवळ तसेच आदीवासी वस्तीलगत व्यावसायिकांकडून मांसाहारी पदार्थांचे अवशेष फेकले जातात. यामुळे या भागात प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येते.याबरोबरच दसाणा रोड लगत असलेल्या दलित वस्तीजवळही ग्रामपंचायतीने सार्वजनिक संडास बांधले असून त्याठिकाणी पाण्याची व्यवस्था नसल्याने तसेच नियमित साफसफाई होत नसल्याने तेथेही मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. त्यामुळे नागरिकांना त्या भागात जगणे असह्य झाले आहे. या दोन्ही रस्त्यावरून दिवसभर वाहनांची, पादचाऱ्यांची तसेच शाळकरी मुलांची वर्दळ असते. त्यांनाही या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. साचलेल्या कच-यामध्ये पाणी साचल्यानंतर दुर्गंधीत भर पडत असून डासांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या साथीच्या आजारांची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामपंचायतीने गावाचे आरोग्य डोळ्यासमोर ठेवून संपूर्ण गावभर स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतHealthआरोग्य