शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

गंगापूर धरण समूहात ९३ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 2:10 AM

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा ९३ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, मागील वर्षीच्या तुलनेत साठ्यात दहा टक्के इतकी अधिकची वाढ आहे.

नाशिक : नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा ९३ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, मागील वर्षीच्या तुलनेत साठ्यात दहा टक्के इतकी अधिकची वाढ आहे.समूहातील चारही धरणांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असल्याने आळंदी वगळता उर्वरित तीनही धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान, गंगापूर धरणातील विसर्गात घट करण्यात आल्यामुळे गोदावरी नदीचा पूर मोठ्या प्रमाणावर ओसरण्यास मदत झाली आहे. जिल्ह्णात इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर हे पावसाचे तालुके म्हणून ओळखले जातात. त्र्यंबकेश्वर समूहात गेल्या पंधरा दिवसांपासून मोठा पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली. पावसाचा जोर सातत्याने वाढत असल्यामुळे धरणातून विक्रमी ४५ हजार क्यूसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. पावसाचा जोर कमी झाल्याने आता हा विसर्ग कमी-कमी करण्यात आला असून, रविवारी सकाळी ६१६० इतक्या वेगाने विसर्ग केला जात होता. सायंकाळी सहा वाजेनंतर विसर्ग ११३७ क्यूसेक करण्यात आला.गंगापूर धरण समूहातील गंगापूर धरणात रविवारी ८९, कश्यपी धरणात ९७, गौतमी गोदावरी ९४ आणि आळंदी धरणातील पाणीसाठा १०० टक्के इतका आहे. सायंकाळी सहा वाजेनंतर या तीनही धरणांमधून विसर्ग कमी करण्यात आला. कश्यपीमधून ४२२, गौतमी गोदावरीमधून १२० तर आळंदीमधून ६८७ क्यूसेक इतका विसर्ग करण्यात आला. विसर्ग कमी करण्यात आल्यामुळे गोदावरी नदीची पातळी कमी झाली आहे.—इन्फो—

टॅग्स :Nashikनाशिकgangapur damगंगापूर धरण