शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रसन्न, स्वस्थ मन:स्थितीतून होतात समृद्धीचे मार्ग खुले : राज दीदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:29 IST

नाशिक : मनाची स्थिती प्रसन्न आणि स्वस्थ असल्यास प्रत्येक घरात, प्रत्येक व्यक्ती, शरीर, मन, नातेसंबंध, आनंद आणि शांती, समृद्धी यांसह निरोगी राहणे शक्य असून, प्रत्येक व्यक्ती प्रगती आणि यश प्राप्त करू शकते, असे प्रतिपादन नारायण रेकी सत्संग परिवाराच्या संस्थापक राजेश्वरी मोदी यांनी केले.

ठळक मुद्देनाशिक सेवा समितीतर्फे सत्संग संपन्न

नाशिक : मनाची स्थिती प्रसन्न आणि स्वस्थ असल्यास प्रत्येक घरात, प्रत्येक व्यक्ती, शरीर, मन, नातेसंबंध, आनंद आणि शांती, समृद्धी यांसह निरोगी राहणे शक्य असून, प्रत्येक व्यक्ती प्रगती आणि यश प्राप्त करू शकते, असे प्रतिपादन नारायण रेकी सत्संग परिवाराच्या संस्थापक राजेश्वरी मोदी यांनी केले.नाशिक सेवा समितीतर्फे शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात रविवारी (दि.३) राजेश्वरी दीदी यांनी ‘सतयुग का सफर’ विषयावर उपस्थिताना मार्गदर्शन केले. राज दीदी म्हणाल्या, आत्मचिंतन व सकारात्मक बोलण्यातून घराघरांत सुख-समृद्धी व शांतता नांदू शकेल. तसेच सत्य व सुमधुर शब्द बोलण्यातून जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन व्यक्तीला यश प्राप्तीसाठी बळ मिळेल. प्रत्येक व्यक्तीने तन, मन, धन या दृष्टीने स्वस्थ राहिल्यास सर्वांना प्रगती, उन्नती सफलता प्राप्तकरणे शक्य असून, तन व मन स्वस्थ असणाऱ्या व्यक्तींना धनप्राप्तीही सहज होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी नाशिक सेवा समितीचे संरक्षक ब्रिजलाल धूत, नेमिचंद पोद्दार, प्रदीप बूब, संजय कारीवाला, ताराचंद गुप्ता, महावीर मित्तल, महेश पाटील, संजय सोनी यांच्या उपस्थितीत राजदीदी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. अध्यक्ष राजेश पारीख यांनी समितीच्या कार्याची माहिती दिली, तर महामंत्री विमल सराफ यांनी सूत्रसंचालन केले.अंतरात्माच खरा मार्गदर्शकव्यक्तीच्या मनातला, आतला आवाजच त्याचा खरा मार्गदर्शक असतो. जीवन एक प्रतिध्वनीसारखे आहे. जे आपण दुसºयांना देऊ तेच आपल्यालाही लाभेल. आपण दुसºयांना आनंद दिला तर आपल्यालाही आनंदाची प्राप्ती होईल व त्रास दिला तर आपलेही जीवन कष्टप्रत होईल. तेव्हा प्रार्थना व आशीर्वाद या दोन गोष्टी सर्वांसाठी देता व करता येण्यासारख्या असल्याने त्या द्यायला हव्यात, असेही राज दीदींनी सांगितले.सेव्हनस्टार आयुष्यासाठी...सहज, सरल, सुंदर, स्वस्थ, सफल, संपन्न व सार्थक या सेव्हनस्टार आयुष्यासाठी तन, मन धन व संबंध या चारही बाबतीत संतुलन असणे गरजेचे असल्याचे राज दीदी यांनी यावेळी सांगितले.