शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

गारपीट : अनेक तालुक्यात जनावरे, शेळ्या, कोंबड्या दगावल्या; काही ठिकाणी बोगस पंचनामे

By admin | Updated: March 16, 2015 00:41 IST

आभाळच फाटले ठिगळ लावणार कसे?

नाशिक : जिल्ह्यात शनिवारी अचानक आलेल्या या अस्मानी संकटाने झालेले नुकसान हे लाखो रुपयांचे असून, शेतकरी हतबल झाल्याचे चित्र आहे. जणूकाही आभाळच फाटले तर ठिगळ कुठे लावणार असा प्रश्न आहे. चांदवड : तालुक्यात शुक्रवारी व शनिवारी झालेल्या गारपिटीने लाखो रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून, शासकीय पातळीवर ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक पंचनामे करीत असून, या गारपिटीने तालुक्यातील जोपूळ येथील पोपट रेवजी वाघ यांच्या शेतात वीज पडून एक बैल ठार झाला, तर वडबारे येथील शंकर भिका जाधव यांच्या शेतात गारपिटीमुळे गुदमरून दोन शेळ्या, जोपूळ येथे २ शेळ्या, नांदूरटेक येथील रामनाथ देवराम शिंदे यांच्या दोन गायी गुदमरून मृत झाल्यात, तर मंगरूळ येथील बबन दामू जाधव यांच्या ४०० कोबंड्या, गणूर येथील सयाजी जाधव यांच्या ४५० कोंबड्या, हिरापूर येथील २०० कोंबड्या गारपीटीमुळे मृत पावल्या तर गुऱ्हाळे येथील विठ्ठल महादेव भवर यांच्या ३०० कोंबड्या मृत पावल्या असल्याची माहिती प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार मनोज देशमुख , कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी दिली. चांदवड तालुक्यात शुक्रवार दि. १३ रोजी शिवरे , बोराळे व परिसरात अवकाळी पावसानेमुळे शेती व फळपिकांचे नुकसान झाले. यावेळी एकूण १३ गावात गारपिट झाली त्यात गावनिहाय झालेला पाऊस चांदवड २.८ मिमी , दिघवद १ मिमी, रायपूर ३ मिमी, वडनेरभैरव १,७० मिमी, दुगाव २५मिमी, वडाळीभोई२.०५ मिमी तर चांदवडला सरासरी ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर द्राक्ष पिकाचे ७४० शेतकऱ्यांचे ३६० हेक्टर क्षेत्र, कांदा पिकाचे ३१० शेतकऱ्यांचे २१० हेक्टर क्षेत्र, हरभरा पिकाचे १८० शेतकऱ्यांचे ९० हेक्टर क्षेत्र, गहु पिकाचे ४५५ शेतकऱ्यांचे २०० हेक्टर क्षेत्र असे एकूण १६८५ शेतकऱ्यांचे ८६० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीची पाहणी मतदार संघाचे आमदार डॉ.राहुल अहेर, यांच्या समवेत प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार मनोज देशमुख, गटविकास अधिकारी भुपेंद्र बेडसे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी शिवरे, बोराळे, बहादुरी, जांबुटके व परिसरात केली . शनिवार दि. १४ मार्च रोजी चांदवड व परिसरात ३८ गावात गारपीट व अवकाळी पावसामुळे घरे , जनावरे, शेती, फळपीकांची नुकसान झाले. तालुक्यातील मंडल निहाय झालेला पाऊस चांदवड १८.२ मिमी, दिघवद २ मिमी, रायपूर ९ मिमी, वडनेरभैरव ० मिमी, दुगाव १५ मिमी, वडाळीभोई २.८० मिमी तर चांदवडला सरासरी ७.८३ मिमी पाऊस झाला आहे. चांदवड तालुक्यात पडलेल्या गारपीटीमुळे एकूण १२ गावात ६२६ अंशत: नुकसान झाले ओ. तर द्राक्ष ६२७ शेतकऱ्यांचे ३५० हेक्टर, कांदा ३७२५ शेतकऱ्यांचे १५४४ हेक्टर, हरभरा १६५९ शेतकऱ्यांचे ५४६.५ , गहु २०२३ शेतकऱ्याचे ७६९ हेक्टर, कांदा डोंगळे ६२३० शेतकऱ्यांचे ४६७.५० हेक्टर, डाळींब ३२३ शेतकऱ्यांचे ६२७ हेक्टर, भाजीपाला ७८८ शेतकऱ्यांचे ३८१.५० हेक्टर , इतर ७ शेतकऱ्यांचे ७.६० हेक्टर असे एकूण १५३८२ शेतकऱ्यांचे ४६९३.१० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी वडबारे येथे रात्री उशीरा भेट देऊन मृत्यू पावलेल्या शेळ्या गायी, जनावरांची पाहणी केली. व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पीकांचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे आवाहन केले आहे. जोरण येथे केले बोगस पंचनामेजोरण- बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यात बोगस पंचनामे केले. शासनने निधि दिला पण वेविस्थत खातेदारांना वाटप केले नाही जोरण तलाठी कार्यालयात एकूण 155 खातेदारांना लाभ मिळालेला नाही तर तलाठी व कोतवाल यांनी एकञीत येवून जोरण ,निकवेल , विंचुरे , कपालेश्वर, देवपूर, आदी गावांचा समावेश आहे बोगस पंचनामे करु न शासनाकडे पाठवले पंचनामानुसार खातेदारांची वर्गवारी केली.ऐन दुष्काळाच्या काळात शेतकर्याला मदत निधी दिला पण त्याच्यात बळिराजाचा खर्च सुध्दा निघाला नाही असा बोगस कारभारामुळे जोरण परिसरातील शेतकर्यांनी संताप वेक्त केला आहे अशा या बोगस कारभारामुळे १५५ खातेदार दुखावले या खाते दारांनी त्ांलाठी व कोतवाल यांना सांगितले तर त्याच्या कडून उत्तर असे मिळाले की, आम्ही रजेवर आहेत तर वंचित बळीराजा जानार कुठे पंचनामाच्यावेळी खातेदाराची किंमत केली नाही अशा ह्या बोगस कारभाराला कोतवाल व तलाठी जबाबदार आहे. लासलगाव : वनसगाव सारोळे खुर्द शिवडी, ब्राम्हणगाव वनस येथील काही शेतांमध्ये प्रचंड प्र२माणात गारपीटीने गारांचा थर साचुन हिरव्या गार शेतीऐवजी बर्फाच्छदीत शेती दिसत होती. लासलगाव तसेच निमगाव वाकडा येथेही सुमारे अर्धा तास गारपीटीने झोडपले. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत झाले नाही इतके प्रचंड नुकसान झाले आहेउगावला गारपीटी सह वादळी अवकाळी पावसाने सुपारीच्या आकाराएवढ्या गारपीटीने व वादळी वारे पावसामुळे सर्व हजारो एकर द्राक्ष बागावरील द्राक्ष घड खाली पडले थर द्राक्ष बागांच्या पाणांची जोरदार पाणगळ झाली आहे.(लोकमत चमू)