वडाळागाव : येथील विविध रस्त्यांच्या कडेला गेल्या काही दिवसांपासून कचर्याचे ढीग साचत असल्याने परिसराला बकाल स्वरूप येत आहे. वडाळागावात घंटागाडी अनियमित येत असल्यामुळे रस्त्यालगत कचरा पडून राहत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. साचलेला कचरा विस्कटला जाऊन मोकाट जनावरांचा त्यावर होणार्या मुक्त संचारामुळे परिसरात घाण पसरते. साचलेल्या कचर्याच्या ढिगामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन डासांचा प्रादुर्भावदेखील वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}